tag:blogger.com,1999:blog-64243459926844159462024-03-04T21:15:22.334-08:00bollytineMandar Joshihttp://www.blogger.com/profile/17017614789313998938noreply@blogger.comBlogger67125tag:blogger.com,1999:blog-6424345992684415946.post-59019481585811336972013-03-02T00:16:00.000-08:002013-03-02T00:16:13.824-08:00सुन्न करणारं मृत्यूकांड....१९९५ ते २०१० अशी तब्बल १५ वर्ष मराठी, हिंदी तसेच अधूनमधून इंग्रजी तसेच आंतरराष्ट्रीय चित्रपटांवर ‘नॉनस्टॉप’ भाष्य केलं. शेवटचं चित्रपट परीक्षण मी साधारण अडीच वर्षांपूर्वी लिहिलं होतं. ‘तारांगण’ मासिकाच्या उभारणीसाठी काही काळ मी चित्रपट परीक्षण लिखाणातून ‘ब्रेक’ घेतला होता. रामगोपाल वर्मांचा ‘द ऍटॅक्स ऑफ २६/११’ हा चित्रपट पाहिला आणि पुन्हा एकदा लिहावंसं वाटलं.
---------
‘द ऍटॅक्स ऑफ’ २६/११’ हा चित्रपट पाहताना माझ्या मनात दोन गोष्टींची धाकधूक होती. एक तर या विषयासंबंधीचा तपशील सर्वांनाच ठाऊक आहे आणि प्रेक्षकांनी तो अनेक वेळा टीव्हीवरही पाहिलाय. त्यामुळे अवघ्या दोन तासांमध्ये चित्रपटामध्ये नेमकं काय आणि कसं मांडलं जातं याचा अंदाज बांधणं कठीण होतं. दुसरी गोष्ट म्हणजे दिग्दर्शक रामगोपाल वर्मांवरील माझा विश्वास उडत चालला होता. ‘मोस्ट अनप्रेडिक्टेबल’ दिग्दर्शक म्हणून मी त्यांचं नाव घेईन. अलीकडच्या काळात हा दिग्दर्शक विश्वासार्हतेपासून स्वतःला लांब नेत चालला होता. अर्थात वर्मांच्या गुणवत्तेबद्दल माझ्या मनात शंका नव्हती. एवढा मोठा आवाका असलेला विषय प्रभावीपणे मांडण्याची वर्मांची इच्छाशक्ती नेमकी आहे का, एवढीच शंका माझ्या मनात होती. ‘द ऍटॅक्स...’ पाहिला आणि वर्मांबद्दलच्या सर्व शंकांना पूर्णविराम मिळाला. ‘द ऍटॅक्स’मधील सर्व घटनाक्रम आपल्या अंगावर येतो, आपल्याला हादरवून टाकतो, क्रौर्यानं गाठलेली परिसीमा पाहून आपण उद्ध्वस्त होतो. थँक्स टू रामू... रामगोपाल वर्मांचे असे आभार मानण्याची संधी १५ वर्षांपूर्वी ‘सत्या’च्या निमित्तानं मिळाली होती. अर्थात या चित्रपटातील काही गोष्टी खटकतात. काही गोष्टींची अपूर्णता अस्वस्थ करते. काही घटनांच्या अभ्यासात वर्मांनी ढिलाई दाखविलीय. तरीदेखील रामगोपाल वर्मांमधल्या दिग्दर्शकाला फॉर्म गवसलाय हेदेखील काही कमी नाही.
२६ नोव्हेंबर २००८ला मुंबईत दहशतवादानं जे थैमान घातलं त्या रात्री चार तासांमध्ये नेमकं काय घडलं, याचं थरारक चित्रीकरण या चित्रपटातून पाहायला मिळतं. हा नेहमीच्या पद्धतीचा चित्रपट नाही. दिग्दर्शक वर्मांनी ‘डॉक्युड्रामा’ पद्धतीनं चित्रपटातील आशय मांडलाय. चित्रपटाच्या सुरुवातीलाच या हल्ल्याची पार्श्वभूमी आणि त्यामागची कारणमीमांसा आपल्याला पाहायला मिळते. हा हल्ला अनेक तास चालला. त्यमुुळे त्याचे जसेच्या तसे चित्रीकरण दाखविण्याऐवजी वर्मांनी ‘सिनेमॅटिक लिबर्टी’ घेतलीय. या हल्ल्याचा तपास करणारे पोलिस अधिकारी राकेश मारिया यांच्या नजरेतून त्या दिवशी रात्री नेमकं काय आणि कसं घडलं, याची निरीक्षणवजा कहाणी त्यांनी सांगितलीय. ‘स्टोरी टेलिंग’चा हा फॉर्म चांगलाच जमलाय. दहा दहशतवाद्यांनी समुद्रमार्गे येऊन मुंबई समुद्रकिनार्यावरील बोटीचा घेतलेला ताबा, लिओपोल्ड कॅफेवरील हल्ला, मुबई छत्रपती शिवाजी टर्मिनसवरील हत्याकांड, कामा रुग्णालयातील थरार, अजमल कसाबचा पोलिसांनी घेतलेला ताबा, त्याच्या मनातील व्यक्त होणारी खदखद, त्याच्या बाष्कळ बडबडीला पोलिस यंत्रणेकडून मिळालेलं उत्तर आणि शेवटी त्याचं फासावर लटकणं या चित्रपटात पाहायला मिळतं.
प्र्रेक्षकांना माहित असलेला घटनाक्रम आणि त्याबरोबरच माहित नसलेला घटनाक्रम याचा अभ्यास करून दिग्दर्शक वर्मांनी ‘बीटवीन द लाईन्स’ भरल्यात. म्हणून माहित नसलेल्या गोष्टींवर अधिक भर दिलाय. त्यामुळेच अतिरेक्यांनी समुद्रमार्गे येऊन भारतीय बोटीचा ताबा घेताना नेमकं काय केलं, हे या चित्रपटात सविस्तर पाहायला मिळतं. वर्मांच्या चित्रपटामधील कॅमेरा थोडा अधिकच हालचाल करतो अशी अनेकांची ओरड असते. परंतु, या चित्रपटात वर्मांनी स्वतःवर नियंत्रण ठेवलंय. किंबहुना कॅमेर्याच्या काही जागा पाहणार्याची दाद घेतात. उदा. चित्रपटाच्या सुरुवातीच्या दृश्यातील दोन बोटी एकमेकींच्या जवळ येताना त्यांचं टायर एकमेंकांवर घासलं जाणं. लिओपोल्ड कॅफे, ताजमहाल हॉटेल आणि मुबई सीएसटीवरचं दहशतवादाचं थैमान अंगावर येतं. परंतु, काही ठिकाणी त्याचा अतिरेक झाल्यासारखा वाटतो. त्यामुळेच कदाचित या चित्रपटाला ‘ए’ प्रमाणपत्र मिळालेलं असावं. चित्रपटाची लांबी दोन तासांपुरती मर्यादित ठेवण्याच्या खटाटोपात वर्मांचं बर्याच गोष्टींकडे दुर्लक्षही झालं आहे. चित्रपटाचा संपूर्ण फोकस अजमल कसाबभोवती असून इतर आठ दहशतवाद्यांबद्दल फारशी माहिती मिळत नाही. मुख्य म्हणजे कसाबव्यतिरिक्त अतिरेक्यांचा खातमा करण्यात पोलिसांनी बजावलेल्या कामगिरीवरही हा चित्रपट भाष्य करीत नाही. प्रेक्षकांच्या दृष्टीनं हा भाग नवीन होता. संशोधनावर अधिक भर दिला असता तर हा दृश्यभागही दाखविण्यात काहीच अडचण आली नसती. वर्मांनी या गोष्टींवरही लक्ष केंद्रीत केलं असतं तर चित्रपटाचा परिणाम आणखी वाढला असता. कदाचित वर्मांना चित्रपट लवकर प्रदर्शित करण्याची घाई झाली असावी. असो.
‘द ऍटॅक्स’ लक्षणीय ठरलाय तो नाना पाटेकरांमुळे. राकेश मारियांची व्यक्तिरेखा साकारताना त्यांनी कमालीचं बेअरिंग दाखवलंय. या दुर्घटनेचे पदर उलगडताना आपल्या मनातील घालमेल त्यांनी विलक्षणरीत्या सादर केलीय आणि चित्रपटाच्या शेवटी शवागारातील त्यांचे अजमल कसाबबरोबरचे प्रसंग उत्कृष्ट आहेत. चित्रपटामधील इतर कलाकारांचीही कामं चांगली आहेत. चित्रपटाचं पार्श्वसंगीत, कॅमेरा, ऍक्शन उत्कृष्ट. कलादिग्दर्शकाचंही कौतुक करायला हवं. एकुणात काही त्रुटी असूनही ‘द ऍटॅक्स..’ एकदा तरी पाहण्यासारखा आहे.
- मंदार जोशी
दर्जा - *** Mandar Joshihttp://www.blogger.com/profile/17017614789313998938noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-6424345992684415946.post-78638063223140005212012-08-11T23:36:00.000-07:002012-08-11T23:36:27.230-07:00एक चावट काळ...-------------
एक चावट काळ...
----------
इंट्रो...
चित्रपट आणि टीव्ही या माध्यमांमध्ये सध्या लैंगिक विषयांचीच चलती आहे. मराठी रंगभूमीवरही आता असे विषय येऊ लागले आहेत. प्रेक्षकांच्या भावनांना हात घालण्याऐवजी भावना चाळविणार्या विषयांनाच प्राधान्य दिलं जात आहे. आयटेम सॉंग, चावट विनोद आणि लैंगिक दृश्यांनी चित्रपटांमध्ये उच्छाद मांडला आहे. विशेष म्हणजे अशाप्रकारच्या कलाकृतींना व्यावसायिक यशदेखील मिळत आहे. त्यामुळे आपल्याकडचा सरसकट प्रेक्षकवर्ग आंबटशौकीन होऊ लागलाय की निर्माते-दिग्दर्शक मंडळीच त्यांना वाममार्गाला नेण्यास भाग पाडत आहे, याचं कोडं अनेकांना पडलं आहे.
----------
नेहा धुपिया नावाच्या एका अभिनेत्रीला मानायला हवं. अभिनयात तीर मारायला तिला कधी जमलं नाही. परंतु, तिनं काही वर्षांपूर्वी केलेलं एक वक्तव्य आता तंतोतंत खरं ठरत आहे. ‘बॉलीवूडमध्ये फक्त सेक्स आणि सलमान-शाहरुख खानच विकले जातात...’ असा बॉम्ब तिनं टाकला होता. गेल्या काही महिन्यांमध्ये बॉलिवूडमध्ये प्रदर्शित झालेले चित्रपट आणि त्यांना मिळालेलं यश पाहता नेहाच्या वक्तव्यात तथ्य असल्याचं जाणवतं. ‘जिस्म २’, ‘क्या सुपर कुल है हम’ या दोन ताज्या चित्रपटांनी सध्या सगळीकडे हैदोस मांडलाय. आतापर्यंत चित्रपट हा सिनेमास्कोप तसेच ७० एम.एम.चा असतो, हे सर्वांना ठाऊक होतं. परंतु, ‘जिस्म-२’ची ठिकठिकाणी झळकलेली सनी लिओनची अर्धनग्न सिनेमास्कोप पोस्टर्स पाहून हा ‘स्कोप’ भलताच आहे, हे प्रेक्षकांनाही जाणवलंय. फक्त प्रसिद्धी आणि प्रेक्षकांमध्ये असलेली चर्चा या दोन मुद्यांना धरूनच क्रमवारी लावायची ठरवली तर सनी लिओनीनं दीपिका पदुकोण, प्रियांका चोप्रा, सोनाक्षी सिन्हा यासारख्या अभिनेत्रींनाही मागं टाकलं आहे. दिग्दर्शक महेश भट या सनीला एका ‘रिऍलिटी शो’मधून हिरोईन म्हणून ब्रेक देतात काय आणि ही सनी प्रेक्षकांना वेड लावते काय, सगळाच अजब प्रकार आहे. या चित्रपटानं पहिल्याच आठवड्यात तीस कोटींचा व्यवसाय केला आहे. या चित्रपटाच्या डिजिटल हक्कविक्रीच्या वेळी ‘जिस्म’ या शब्दावरच ‘ऍपल’ कंपनीनं आक्षेप नोंदवला होता. परंतु, या चित्रपटाची निर्माती पूजा भटनं ‘जिस्म’ म्हणजे शरीर आणि त्यात आक्षेपार्ह असं काहीच नाही, अशी आपली बाजू मांडली होती. मात्र त्यामुळे ‘ऍपल’च्या मंडळींचं काही समाधान झालं नाही आणि ‘गुगल’, ‘यू ट्यूब’ या ‘ऍपल’च्या स्पर्धक कंपन्यांनी मग ‘जिस्म’वर आपला ताबा घेतला.
इथं विशेष उल्लेख करण्याची गोष्ट म्हणजे पूजा भटची निर्मिती असलेल्या ‘जिस्म’नं २००३ मध्ये तब्बल १४ कोटींचा व्यवसाय केला होता आणि या चित्रपटाचा पुढील भागही आता चांगला व्यवसाय करतो आहे. एकीकडे ‘जिस्म २’ चांगला व्यवसाय करीत असताना ‘क्या सुपर कूल है हम’ हा चित्रपटदेखील फारसा मागं नाही. अवघ्या दोन आठवड्यांमध्ये या चित्रपटानं ४४ कोटींचा व्यवसाय केलाय. ‘हाऊसफुल-२’ने या वर्षी शंभर कोटींचा टप्पा पार केलाय. ‘जिस्म २’मध्ये अश्लील दृश्यांची रेलचेल आहे तर ‘क्या सुपर कूल...’मध्ये चावट विनोदांचा भडीमार आहे. ‘सेक्स’ आणि चावट विनोद हा हिंदी चित्रपटांच्या यशाचा नवीन फॉर्म्युला बनलाय. एवढंच नव्हे तर गेल्या एक-दोन वर्षांमध्ये यशस्वी चित्रपटांच्या नावावर नजर टाकली तरी ‘सेक्स कॉमेडी’ हा हिंदी चित्रपटांचा ‘जॉनर’ बनल्याचं जाणवतं. ‘हाऊसफुल’, ‘हाऊसफुल-२’, ‘विकी डोनर’, ‘दोस्ताना’, ‘दिल्ली बेली’ हे सर्व चित्रपट या ‘जॉनर’शी नातं सांगणारे आहेत. इम्रान हाश्मी तर ‘सेक्सी’ चित्रपटांचा बादशहाच बनलाय. ‘किसींग किंग’ असा बहुमान आता त्याला देण्यात आलाय. इम्रानची प्रमुख भूमिका असलेला ‘शांघाय’ चित्रपट त्याच्या ‘किसींग’ इमेजशी मिळताजुळता नसल्यामुळेच पडला असं म्हणतात. स्वच्छ, प्रसंगनिष्ठ विनोद आता इतिहासजमा झालाय. या विनोदाला लावलेला तडका म्हणजेच ‘सेक्स कॉमेडी’ हा प्रकार आहे.
पूर्वीच्या काळात शक्ती कपूर, कादर खान, जॉनी लिव्हर यासारखी मंडळी अगदी थोड्या प्रमाणात विनोदासाठी चित्रपटात असायची. या चित्रपटांमधील नायिकांच्या अंगप्रदर्शनालाही मर्यादा होती. मात्र खलनायकानं नायिकेवर केलेल्या अतिप्रसंगाची दृश्ये मात्र तेव्हा भरपूर पाहायला मिळत. खलनायकीकडून कॉमेडीकडे वळलेल्या शक्ती कपूरनं १९८०च्या दशकात भरपूर आचरटपणा आणि चावटपणा करण्यास सुरुवात केली. त्याला खतपाणी घातलं ते गोविंदानं. उडत्या चालीची गाणी आणि द्वैअर्थी संवादांचं बेसुमार पीक आलं. आता तर अजय देवगण, अभिषेक बच्चन, जॉन अब्राहम, अर्शद वारसी, तुषार कपूर, रितेश देशमुख यासारख्या ‘ए ग्रेड’ कलाकारांना चावट विनोदनिर्मितीमध्ये डांबण्यात आलं आहे. ‘आयटेम सॉंग’शिवाय हल्लीचा चित्रपट पूर्णच होत नाही, अशी परिस्थिती आलीय. करिना कपूर, दीपिका पदुकोणसारख्या नायिकांनाही अशी गाणी करावी लागताहेत. त्यात काही गैर वाटणं तर सोडाच, उलट फक्त ‘आयटेम सॉंग’साठी आपल्याला बोलावणं आलं तर या अभिनेत्री स्वतःला धन्य समजत आहेत.
‘सेक्स’ आणि चावट विनोदांमध्ये फक्त चित्रपट माध्यमच आघाडीवर नाही. टीव्ही माध्यमात तर दररोज हा प्रकार पाहायला मिळतोय. ‘बडे अच्छे लगते है’मधील राम कपूर आणि साक्षी तन्वर यांच्यातील तो ‘सुपरहिट’ प्रेमप्रसंगाचा ‘एपिसोड’ तर आता ‘माईलस्टोन’ ठरलाय. या भागानं टीव्हीवरील सगळी गणितंच बदलली आहेत. ‘सुपरहिट’ या शब्दाचा उपयोग करण्यामागचं कारण म्हणजे ‘बडे अच्छे लगते है’मधील ‘तो’ भाग ‘यू ट्यूब’वर अपलोड करण्यात आला आहे. गेल्या पाच महिन्यांमध्ये या भागाला तब्बल २२ लाख प्रेक्षकांच्या हिट्स मिळाल्या आहेत. तसेच या भागाचे तुकडे करून टाकलेल्या ‘क्लिप्स’ आणि त्यांना मिळालेल्या ‘हिट्स’ची बेरीज केल्यास ही संख्या आणखी मोठी होते. ‘बडे अच्छे..’चा हा भाग प्रक्षेपित झाल्यानंतर मोठं वादळ उठलं होतं. कारण चित्रपटामधील प्रेमप्रसंग किंवा गाणी ही फार तर दोन-चार मिनिटांची. पण ‘बडे अच्छे...’चा हा भाग अर्ध्या तासाच्या प्रणयदृश्यांनी व्यापला होता. या वादळानंतर निर्माती एकता कपूरनं प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटलं होतं, ‘मला असं वाटतं की हा भाग लोकांना आवडलाय. ज्यांना आवडला नाही त्यांची मी माफी मागते.’ अशा एका वाक्यात तिनं हा विषय संपवून टाकला होता. ‘बडे अच्छे...’चं हे वादळ अपेक्षेप्रमाणे केव्हाच संपुष्टात आलंय आणि त्यानंतर या भागापेक्षा बर्याच ‘अच्छे अच्छे’ गोष्टी टीव्हीवर दाखविल्या जात आहेत.
चावट विनोद आणि ‘सेक्स’ला प्राधान्य देणार्या कलाकृतींना यश मिळाल्यामुळे आणखी एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतोय. आपल्याकडचा सर्वच प्रेक्षक आंबटशौकीन झालाय का ? खुद्द बॉलीवूडमधील ‘मेकर्स’ मंडळींना आपला प्रेक्षकवर्ग आंबटशौकीन नसून सुजाण झाल्याचं वाटतंय. फेसबुक, ट्विटर, मेल, एसएमएस आदी माध्यमांमधून आपला प्रेक्षकवर्ग ज्या पद्धतीनं स्वतःला व्यक्त करतोय ते पाहिल्यानंतर तो बंधनमुक्त झालाय असंही या मंडळींना वाटतंय. हे काही प्रमाणात खरंही आहे. मात्र बॉलीवूड चित्रपट लाटांसाठी प्रसिद्ध आहेत हेदेखील विसरता येणार नाही. चावट विनोद आणि ‘सेक्स’ हीदेखील एक लाट असू शकते. ती विरली की पुन्हा एखादा नवीन ‘जॉनर’सुद्धा जन्म घेईल. पण आत्ताचा काळ मात्र चावट आहे हे मात्र खरंय. फक्त त्याचा आपण भाग व्हायचं की नाही हे ज्याचं त्यानं ठरवावं.
- मंदार जोशी
-----------Mandar Joshihttp://www.blogger.com/profile/17017614789313998938noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-6424345992684415946.post-11553916345161919602012-08-11T21:09:00.000-07:002012-08-11T21:09:12.277-07:00my new article in matahttp://www.maharashtratimes.indiatimes.com/articleshow/15454760.cmsMandar Joshihttp://www.blogger.com/profile/17017614789313998938noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-6424345992684415946.post-47910810247102833312012-07-29T19:31:00.000-07:002012-07-29T19:31:11.134-07:00पहिल्या मल्टिप्लेक्सचा मृत्यू...<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjAH6QldJ4pCOhmaZ1gYjmLj-GfZrF3MbmXgdKrsCZKZj95qVjwm46WtB_2Qc0_kzt13j7ZhWpqWXHxckW1LitLtwKR4Cgx3_qSxRDRFwPr2mjMFTwxeYPgdyh8huumT_cghDC16c3LF6g/s1600/fame_adlabs+1.jpg" imageanchor="1" style="margin-left:1em; margin-right:1em"><img border="0" height="217" width="320" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjAH6QldJ4pCOhmaZ1gYjmLj-GfZrF3MbmXgdKrsCZKZj95qVjwm46WtB_2Qc0_kzt13j7ZhWpqWXHxckW1LitLtwKR4Cgx3_qSxRDRFwPr2mjMFTwxeYPgdyh8huumT_cghDC16c3LF6g/s320/fame_adlabs+1.jpg" /></a></div>
--------
पहिल्या मल्टिप्लेक्सचा मृत्यू...
-------
संत रामदासांच्या ‘दासबोधा’त एक सुंदर श्लोक आहे...
...मरे एक त्याचा दुजा शोक वाहे
अकस्मात तोही पुढे जात आहे...
या श्लोकाची आता आठवण होण्यामागचं कारण म्हणजे मुंबईतल्या पहिल्या मल्टिप्लेक्सनं गेल्या आठवड्यात मान टाकली. अंधेरी भागामधील ‘सिटी मॉल’मधल्या फेम-ऍडलॅब्स मल्टिप्लेक्सची सेवा आता खंडित झाली आहे. या मल्टिप्लेक्सच्या चालकांनी काही महिन्यांनी पुन्हा आपण सेवेत रुजू होऊ, असा आशावाद व्यक्त केलाय. परंतु, चित्रपटसृष्टीतील सूत्रांच्या माहितीनुसार हे मल्टिप्लेक्स आता इतिहासजमा झालं आहे. एक काळ असा होता की देशभरातील ‘सिंगल स्क्रीन थिएटर्स’ एकापाठोपाठ एक काळाच्या पडद्याआड जात होती आणि त्यांच्या जागी आलिशान मल्टिप्लेक्स उदयाला येत होती. ‘सिंगल स्क्रीन’चा र्हास काही पाहवत नव्हता. मल्टिप्लेक्सचं चकचकीत वातावरण, त्यातल्या आरामदायी खुर्च्या, वातानुकूलित सेवा, स्वच्छ खाद्यपदार्थ... ही सेवा पाहून मल्टिप्लेक्स इथं दीर्घ काळ राज्य करतील असं वाटलं होतं. परंतु तसं घडलं नाही. ‘सिंगल स्क्रीन’ना श्रद्धांजली वाहणार्यांना एवढ्या लवकर मल्टिप्लेक्सलाही श्रद्धांजली वाहण्याची वेळ येईल असं वाटलं नव्हतं.
‘फेम-ऍडलॅब्स’चा मृत्यू काही साधासुधा नाही. त्याला अनेक पदर आहेत. २००२ मध्ये या मल्टिप्लेक्सला सुरुवात झाली. ‘फेम’चे श्रॉफ बंधू आणि ‘ऍडलॅब्स’च्या मनमोहन शेट्टींनी एकत्र येऊन मल्टिप्लेक्सच्या क्रांतीला सुरुवात केली. मॉलमध्ये मल्टिप्लेक्स ही कल्पना तेव्हापासून यशस्वीपणे राबविली गेली. या मल्टिप्लेक्सच्या उदयानंतर काही काळात देशभरात मल्टिप्लेक्सचं पेव फुटलं. २००२ मध्ये या मल्टिप्लेक्सच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहण्याची संधी मला मिळाली होती. विपुल शहा दिग्दर्शित ‘आँखे’ चित्रपटापासून हे मल्टिप्लेक्स कार्यरत झालं होतं. या मल्टिप्लेक्सचा तेव्हाचा थाट पाहून अनेक जण चक्रावले होते. आपण विदेशात तर नाही ना, अशीही शंका अनेकांना आली होती. कारण तत्पूर्वी अशापद्धतीचा थाटमाट ‘सिंगल स्क्रीन’मध्ये पाहायला मिळाला नव्हता. अभिनेते अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री तब्बू यांच्या उपस्थितीत या मल्टिप्लेक्सचा शुभारंभ झाला होता. यावेळी श्री. बच्चन यांनी आपल्या भाषणामध्ये ‘फेम’चा गौरव केला होता. परंतु, अवघ्या दशकभरात या मल्टिप्लेक्सच्या वाट्याला मरण आलं. त्यामागच्या काही घडामोडींवर नजर टाकल्यास बर्याच गोष्टी त्यास कारणीभूत असल्याचं स्पष्ट होतं.
जानेवारी २०१२ मध्ये ‘फेम इंडिया’चं ‘आयनॉक्स लिजर लि.’मध्ये विलीनीकरण झालं. तेव्हापासून ‘आयनॉक्स’ आणि ‘फेम’च्या मालकांमध्ये खटके उडायला लागले. ‘आयनॉक्स’नं ‘लिव्ह अँड लायसन्स’चं नूतनीकरण न करण्यामागे आपल्याला भाडे परवडत नसल्याचं कारण पुढं केलंय. गेल्या काही वर्षांपासून या मल्टिप्लेक्सचा कारभार रडतखडतच चालला होता. २००२ मध्ये या मल्टिप्लेक्सला सुरुवात झाली तेव्हा अंधेरीच्या पश्चिम भागामध्ये एकही चित्रपटगृह नव्हतं. त्यामुळे या मल्टिप्लेक्सवर सुरुवातीच्या काळात प्रेक्षकांच्या उड्या पडल्या. मात्र नंतर या भागात ‘सिनेमॅक्स’ आणि ‘फन रिपब्लिक’ ही आणखी दोन आलिशान मल्टिप्लेक्सेस सुरू झाली. अवघ्या शंभर मीटरच्या अंतरात सुमारे १५ ‘स्क्रीन्स’ सुरू झाले. एवढ्या ‘स्क्रीन्स’ना सामावण्याइतकी लोकसंख्या अंधेरी भागात नाही. त्यामुळे आसनखुर्च्या अधिक आणि प्रेक्षकांची वानवा हा मोठा प्रश्न उभा राहिला. ‘फेम’चं काळाबरोबर न राहणंही त्यांना महागात पडलं. सुरुवातीच्या एक-दोन वर्षांमध्ये अनेक बिगबजेट चित्रपटांचे ‘प्रीमियर शोज’ फेम-ऍडलॅब्जझाले झाले. परंतु, ‘सिनेमॅक्स’च्या आगमनानंतर सगळा लाईमलाईट त्यांच्यावर स्थिरावला. प्रीमियर शोज, पार्ट्या, सीडी प्रकाशन सोहळे यांचा ‘फेम’मधील ओघ आटला आणि सगळं ग्लॅमर ‘सिनेमॅक्स’वर स्थिरावलं. अलीकडच्या काळात एकही मोठा इव्हेंट ‘फेम-ऍडलॅब्स’मध्ये झाला नाही. त्याचा विपरीत परिणाम या मल्टिप्लेक्समधील तिकीटविक्रीवर झाला.
‘फेम-ऍडलॅब्स’ची जी वाताहत झाली, तशी वाताहत देशभरातील आणखी अनेक मल्टिप्लेक्सची नजिकच्या काळात होणार आहे. अनेक शहरांमध्ये गरज नसतानाही भरपूर ‘स्क्रीन्स’ची मल्टिप्लेक्सेस उभारली गेली आहेत. प्रेक्षकांअभावी चित्रपटांचे ‘शोज’ रद्द करण्याचे प्रकारही वरचेवर वाढताहेत. मल्टिप्लेकमधील तिकीट दर आणि खाद्यपदार्थांचे दर हे सर्वसामान्य प्रेक्षकांच्या आवाक्यातले नाहीत. सर्वसाधारणपणे सिनेमाचा मुख्य प्रेक्षकवर्ग हा मध्यमवर्गीय असतो. चार जणांच्या एका कुटुंबानं मल्टिप्लेक्समध्ये जाऊन चित्रपट पाहायचा असेल तर किमान एक हजार रुपयांची नोट खर्चावी लागते. म्हणूनच बहुतेक सर्व मल्टिप्लेक्सचा कारभार हा तोट्यात आहे आणि आज ना उद्या त्यांच्यावर ‘फेम-ऍडलॅब्स’सारखी वेळ येणार आहे. नवीन चित्रपट प्रदर्शित होणार असला की मल्टिप्लेक्सचे दर वाढवले जातात. प्रेक्षकांना ही नाडण्याची कृती अखेर मल्टिप्लेक्सचालकांच्या अंगाशी येऊ लागली आहे. प्रसिद्ध अभिनेता आमिर खान यानेही मल्टिप्लेक्सचालकांनी तिकीट दरात कपात करणं आवश्यक असल्याचं सुचवलंय. मात्र अजूनही त्याकडे दुर्लक्ष केलं जातंय. ‘फेम-ऍडलॅब्स’चा मृत्यू हा इतर मल्टिप्लेक्सचालकांसाठी धोक्याची सूचना आहे. त्यातून धडा घेत तातडीनं उपाययोजना करणं आवश्यक आहे. अन्यथा आणखी काही मल्टिप्लेक्सेस बंद झाली तर आश्चर्य वाटू नये.
- मंदार जोशी
--------------Mandar Joshihttp://www.blogger.com/profile/17017614789313998938noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-6424345992684415946.post-78332661878760656502012-07-04T20:32:00.000-07:002012-07-04T20:32:27.996-07:00‘काकस्पर्श’च्या स्पर्शामागचं ‘लॉजिक’<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgffzjTy-nsEthRfClADHOV3KySmtRBhv1UrzyFd4-AsRfvmV1dceNuUOAqTRA2mByIFUvQoNG8WlT-2CaviedMWV6KZ0td13eIOsd7zKMgn6D9ZAmkcPv87bErHA2aUhyLlrlz2SYvMqU/s1600/kaksparsh.jpg" imageanchor="1" style="margin-left:1em; margin-right:1em"><img border="0" height="320" width="320" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgffzjTy-nsEthRfClADHOV3KySmtRBhv1UrzyFd4-AsRfvmV1dceNuUOAqTRA2mByIFUvQoNG8WlT-2CaviedMWV6KZ0td13eIOsd7zKMgn6D9ZAmkcPv87bErHA2aUhyLlrlz2SYvMqU/s320/kaksparsh.jpg" /></a></div>
यंदाच्या वर्षी मराठी चित्रपटांच्या निर्मितीची संख्या द्विशतकी टप्पा गाठणार आहे. प्रेक्षक, चित्रपटसृष्टीतील मान्यवर आणि कलाकारांसाठीही हा एक मोठा धक्का आहे. परंतु, मराठी चित्रपटसृष्टीतील आलेली सध्याची ‘बूम’ पाहता हा आकडा अगदीच फसवा नसल्याचं जाणवतं. हल्ली कोणालाही मराठी चित्रपट बनवायचाय. त्यामागचं कारण म्हणजे एक तर मराठी चित्रपट हिंदीच्या तुलनेत खूप कमी किमतीत बनतो आणि त्यामध्ये केलेल्या आर्थिक गुंतवणुकीची कागदावरील परतफेड अगदी सुखकर आहे. तरीदेखील मराठी चित्रपटांच्या यशाचं प्रमाण हे अगदीच नगण्य आहे. अगदी संख्याच मांडायची झाल्यास दर शंभरी अवघे पाच चित्रपट यशस्वी झाल्याचं निदर्शनास येतं. यंदाच्या वर्षीचं चित्र तर खूपच निराशाजनक आहे. ‘काकस्पर्श’चा अपवाद वगळता एकाही मराठी चित्रपटाला ‘बॉक्स ऑफिस’वर दणदणीत यश मिळवता आलेलं नाही.
‘काकस्पर्श’च्या यशाबद्दल लिहायचं झाल्यास गुणवत्ता, नशीब आणि मेहनत या तीनही गोष्टींचा संगम या चित्रपटात झाल्याचं आढळतं. मराठीत चांगले चित्रपट येत नाहीत असं नाही. परंतु, प्रत्येक चित्रपटच ‘काकस्पर्श’एवढा यशस्वी ठरलेला नाही. म्हणूनच या चित्रपटाच्या यशाचं मोल अधिक आहे. एखाद्या चित्रपटाची ‘सक्सेस पार्टी’ आयोजित केली की त्यामध्ये संबंधित चित्रपटाची मंडळी उपस्थित होतात. परंतु, ‘काकस्पर्श’च्या यशाची पार्टी त्यास अपवाद ठरली. या पार्टीस या चित्रपटाशी संबंधित नसलेली बरीच मंडळी होती. विशेष म्हणजे ‘काकस्पर्श’ ज्या चित्रपटगृहांमध्ये धो धो चालला त्या चित्रपटगृहांचे व्यवस्थापक आणि मालकांना आवर्जून बोलाविण्यात आलं होतं. मराठी चित्रपटाच्या यशाची ताकद यापूर्वी ‘नटरंग’, ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ या चित्रपटांबाबत अनुभवायला आली होती. त्या काळात हिंदी चित्रपटांच्या स्पर्धेत या दोन्ही चित्रपटांचं यश अगदी उठून दिसलं होतं. मराठी चित्रपटांना चांगले ‘शो टायमिंग्ज’ मिळत नसल्याची खंत नेहमीच व्यक्त केली जाते. परंतु, त्यात तथ्य दिसत नाही. ‘काकस्पर्श’ला प्रेक्षकांनी कौल दिल्याचं लक्षात आल्यानंतर दुसर्या आठवड्यापासून या चित्रपटाला महाराष्ट्रातील सगळी चांगली चित्रपटगृहं आणि चांगले ‘टायमिंग्ज’ मिळाले. व्यावसायिक हिंदी चित्रपट दाखवून चित्रपटगृह रिकामं ठेवण्यापेक्षा चालणारा मराठी सिनेमा आपल्या चित्रपटगृहामध्ये कोण लावणार नाही ? परंतु, हल्ली नकारार्थी विचार करण्याकडेच आपला कल वाढला आहे. त्यामुळे मराठी चित्रपटांच्या अपयशाची कारणमीमांसा करताना एक हक्काचं कारण म्हणून चित्रपटगृहांच्या ‘टायमिंग’चं कारण पुढं केलं जातं. परंतु, ते किती खोटं आहे हे ‘काकस्पर्श’च्या यशानं सिद्ध झालं आहे.
‘काकस्पर्श’च्या यशामागचं आणखी एक ठळक कारण म्हणजे ‘झी मराठी’ वाहिनीनं या चित्रपटाला दिलेला पाठिंबा. मालिका आणि ‘रिऍलिटी शोज’मधील रेटिंगमध्ये भले ही वाहिनी आपल्या स्पर्धकांच्या थोडी मागं पडली असेल. परंतु, या वाहिनीनं आपली सगळी ताकद ‘काकस्पर्श’च्या मागं उभी केली. आपली एकही मालिका किंवा ‘रिऍलिटी शो’ या वाहिनीनं सोडला नाही की ज्यावर या चित्रपटाची प्रसिद्धी झाली नाही. मुळात ‘काकस्पर्श’ हा काही ‘गोलमाल सिरीज’ किंवा आमिर खानचा नवीन चित्रपट नव्हता की प्रेक्षकांनी प्रदर्शनाच्या दिवशीच त्याच्यावर उड्या टाकाव्यात. तसेच चित्रपटाच्या शीर्षकामध्येही नकारात्मकता अगदी स्पष्ट दिसत होती. कोणत्याही चित्रपटाला चित्रपटगृहांमध्ये ‘लॉंग इनिंग’ खेळायची असेल तर त्याची ‘माऊथपब्लिसिटी’ चांगली होणं खूप महत्त्वाची असते. ‘झी’नं नेमकं हे काम अत्यंत चांगल्या पद्धतीनं केलं. या चित्रपटाच्या ‘प्रोमोज’चा, जाहिरातींचा, त्यातील कलाकारांच्या वेगवेगळ्या मालिकांच्या सेटवर जाण्याचा एवढा मारा झाला की प्रेक्षकांना ‘काकस्पर्श’ आता बघण्यापासून दुसरा पर्याय नाही, असंच वाटायला लागलं. ‘काकस्पर्श’ प्रदर्शित होण्यापूर्वी प्रेक्षकांचीही मानसिकता थोडी लक्षात घ्यायला हवी. हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा मे महिन्याची सुट्टी सुरू झाली होती. मराठी तर जाऊदे पण चांगला हिंदी चित्रपटही प्रेक्षकांना पाहायला मिळाला नव्हता. ‘आयपीएल’च्या ‘ओव्हरडोस’नं प्रेक्षकही कंटाळले होते. थोडक्यात प्रेक्षकांना आपल्या खिशातले पैसे खर्च करून चित्रपटगृहात जाऊन काहीतरी चांगलं पाहायचं होतं. त्यामुळे एखाद्या कलाकृतीच्या यशामध्ये त्याच्या प्रदर्शनाचं ‘टायमिंग’देखील किती महत्त्वाचं असतं, ते या चित्रपटामुळे पुन्हा एकदा सिद्ध झालं.
‘काकस्पर्श’च्या यशाला कारणीभूत असलेल्या या काही तांत्रिक गोष्टी. परंतु, प्रत्यक्ष कलावंतांची कामगिरीही तितकीच लक्षणीय होती. गिरीश जोशीसारखा चांगला लेखक या कलाकृतीमुळे झळाळून निघाला हे खूप चांगलं झालं. ज्या पटकथेसाठी सचिन खेडेकर आणि गिरीश जोशी यांनी निर्मात्यांचे उंबरठे झिजवले, तीच कलाकृती एवढी लोकप्रिय ठरली. ज्या चित्रपटाच्या पटकथेत गाणी कुठं आहेत, असा प्रश्न दिग्दर्शक महेश मांजरेकरांना पडला होता. त्याच मांजरेकरांना प्रेक्षकांच्या आग्रहास्तव या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर काही दिवसांनी त्याची ध्वनीफित प्रकाशित करावी लागली. खरोखरीच या चित्रपटसृष्टीत कसलेही आडाखे बांधता येत नाहीत. सचिन खेडेकर आणि महेश मांजरेकर या दोन नावांशी आता विश्वासाचं नातं जोडलं गेलंय. या विश्वासाला ही जोडी जागल्यामुळे ही कलाकृती खरी बनली. ‘बॉक्स ऑफिस’साठी ओढून ताणून कराव्या लागणार्या क्लृप्त्या त्यात नव्हत्या. जे काही होतं ते प्रामाणिक होतं. ‘स्ट्रेट फ्रॉम द हार्ट’ होतं. हीच गोष्ट कदाचित प्रेक्षकांना भावली असावी. अशा कलाकृती आता वारंवार बनाव्यात एवढीच अपेक्षा प्रेक्षकांकडून आहे.
- मंदार जोशी
--------------Mandar Joshihttp://www.blogger.com/profile/17017614789313998938noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-6424345992684415946.post-64771813095470526372012-06-16T23:17:00.001-07:002012-06-16T23:17:25.023-07:00‘स्टार्स’ जमीन पर...‘पुढारी’च्या बहार पुरवणीमधील माझा ताजा लेख
--------
‘स्टार्स’ जमीन पर...
-------
गेल्या आठवड्यात एक आक्रीत घडलं. दिबाकर बॅनर्जीच्या ‘शांघाय’ चित्रपटाला प्रदर्शित होण्यापूर्वीच समीक्षकांनी डोक्यावर उचलून घेतलं. अक्षरशः खिरापत वाटल्यासारखे ‘स्टार्स’ समीक्षकांकडून वाटले गेले. विशेषतः इंग्रजी वर्तमानपत्रांनी तर या चित्रपटावर अधिकच आपली कृपानजर केली. चार ‘स्टार्स’च्या खाली ‘स्टार’ देणे हा गुन्हा आहे, असं समजून सर्वांनी ‘स्टार्स’ वाटले. या चित्रपटाची परीक्षणं वाचताना अनेक वेळी दिबाकर बॅनर्जीला या मंडळींनी व्ही. शांताराम, सत्यजित रे, विजय आनंद यांच्यासारख्या दिग्गज दिग्दर्शकांच्या रांगेतच नेऊन बसवलंय, त्याचा भास झाला. इम्रान हाश्मी या कलाकाराचा अभिनय किती ‘ग्रेट लेव्हल’ला गेलाय, अशी धक्कादायक मनोरंजक माहितीदेखील वाचायला मिळाली. सर्वसाधारणपणे समीक्षकही माणूस असल्यामुळे त्याच्याही आवडीनिवडी वेगळ्या असतात. त्यामुळे बहुतेक चित्रपटांबाबत समीक्षकांमध्ये कधीच एकमत आढळत नाही. कोण दोन स्टार देतो, तर कोण तीन... पण ‘शांघाय’बाबत अतिरेकच घडला. आता एवढ्या तार्यांचा मारा झाला असताना ‘शांघाय’ किमान हिट तरी होणं आवश्यक होतं. पण झालं भरलंच. हा चित्रपट प्रदर्शनानंतर जेमतेम ३० टक्के व्यवसाय करू शकला आहे. अनेक ठिकाणी या चित्रपटाला ‘बॉक्स ऑफिसवर’ १५ टक्क्यांचीही मजल मारता आलेली नाही. ‘शांघाय’ला या मिळालेल्या ‘स्टार्स’ची पान पान भरून इंग्रजी वर्तमानपत्रांमध्ये जाहिरातही करण्यात आली. परंतु, तरीदेखील त्याचा परिणाम काही प्रेक्षकांवर झाला नाही.
एकीकडे ‘शांघाय’ला नाकारणार्या प्रेक्षकांनी अक्षयकुमारच्या ‘रावडी राठोड’वरील प्रेमात थोडीही कुचराई केली नाही. या चित्रपटानं अपेक्षेप्रमाणे शंभर कोटींचा टप्पा ओलांडला. तेव्हा प्रेक्षकांना फक्त मनोरंजनच हवंय, अशीही ओरड काहींनी केली. थोडं तटस्थपणे या संपूर्ण घटनाक्रमाकडे पाहायला गेल्याचं ठरवल्यास काही वेगळ्या गोष्टी नजरेसमोर येतात. इंग्रजी समीक्षकांची मानसिकताच अनेकदा समजत नाही. कोणत्याही इंग्रजी वर्तमानपत्रामधील समीक्षा वाचून संबंधित चित्रपटाचा कसलाच अंदाज प्रेक्षकाला बांधता येत नाही. दिबाकर बॅनर्जीचा ‘ओये लक्की लक्की ओये’ या साधारण चित्रपटालाही समीक्षकांनी यापूर्वी डोक्यावर घेतलं होतं. विशेष म्हणजे ‘शांघाय’ हा चित्रपट मी या इंग्रजी समीक्षकांसमवेतच पाहिला आणि बर्याच दृश्यांमध्ये माझ्याकडून कसलीच प्रतिक्रिया येत नसताना ही इंग्रजी समीक्षक मंडळी टाळ्या वाजवत होती, अधूनमधून ओरडत होती. याच वेळी मला ‘शांघाय’वर ‘स्टार्स’चा वर्षाव होणार असल्याचा अंदाज आला होता आणि शेवटी तो खरा ठरला. ‘शांघाय’ हा निश्चितच एक वेगळा चित्रपट आहे. परंतु, तो सर्वसामान्य प्रेक्षकाच्या डोक्यावरून जातो, हे सत्य नाकारता येत नाही.
अलीकडच्या काळात चित्रपट समीक्षेत कोणते मुद्दे मांडलेत यापेक्षा त्याला कोणी किती ‘स्टार्स’ दिलेत, याला अधिक महत्त्व आलंय. ‘स्टार्स’चं हे महत्त्व एवढं ठसलं गेलंय की हल्ली प्रेक्षकवर्गदेखील चित्रपटाची समीक्षा वाचण्याच्या फंदात पडत नाही. चित्रपटाला मिळालेले ‘स्टार्स’ पाहून तो ते वाचायचं की नाही, याचा निर्णय घेतो. चित्रपटसृष्टीतील मंडळीदेखील या ‘स्टार्स’च्या संख्येला अधिक महत्त्व देतात. आपल्या प्रतिस्पर्धी गटातील कलावंताच्या चित्रपटाला कमी स्टार्स मिळाले की ही मंडळी आनंदतात. परंतु, आपल्याही आयुष्यात एखादा शुक्रवार येणार आहे, याची आठवण त्यांना त्यावेळी तरी होत नाही. मराठीत अजूनपर्यंत समीक्षणाच्या ‘स्टार्स’ला तेवढं महत्त्व आलेलं नाही हे खरंय. परंतु, हा प्रवास त्याच दिशेनं सुरू झाला आहे. मराठीत हल्ली वर्तमानपत्रांपेक्षा मुंबईतील एका खासगी एफ.एम. केंद्रावरील समीक्षेला अधिक महत्त्व आलंय. त्यामागचं कारण म्हणजे या एफएम वाहिनीचा ‘आरजे’ आपलं रेटिंग किमान तीन या आकड्यापासून सुरू करतो. त्यामुळे हल्ली निर्माते मंडळींचा तो एक आधारस्तंभ बनल्याचं बोलंय जातं. त्याच्या आगमनाखेरीज ‘प्रेस शो’ सुरू केला जात नाही. गेल्या दोन एक वर्षातलं सर्वसाधारण ‘ऍव्हरेज’ काढायचं झालं तर या ‘आरजे’नं बहुतेक चित्रपटांना किमान तीन ते चार स्टार्स दिले आहेत आणि बहुतांशी चित्रपट प्रेक्षकांनी नाकारले आहेत. मराठी चित्रपटांना प्रेक्षकांच्या पाठिंब्याची गरज आहे हे खरंय. परंतु, अशा पद्धतीनं चित्रपटांना पाठिंबा मिळणं हेदेखील गैर नाही का ?
थोडक्यात ‘शांघाय’च्या निमित्तानं चित्रपट समीक्षा ही गांभीर्यानं घ्यावी का, याचा विचार करण्याची वेळ आलीय. त्यामागे अनेक कारणं आहेत. सर्वात मोठं कारण म्हणजे समीक्षकांच्या लेखनाचा दर्जा आणि अनुभव. वर्तमानपत्रामधील सर्वात दुर्लक्षित अंग म्हणजे चित्रपट पत्रकारिता आहे. अशाप्रकारच्या पत्रकारितेसाठी गुणवत्ता असावी लागते, याचा विसर माध्यमांनाच पडला आहे. त्यामुळे समीक्षकाच्या खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीची गुणवत्ता तपासली जात नाही आणि मग नंतर अपघात घडतात. अनेकांच्या मते चित्रपट समीक्षा ही आता कालबाह्य गोष्ट झाली आहे. आताचा प्रेक्षक हुशार आणि सुजाण आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याच्या आधीच त्याचा संबंधित चित्रपट पाहावा की नाही, याबद्दल निर्णय झालेला असतो. एखादा प्रेक्षक जर सलमान खान आणि आमिर खानचा चाहता असेल तर त्याच्या दृष्टीनं समीक्षकाच्या समीक्षेला फारसं महत्त्व नसतं. समीक्षा नकारात्मक असली तरी तो चित्रपटगृहात जाऊन संबंधित चित्रपट पाहतोच. तसेच चित्रपट समीक्षेबद्दल चित्रपटसृष्टीमधील मंडळींकडून येणारा कौल हा सापेक्ष असतो. ज्याच्या चित्रपटाबद्दल चांगली समीक्षा प्रसिद्ध झाली असते, तेव्हा तो सातव्या अवकाशात असतो आणि समीक्षकांकडून टीकेचा भडिमार होतो तेव्हा माध्यमांमधून चित्रपट समीक्षा हा प्रकारच रद्द केला जावा, अशी मागणीही करायला तो मागेपुढे पहात नाही.
- मंदार जोशी
----------Mandar Joshihttp://www.blogger.com/profile/17017614789313998938noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-6424345992684415946.post-28015581763749180292011-12-03T22:50:00.001-08:002011-12-03T22:51:57.276-08:00जीवनातला आनंद गेला...<a onblur="try {parent.deselectBloggerImageGracefully();} catch(e) {}" href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjpI5LpSUt_1ABxNMENxLJRuKwqfc9txAL1sbNVXTm7dnJRrxwmoj30dom76OqBkCJfnr7xbzSvbRwlJ6hcLjMtrc-vUODwzZy7E5S1mCmNZz5iQK-54Vy9cjFoUkIJaDD-vj4lWgTeL54/s1600/devsab.jpg"><img style="display:block; margin:0px auto 10px; text-align:center;cursor:pointer; cursor:hand;width: 320px; height: 222px;" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjpI5LpSUt_1ABxNMENxLJRuKwqfc9txAL1sbNVXTm7dnJRrxwmoj30dom76OqBkCJfnr7xbzSvbRwlJ6hcLjMtrc-vUODwzZy7E5S1mCmNZz5iQK-54Vy9cjFoUkIJaDD-vj4lWgTeL54/s320/devsab.jpg" border="0" alt=""id="BLOGGER_PHOTO_ID_5682162056556766786" /></a><br />जीवनातला आनंद गेला...<br />देवसाहेबांच्या काही चांगल्या मुलाखती मला घेता आल्या. एक जबरदस्त कलाकार आणि माणूस म्हणजे देव आनंद. थोड्याच वेळात देवसाहेबांबरोबरचे माझे काही वेगळे अनुभव तुमच्याशी शेअर करतो.Mandar Joshihttp://www.blogger.com/profile/17017614789313998938noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-6424345992684415946.post-76975491662685838622011-12-03T00:18:00.000-08:002011-12-03T00:21:00.290-08:00क्रेझ ‘कोलावेरी डी’ची<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi0uoSCRseMbhqZbI_xZbMieQjjFdb6Ztzmja0SbtXkpglgaDu5Mb5JZkPNB7XL7qE9FZy1oTaNJ9GuSiQ4BWo-iu1wepip8QmFUWobXtWp8T0XWzWXncZTBqXWkXnncVz_5lDL4FYt_Po/s1600/kolaveri-song-making-photos-stills02.jpg"><img style="display:block; margin:0px auto 10px; text-align:center;cursor:pointer; cursor:hand;width: 220px; height: 320px;" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi0uoSCRseMbhqZbI_xZbMieQjjFdb6Ztzmja0SbtXkpglgaDu5Mb5JZkPNB7XL7qE9FZy1oTaNJ9GuSiQ4BWo-iu1wepip8QmFUWobXtWp8T0XWzWXncZTBqXWkXnncVz_5lDL4FYt_Po/s320/kolaveri-song-making-photos-stills02.jpg" border="0" alt=""id="BLOGGER_PHOTO_ID_5681814041795243426" /></a><br />-------<br />क्रेझ ‘कोलावेरी डी’ची<br />-------------<br />‘सातवे आसमान पे’ याचा खरा अर्थ कोणाला समजून घ्यायचा असेल तर त्यानं तमीळ स्टार धनुषला जाऊन चेन्नईला भेटावं. हा धनुष काही दक्षिणेतला फार मोठा कलाकार नाही. २८ वर्षांच्या या कलाकारच्या नावावर काही जेमतेम बरे चित्रपट जमा आहेत. किंबहुना सुपरस्टार रजनीकांतचा जावई अशीच त्याची आजवरची ओळख आहे. परंतु, त्याची ही ओळख आता जुनी झाली आहे. त्याला कारणीभूत ठरलंय ते अवघ्या पंधरवड्यापूर्वी आलेलं ‘कोलावेरी डी’ हे गाणं. एवढ्या कमी कालावधीत या गाण्याला ‘यू ट्यूब’वर सुमारे एक कोटी हिट्स मिळाल्या आहेत. हा आजवरचा उच्चांक मानला जातोय. फेसबुक, ट्विटरवरही हे गाणं सध्या फिरतंय. खासगी एफएम स्टेशन्सच्या आरजेंनी तर या गाण्याला उचलून धरलंय. दर तासाला प्रत्येक स्टेशनवर हे गाणं वाजवलं जातंय. सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यापासून ते खेडेगावातील एखादा अशिक्षितापर्यंतचा फॅनवर्ग या गाण्याला मिळालाय. असं भाग्य एखाद्याच गाण्याला किंवा गायकाला लाभतं.<br /><br />आगामी ‘थ्री’ या तमीळ चित्रपटामधील हे गाणं आहे. रजनीकांतची मुलगी ऐश्वर्या रजनीकांतनं हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाला संगीत दिलं आहे ते अनिरूद्ध रवीचंदर या नव्या दमाच्या संगीतकारानं. सध्या तरुणाईची ओढ ही स्थानिक भाषेऐवजी इंग्रजीकडे अधिक आहे. त्यामुळेच हल्लीच्या गाण्यांमध्ये इंग्रजीचा सर्रास वापर होताना दिसून येत आहे. ‘हिंग्लिंश’ (हिंदी आणि इंग्रजी), ‘मिंग्लिश’ (मराठी आणि इंग्रजी) हा प्रकार आजवर माहित होता. परंतु, या गाण्याच्या निमित्तानं ‘तंग्लिश’ (तमीळ आणि इंग्लिश) हा नवीन प्रकार रूढ झाला आहे. हे गाणं खुद्द धनुष यानं लिहिलं आणि गायलं आहे. एका प्रेमभंग झालेल्या तरुणाच्या मनातील भावना या गाण्यात व्यक्त करण्यात आली आहे. वास्तविक धनुष हा काही ‘प्रोफेशनल’ गायक किंवा गीतकार नाही. एका मुलाखतीमध्ये त्यानं स्वतःची ओळख बाथरूम सिंगर अशीच करून दिली आहे. तसेच अभिनेता हीच आपली खरी ओळख असून काव्यलेखन हे आपण फावल्या वेळेत करतो, असंही त्यानं म्हटलं आहे. परंतु, त्याच्या या फावल्या वेळातील कामगिरीनं त्याला अभूतपूर्व असं यश आणि स्टारडम मिळवून दिलं आहे. खुद्द धनुषला या गाण्याला मिळालेल्या लोकप्रियतेमुळे मोठा धक्का बसला आहे. परंतु, त्यानंही विनम्रपणे हे गाणं आपल्या हातून घडून गेल्याची कबुली दिलीय. या गाण्यातील शब्द हे रोजच्या वापरातील आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना हे गाणं आपलं वाटण्यासाठी एखादा ‘रॉ’ आवाज निर्माता-दिग्दर्शकाला हवा होता. त्यामुळेच गायनात फार मोठी मजल न मारलेल्या धनुषचा आवाज वापरण्यात आला.<br /><br />या गाण्याचं ध्वनिमुद्रण झालं ते चेन्नईमध्ये. यावेळी धनुषसह त्याची पत्नी ऐश्वर्या, संगीतकार अनिरूद्ध रवीचंदर आणि या चित्रपटाची नायिका श्रृती हसन उपस्थित होती. त्यावेळी यापैकी कोणालाच हे गाणं लोकप्रियतेचा इतिहास घडवेल याची कल्पना आली नव्हती. ‘कोलावेरी डी’ची लोकप्रियता सध्या एवढी वाढलीय की त्याच्या व्यापारीकरणासही सुरुवात झाली आहे. ‘कोलावेरी डी’ हा शब्द असलेले टी शर्टस् लवकरच बाजारामध्ये विक्रीसाठी येणार आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे एखादा नवीन चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर असला की निर्मात्यांतर्फे चित्रपटाच्या प्रसिद्धी मोहिमेचा एक भाग म्हणून अशाप्रकारच्या कल्पना लढविल्या जातात. परंतु, एखाद्या गाण्याला मिळालेलं यश पाहून बाजारधुरिणांकडूनच निर्मात्यांना अशाप्रकारचं ‘मर्चंडायजिंग’ करण्याची गळ घातली गेली आहे. <br /><br />या गाण्याची चाल इतकी सहजसोपी आणि ‘कॅची’ आहे की अनेकांना ते ऐकताना त्यावर नृत्य करण्याचा मोह आवरत नाही. ‘यू ट्यूब’वर या गाण्याचे मेकिंग ‘पोस्ट’ झाले आहे. प्रत्यक्षात चित्रपटामधील गाणं अजून कोणालाही पाहायला मिळालेलं नाही. परंतु, तरीदेखील काहींनी या गाण्यावर स्वतः नृत्य करीत त्याचे व्हिडीओज ‘यू ट्यूब’वर अपलोड केले आहेत आणि त्यालादेखील इंटरनेटवर भरपूर हिट्स मिळाल्या आहेत. विशेष म्हणजे चिनी, जपानी लोकांनाही हे गाणं खूप भावलं आहे. नायकानं गायलेली गाणी हिट होण्याचं हे काही पहिलंच उदाहरण नाही. सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यापासून हा ट्रेंड सुरू झालाय. अमिताभचं ‘मेरे अंगनेमें’ हे गाणं गाजलं आणि नायकांचा आवाज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरू लागली. अभिनेता आमिर खानच्या ‘आती क्या खंडाला’ (चित्रपट ः गुलाम) या गाण्यानंही साधारण १२-१३ वर्षांपूर्वी मोठी लोकप्रियता मिळवली. परंतु, अवघ्या १५ दिवसांमध्ये ‘कोलावेली डी’नं जो झंझावात घडवला, तो अभूतपूर्वच म्हणायला हवा. ‘कोलावेरी’चे शब्द आणि त्याला संगीतकारानं दिलेली चाल ही काही गीत-संगीताच्या दृष्टीनं ‘ग्रेट’ नाही. परंतु, रसिकांना कधी काय आवडेल, याचा भरवसा नसतो. ‘कोलावेरी डी’नं हीच गोष्ट पुन्हा एकदा अधोरेखित केलीय. आता पाहूया, प्रत्यक्ष चित्रपटात हे गाणं किती धमाल उडवून देतंय ते.<br />- मंदार जोशी<br />----------------Mandar Joshihttp://www.blogger.com/profile/17017614789313998938noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-6424345992684415946.post-79196648842955234602011-07-19T03:35:00.000-07:002011-07-19T03:42:54.717-07:00नटसम्राट<a onblur="try {parent.deselectBloggerImageGracefully();} catch(e) {}" href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEje3dzKYlFenm4Q595uvTy4f0M_pu6N9KHOZyqXe_hAYQ5PoNowxgzEvMbt02Ij1fpRtj5co9paCF7fJrAwblJPoRHccuBfJe7fRt8T5wZSlNvHnl2fF13RklAPU9n4gL7-xGLzql5Ge1E/s1600/nilu+phule+1.jpg"><img style="display:block; margin:0px auto 10px; text-align:center;cursor:pointer; cursor:hand;width: 256px; height: 320px;" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEje3dzKYlFenm4Q595uvTy4f0M_pu6N9KHOZyqXe_hAYQ5PoNowxgzEvMbt02Ij1fpRtj5co9paCF7fJrAwblJPoRHccuBfJe7fRt8T5wZSlNvHnl2fF13RklAPU9n4gL7-xGLzql5Ge1E/s320/nilu+phule+1.jpg" border="0" alt=""id="BLOGGER_PHOTO_ID_5631011966338202594" /></a><br />नटसम्राट<br />---------<br />"नटसम्राट' हे नाटक साकारण्याची प्रत्येक प्रतिभावंत कलावंताची इच्छा असते. परंतु, "नटसम्राट' न साकारताही नीळकंठ कृष्णाजी फुले नावाचा एक कलाकार "नटसम्राट' बनला. प्रेक्षकांनी त्यांच्यावर उदंड प्रेम केलं. एवढं की खलनायकी व्यक्तिरेखांमुळे स्त्रियांचा अनेकदा रोषही त्यांना पत्करावा लागला. भूमिका कोणतीही द्या, तिचं सोनं करण्याची खात्री देणारा हा कलावंत होता. पुढारी, पाटील, सावकार, बॅंक-साखर कारखाना चेअरमन... या भूमिका निळूभाऊ अक्षरशः जगले. एका कलावंतामध्ये किती वेगवेगळी रूपं दडलेली असतात, याचं ते सर्वोत्तम उदाहरण होते.<br /><br />निळूभाऊंचा जन्म म्हटला तर एका सामान्य कुटुंबातला आणि म्हटला तर एका असामान्य कुटुंबातला. कारण, त्यांच्या घराण्याचं मूळ थेट महात्मा जोतिबा फुले यांच्याशी निगडीत. निळूभाऊंचं एकत्र कुटुंब. घरात सख्खी अकरा भावंडं. त्यांचं बालपण गेलं ते मध्यप्रदेश आणि विदर्भात. घरचं वातावरण स्वातंत्र्य चळवळीला अनुकूल होतं. निळूभाऊंचे वडील भाजीपाला विक्रीच्या व्यवसायात होते. त्यांचे थोरले बंधू स्वातंत्र्यसैनिक होते. चित्रपटाशी निळूभाऊंचा संबंध आला तो खामगावमध्ये. इथंच त्यांनी आपल्या आयुष्यातला पहिला चित्रपट पाहिला. परंतु, त्यावेळी त्यांना या क्षेत्रामध्ये आपली मोठी कारकीर्द घडेल, असं काही वाटलं नव्हतं. 1945 मध्ये निळूभाऊ पुण्यात आले. सेवादलाशी संलग्न असलेल्या बाबूराव जगताप यांचं मार्गदर्शन यावेळी त्यांना लाभलं आणि तिथून ते सेवादलाच्या कार्याशी निगडीत झाले. सुरुवात केली ती कलापथकापासून. कालांतरानं या पथकाचे ते प्रमुखही झाले. सेवादलातल्या भाऊसाहेब रानडे यांच्याकडून ते बरंच काही शिकले. ग. प्र. प्रधान यांचा सहवास लाभल्यामुळे त्यांचं आयुष्य समृद्ध झालं. इथं काम करत असताना निळूभाऊंना पहिल्यांदा नट होण्याची इच्छा झाली. दहावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर त्यांना पुढं शिकण्याची इच्छाच झाली नाही आणि त्यांनी आर्मड् फोर्सेस वैद्यकीय महाविद्यालयात माळ्याची नोकरी स्वीकारली. ही नोकरी त्यांनी अवघ्या 80 रुपये मासिक पगारावर तब्बल दहा वर्षं केली. आपल्या कारकिर्दीची सुरुवात निळूभाऊंनी "येरा गबाळ्याचे काम नोहे' या वगलेखनापासून केली. पु. ल. देशपांडे यांच्या "पुढारी पाहिजे'मधील त्यांनी साकारलेली रोंग्याची भूमिका खूप गाजली. या नाटकाचे सहा वर्षांत तब्बल सहाशे प्रयोग झाले. याचवेळी त्यांनी "बिनबियांचे झाड', "कुणाचा कुणाला मेळ नाही' यासारख्या नाटकांमधूनही कामं केली. मा<br />त्र, त्यांच्यात दडलेल्या उत्तुंग अभिनयाचं दर्शन घडलं ते "कथा अकलेल्या कांद्याची' या वगनाट्यामधून. यातील भजनवल्ली अविचतरावांच्या भूमिकेचं त्यांनी सोनं केलं. निळूभाऊंच्या चित्रपटसृष्टीतील पदार्पणास हेच वगनाट्य कारणीभूत ठरलं.<br /><br />निळूभाऊंच्या आयुष्यात टर्निंग पॉईंट ठरलेलं वर्ष म्हणजे 1964. या काळात समाजवादी पक्षात दुफळी माजली. वाराणशीमधील अधिवेशनात बडबड झाल्यामुळे निळूभाऊ प्रचंड नाराज झाले. या अस्वस्थ मानसिकतेमधून त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर काम करण्याचं ठरविलं. पक्षाचा पूर्ण वेळ कार्यकर्ता असलेली चौकट त्यांना परिस्थितीमुळे मोडावी लागली. पुढे विख्यात दिग्दर्शक अनंत माने यांनी ही भूमिका पाहून "एक गाव बारा भानगडी'मधील झेलेअण्णांची व्यक्तिरेखा निळूभाऊंना दिली. या भूमिकेनं पुढं इतिहास घडविला आणि निळूभाऊंच्या अभिनयाची जादू प्रेक्षकांवर पसरली. अर्थात, ही भूमिका यशस्वी करण्यासाठी निळूभाऊंनी तेवढेच कष्ट घेतले. भूमिकेत घुसण्याचं कसब त्यांना पहिल्यापासूनच साधलं होतं. "एक गाव...'चे लेखक शंकर पाटील यांची मदत घेत निळूभाऊंनी या व्यक्तिरेखेची तब्बल आठ-दहा वर्षं रंगीत तालीम केली. भूमिकेमधील इब्लिसपणा, संवादांमधील मोक्याच्या जागा, अचूक संवादफेक, चेहऱ्यावर सतत बदलत जाणाऱ्या हावभावांमुळे निळूभाऊ प्रत्येक भूमिकेवर स्वार झाले आणि प्रेक्षकांचं तब्बल चार दशके त्यांनी मनोरंजन केलं. या चार दशकांच्या प्रवासात त्यांनी जवळपास 140 चित्रपटांमध्ये अभिनय केला. 1970 ते 1990 ही दोन दशकं निळूभाऊंनी साकारलेल्या पाटीलकीनं गाजवली. "सामना', "सिंहासन', "चोरीचा मामला', "शापीत', "पुढचं पाऊल' या चित्रपटामधील त्यांच्या भूमिका खूप गाजल्या. "सामना'मधील हिंदुराव धोंडो पाटील या भूमिकेनं त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊन ठेवलं. "सूनबाई घर तुझंच आहे' हे नाटक करीत असताना निळूभाऊंची भेट रजनी मुथा यांच्याशी झाली आणि कालांतरानं त्या त्यांच्या जीवनसाथी झाल्या.<br /><br />निळूभाऊंनी नाट्यसृष्टीसाठी दिलेलं योगदानही तेवढंच महत्त्वाचं आहे. "सखाराम बाईंडर', "सूर्यास्त', "बेबी' ही नाटकं त्यांनी गाजवली. नाटकांच्या प्रयोगांसाठी त्यांनी प्रचंड कष्ट केले. त्या काळात आलिशान गाड्या नव्हत्या. साध्या बसमधून प्रवास करावा लागायचा. निळूभाऊ असा प्रवास नेहमी करायचे. एवढा मोठा कलावंत असूनही बसमध्येच ते झोपायचे. बऱ्याचदा प्रवासात बस बंद पडे. मग त्यातून उतरून दुसऱ्या ट्रक-टेम्पोमधून प्रवास करण्यासही त्यांची तयारी असे. कधीकधी बंद पडलेल्या बसला धक्का देण्याचंही काम त्यांनी केलं आहे. "डाऊन टू अर्थ' प्रकारात मोडणारा हा अभिनेता होता. जेवणा-खाण्याचे कसलेही चोचले नसत. एखाद्या गावात शूटिंग असलं की कोणत्याही घरातली मीठभाकरी त्यांना चाले.<br /><br />अभिनयाबरोबर निळूभाऊ रमले ते समाजकारणात. राष्ट्र सेवादल आणि समाजवादी पक्षाचं त्यांनी मनापासून काम केलं. राजकारणात त्यांची स्वतःची अगदी ठाम मतं होती. राजकारणात गेलं की माणूस निगरगट्ट होतो, हे त्यांच्या मनावर अगदी पक्कं कोरलं गेलं होतं. म्हणूनच कोणतंही पद न घेता ते आनंदानं तिसऱ्या फळीत राहायचे. निवडणुकांदरम्यान ते गावोगाव फिरायचे. उत्तम भाषणं करून सभा जिंकण्यात तर त्यांना खूपच आनंद मिळायचा. सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्याबरोबर त्यांनी चित्रपटांमध्ये कामं केली. परंतु, बोफोर्स प्रकरणात अमिताभचं नाव गोवलं गेल्यानंतर त्याच्याविरूद्ध निवडणुकीत प्रचार करण्यासही त्यांनी मागेपुढे पाहिलं नव्हतं. अंधश्रद्धा निर्मूलन, मुस्लिम सत्यशोधक समाज, हमाल पंचायत चळवळ, शेतमजूर, देवदासी आदींसाठी त्यांनी मदत केली. नाटकांच्या प्रयोगामधून मिळणारं उत्पन्न ते सामाजिक कृतज्ञता निधीत जमा करायचे आणि पुढे त्याचा उपयोग त्यांनी समाजपयोगी कामांसाठीच केला.<br /><br />निळूभाऊंनी मराठी नाट्य-चित्रपटसृष्टी गाजविल्यानंतर हिंदी चित्रपटांमधूनही काही भूमिका केल्या. बहुसंख्य कलाकार आपल्यातल्या त्रुटी झाकण्याचा प्रयत्न करतात. परंतु, निळूभाऊ त्यालाही अपवाद ठरले. "मला हिंदी नीट बोलता येत नाही,' असं प्रांजळ कथन त्यांनी केलं होतं. तरीदेखील त्यांना भरपूर हिंदी चित्रपट मिळाले. परंतु, या ग्लॅमर दुनियेत ते फारसे रमले नाहीत. मुंबईतल्या जुहू किंवा लोखंडवालासारख्या आलिशान वस्तीत त्यांना राहणं सहज शक्य होतं. परंतु, त्यांनी शहरातला आपला बाडबिस्तारा आवरून निसर्गरम्य अशा ठिकाणी आपलं वास्तव्य केलं. ज्या माळीकामापासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली, ते माळीकाम आयुष्याच्या शेवटपर्यंत त्यांनी सुरू ठेवलं. लोकप्रियतेच्या शिखरावर राहूनही त्यांच्या डोक्यात कधी हवा गेली नाही. त्यांचे पाय कायम जमिनीवरच होते. एखाद्या कार्यक्रमाला गेले की रिक्षातून उतरल्यानंतर स्वतः ते सहजतेनं पैसे देत. निळूभाऊ नट म्हणून मोठे होते की माणूस म्हणून हा प्रश्न अनेकांना पडला. अर्थात त्याचं उत्तर कधीच मिळालं नाही.<br />- मंदार जोशी<br />-----------------<br />निळू फुले जीवनपट...<br />जन्म ः 1930<br />मृत्यू ः 13 जुलै 2009<br />उल्लेखनीय चित्रपट ः एक गाव बारा भानगडी, सामना, सोबती, चोरीचा मामला, सहकार सम्राट, सासुरवाशीण, पिंजरा, शापीत<br />उल्लेखनीय नाटके ः सूर्यास्त, सखाराम बाईंडर, जंगली कबूतर, बेबी<br />अभिनयाव्यतिरिक्त इतर छंद ः बागकाम<br />आवडते कलाकार ः नसिरुद्दीन शाह, ओमपुरीMandar Joshihttp://www.blogger.com/profile/17017614789313998938noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-6424345992684415946.post-15342199929907107912011-07-04T00:14:00.000-07:002011-07-04T00:15:34.111-07:00कधी जात्यात; कधी सुपातकधी जात्यात; कधी सुपात<br /><br />यशाच्या कैफात धुंद होऊन विजेत्यांना डोक्यावर घेण्याची आणि अपयशाचं चक्र आलं की पराभूतांचं खच्चीकरण करण्याची मानसिकता आजही आपल्याकडे कायम आहे. राष्ट्रीय पुरस्कार जाहीर होण्यापूर्वी मराठी चित्रपटसृष्टीतील काही मान्यवरांशी अनौपचारिक चर्चा करण्याचा योग आला. यावेळी बहुतेकांनी मराठी चित्रपटांच्या वाट्याला सातत्यानं मिळणाऱ्या अपयशाबद्दल चिंता व्यक्त केली. एवढ्यावरच न थांबता मराठी चित्रपटसृष्टीचं आता काही खरं नाही, असा टोकाचा सूरही लावला. काही दिवस जातायत न् जातायत तोच राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपटांनी बाजी मारल्याची बातमी आली आणि याच मंडळींचा बोलण्याचा सूर पुन्हा बदलला. मराठी चित्रपटसृष्टीची ही सर्वाधिक चांगली "फेज' असल्याच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. लगोलग कलाकारांचे सत्कार होऊ लागले. मराठी चित्रपटसृष्टीच्या भरभराटीबद्दल चर्चासत्रंही आयोजित होऊ लागली. त्यापुढे मजल मारत काही बालकलाकारांना घरं मिळवून देण्यासाठी "मीडिया'नं पुढाकार घेतला आणि काही नगरपालिकांनी कागदोपत्री घोडे नाचवत, तशी घरं मंजूर झाल्याच्या बातम्याही वर्तमानपत्रांमधून प्रसिद्ध झाल्या. थोडक्यात, मराठी चित्रपटसृष्टी कधी जात्यात; तर कधी सुपात असते. एवढ्या टोकाचा भाबडेपणा आपल्याकडे सातत्यानं पाहायला मिळतोय आणि तोच आपल्या प्रगतीला मारक ठरतोय. <br /><br />राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपटांनी मिळविलेलं यश हे निश्चितच कौतुकास्पद आहे; परंतु त्या यशाचं कौतुक करताना इतर गोष्टींचं अवमूल्यन होता कामा नये, याची काळजी आपण सध्या घेताना दिसत नाही. मल्याळी, कानडी चित्रपटांची राष्ट्रीय पुरस्कारांमधील मक्तेदारी आपण मोडून काढल्याचा आपल्याला अभिमान वाटतो; मात्र सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळविणाऱ्या मल्याळी चित्रपटात कोणता विषय मांडलाय, हे जाणून घेण्यासही आपण इच्छुक नसतो. चित्रपट माध्यमावर मनापासून प्रेम करणारी मंडळीदेखील राष्ट्रीय पुरस्कारांवर आपल्या भाषेव्यतिरिक्त इतरांनी काम चमक दाखविलीय, याकडे लक्ष देत नाहीत. अर्थात, सरकारी यंत्रणाही त्याला तेवढीच जबाबदार आहे. सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय पुरस्कार मिळविणारे चित्रपट आपल्याकडे चित्रपटगृहांमधून क्वचितच प्रदर्शित केले जातात. "टीआरपी'च्या मागं लागलेल्या वाहिन्यादेखील अशा चित्रपटांना भीक घालत नाहीत. त्यामुळेच आपल्या आजूबाजूला नेमकं काय चाललंय, हे आपल्याला समजतच नाही. <br /><br />मराठी चित्रपटांपुढची आता सर्वात मोठी समस्या आहे ती वितरणाची आणि प्रसिद्धीची. अजूनही आपल्या चित्रपटांना मल्टिप्लेक्स आणि "सिंगल स्क्रीन' चित्रपटागृहांमध्ये चांगला वेळांचे "शोज' मिळत नाहीत; परंतु या समस्येवर कायमस्वरूपी मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जात नाही. सध्याचे आघाडीचे मराठीमधील अभिनेते आपला चित्रपट प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर असला की राजकीय पक्षांना हाताशी धरतात. आपल्या चित्रपटाला कसे चांगले "शोज' मिळाले नाहीत, याबद्दल ते वातावरण गरम करतात. परंतु प्रदर्शनानंतर दोन-तीन दिवसांमध्ये आपला चित्रपट "बॉक्स ऑफिस'वर नरम पडला की पुढचा चित्रपट येईपर्यंत हे कलाकार-निर्माते-दिग्दर्शक शांत बसतात. अशानं मराठी चित्रपट कसा काय पुढं जाणार? मराठी चित्रपटांच्या योग्य प्रदर्शन आणि वितरणासाठी ना राज्य सरकारवर दबाव टाकला जातो ना वितरक, प्रदर्शकांवर. त्यामुळे चांगला चित्रपट असूनही त्याला योग्य वेळेचे "शोज' मिळत नसल्याची खंत आपल्याला प्रत्येक वेळी ऐकायला मिळते. काही राजकीय पक्षांनी मराठी चित्रपटांच्या प्रगतीसाठी वेगळे प्रयत्न सुरू केले आहेत, असं म्हणतात; परंतु या प्रयत्नांचा वरील समस्यांचं निराकरण होण्यासाठी काही उपयोग झाल्याचं अजून तरी पाहायला मिळालेलं नाही.<br /><br />राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये बाजी मारलेले काही मराठी चित्रपट अजूनही प्रेक्षकांपर्यंत पोचण्याची वाट पाहताहेत. अशा चित्रपटांवर पुरस्कारांबरोबरच प्रेक्षकांच्या उड्या पडल्या तर त्या अधिक योग्य ठरतील. त्या दिवसाची आता आपण वाट पाहायला हवी.Mandar Joshihttp://www.blogger.com/profile/17017614789313998938noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-6424345992684415946.post-23858335200519700982011-06-28T05:40:00.000-07:002011-06-28T05:42:44.347-07:00<a onblur="try {parent.deselectBloggerImageGracefully();} catch(e) {}" href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjVpBWTnVHvueJZ8HTmVruPimLVH5LRaPb2hmlWbQw3R5s4yqJyhf1dS5_30s5TwVldUdfZj4ZGJfY_q0slBHdCpiZKMQzbP3JQmBemSzJrqSRLEfCuEAZKX1dna_qqxKBgPm-FF86vc4U/s1600/chandrakant.jpg"><img style="display:block; margin:0px auto 10px; text-align:center;cursor:pointer; cursor:hand;width: 207px; height: 320px;" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjVpBWTnVHvueJZ8HTmVruPimLVH5LRaPb2hmlWbQw3R5s4yqJyhf1dS5_30s5TwVldUdfZj4ZGJfY_q0slBHdCpiZKMQzbP3JQmBemSzJrqSRLEfCuEAZKX1dna_qqxKBgPm-FF86vc4U/s320/chandrakant.jpg" border="0" alt=""id="BLOGGER_PHOTO_ID_5623249952761774002" /></a><br />पौर्णिमेतलं शीतल चंद्रबिंब<br />----------<br />दिवंगत चित्रकार आणि अभिनेते चंद्रकांत मांडरे यांचं आयुष्य म्हणजे पौर्णिमेतल्या शीतल चंद्रासारखं होतं. आपल्या चित्रकला-अभिनय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माणुसकीच्या शीतल छायेनं तब्बल आठ दशकं रसिकांना न्हाऊ घातलं. अर्थात चंद्राप्रमाणे ते परप्रकाशी नव्हते. आपल्या कर्तृत्वानं त्यांनी मराठी चित्रपटसृष्टी आणि कलासृष्टी तर उजळवून टाकलीत. त्याशिवाय त्यांच्या सान्निध्यात जी जी माणसं आली, त्यांचं आयुष्यही उजवळून टाकण्यात ते यशस्वी ठरले.<br /><br />काय योगायोग आहे पाहा. कोल्हापुरातल्या शनिवार पेठेतल्या ज्या मातीच्या घरात चंद्रकांत यांचा जन्म झाला, ते घरदेखील चंद्रमौळी होतं. त्यांचं मूळ नाव गोपाळ मांडरे. चित्रकला आणि अभिनय त्याच्या रक्तातच होता. शाळेच्या दिवसांमध्ये हा गोपाळ खेडूत, वैदू, वासुदेवाच्या नकला करायचा. घरची परिस्थिती बेताची. त्यामुळे मॅट्रिकच्या पुढे काही त्याला जाता आलं नाही. हे दिवस प्रेमात पडण्याचे. गोपाळ या काळात प्रेमात पडला तो तालमीतल्या लाल मातीच्या. व्यायाम करून त्यानं शरीर कमावलं. तेच पुढं आयुष्यभर त्याच्या कामी आलं. गोपाळच्या वडिलांचं इंग्लिश टोप्या व अत्तर विकण्याचं दुकान होतं. या व्यवसायाव्यतिरिक्त गोपाळचे वडील नाटक-चित्रपटांचे शौकीन होते. बाबूराव पेंटर यांच्या "गजगौरी' मूकपटात त्यांनी धृतराष्ट्राची भूमिका साकारली होती. गोपाळच्या वडिलांमुळेच त्याला बाबूराव पेंटर आणि बाबा गजबर या दिग्गज व्यक्तिमत्त्वांच्या सान्निध्यात येण्याची संधी मिळाली. बाबा गजबरांकडे गोपाळनं सुरुवातीला चित्रकलेचे धडे घेतले. 1931-32मध्ये सांगलीत "बलवंत चित्रपट कंपनी' सुरू झाली होती. तिथे पडदे रंगविण्याचं काम गोपाळला मिळालं. पगार होता दरमहा पंधरा रुपये. परंतु, ही कंपनी बंद पडल्यामुळे गोपाळची नोकरी गेली. परंतु, इथं एक विलक्षण गोष्ट घडली होती. ज्योतिषाचा अभ्यास असणाऱ्या मा. दीनानाथांनी गोपाळचा हात बघून त्याचं भविष्य उज्ज्वल असल्याचं भाकीत केलं. ते पुढं काही वर्षांनी खरं ठरलं.<br /><br />विसाव्या वर्षी गोपाळला पोस्टर विभागातून बाहेर आणलं ते बाबूराव पेंटरांनी. त्याच्या डोक्यावरचा भरगच्च केशसंभार त्यांनी उतरवला आणि झिरो कट मारला. शेतकऱ्याचं आखूड धोतर, बंडी असा वेष त्यांच्या अंगावर चढविण्यात आला आणि त्याची सवय व्हावी म्हणून तब्बल महिनाभर तो तसाच ठेवण्यात आला. याचाच परिणाम म्हणजे "सावकारी पाश' या चित्रपटामधील गोपाळ यांचा अभिनय. गोपाळाचं "चंद्रकांत' असं नामकरण करण्यात विख्यात दिग्दर्शक भालजी पेंढारकर यांचा पुढाकार होता. "राजा गोपीचंद' या हिंदी चित्रपटासाठी भालजींनी चंद्रकांत यांची निवड केली होती. या चित्रपटासाठी गोपाळऐवजी "चंद्रकांत' हे नाव लावण्यात आलं. "सावकारी पाश' या मूकपटात शेतकऱ्याच्या मुलाचं जे काम शांतारामबापूंनी केलं, ते बोलपटात चंद्रकांत यांना करायला मिळालं. "सावकारी पाश' हा पहिला वास्तववादी चित्रपट आणि त्यात काम करण्याची संधी चंद्रकांतना लाभली. <br /><br />"जयमल्हार' चित्रपटातल्या भूमिकेसाठी बैलाच्या देखभालीपासून गाडी जुंपण्यापर्यंत सगळं काही ते शिकले. "थोरांताची कमळा' या चित्रपटासाठी घोडेस्वारी शिकले. व्ही. शांताराम यांनी "शेजारी' चित्रपटावेळी बैलगाडी चालवण्याची तसेच बैलांच्या मधोमध चालून त्यांना शेतावर नेण्याची प्रॅक्टिस कित्येक दिवस चंद्रकांतना करायला लावली. "छत्रपती शिवाजी' चित्रपटाच्या वेळी भालजींनी चंद्रकांतना विविध शिवचरित्रं वाचायला दिली. पन्हाळ्यावरून कडेकपारीवरून घोडदौड करायला लावली. त्यामुळे या चित्रपटातील चंद्रकांत यांचा शिवाजी ताठ कण्याचा आणि रूबाबदार वाटतो. डमी वापरण्यात कमीपणा वाटत असल्यामुळे धाडसाची कामं त्यांनी स्वतःच केली. <br /><br />व्ही. शांताराम यांच्या "शेजारी' या चित्रपटापासून चंद्रकांत "प्रभात'मध्ये पूर्ण वेळ नेकरी करू लागले आणि त्यानंतर त्यांनी अनेक हिंदी-मराठी निर्माता, दिग्दर्शकांकडे पौराणिक, ऐतिहासिक, कौटुंबिक, ग्रामीण, सामाजिक अशा शंभराहून अधिक चित्रपटांतून वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या. "युगे युगे मी वाट पाहिली', "पवनाकाठचा धोंडी', "संथ वाहते कृष्णामाई' या चित्रपटांसाठी त्यांना पुरस्कार लाभले. "खंडोबाची आण' या चित्रपटासाठी त्यांना सातव्या राज्य चित्रपट महोत्सवात उत्कृष्ट अभिनेता पुरस्कार लाभला. "रामराज्य' चित्रपटातील चंद्रकांतनी साकारलेला राम तर निव्वळ अविस्मरणीय ठरला. "स्वयंवर झाले सीतेचे'मध्ये तर ते रावण झाले होते. रामापासून रावणापर्यंतचा "ग्राफ' टिपणारा हा एकमेव कलावंत. केवळ सर्वसामान्य प्रेक्षकांनीच "रामराज्य' या चित्रपटाला डोक्यावर घेतलं नाही तर महात्मा गांधींनाही हा चित्रपट आवडला होता. म. गांधी यांनी पाहिलेला हा एकमेव चित्रपट. अमोल पालेकरांचा "बनगडवाडी' हा चंद्रकांत यांनी केलेला शेवटचा चित्रपट <br /><br />चंद्रकांत नुसता अभिनय करीत नसत. ते त्या व्यक्तिरेखेशी एकरूप होऊन जायचे. "भरतभेट' चित्रपटामध्ये रामाची भूमिका करताना चंद्रकांत यांचे सगळे अंग उघडे असे. चेहरा आणि शरीराचा रंग एकसारखा दिसावा यासाठी त्यांनी सगळ्या शरीराला मेकअप केला होता. मांडरे यांनी बोलपटाच्या आरंभकाळापासून चित्रपटांतून कामे केली. दादा गुंजाळ, दादासाहेब तोरणे, मा. विनायक, अंबपकर, शोभना समर्थ, लीलाबाई, रत्नमाला, सुलोचना, उषा मंत्री, कमला कोटणीस... अशा विविध मान्यवर कलावंतांचा सहवास त्यांना लाभला. चित्रपटाच्या झगमगत्या दुनियेत काम करत असूनही आपलं पहिलं प्रेम असणाऱ्या चित्रकलेची सोबत त्यांनी कधीच सोडली नाही. निसर्ग हाच श्वास मानून चित्रकलेची आराधना करणारे ते एक मनस्वी कलावंत होते. जलरंग हे त्यांचे आवडते माध्यम होते. पारदर्शक जलरंगातील निसर्ग चित्रणाबरोबर पावडर शेडिंग या लोप पावत चाललेल्या कलेला त्यांनी संजीवनी दिली. <br /><br />चंद्रकांत नेहमी म्हणायचे, "आपण जन्माला येताना काही घेऊन येत नाही, मरताना काही घेऊन जात नाही. जगताना लोकांसाठी, समाजासाठी करतो तीच आपली कमाई.' हे तत्त्वज्ञान चंद्रकांत अक्षरशः जगले. स्वतः चित्रीत केलेली 350 ते 400 चित्रे तसेच राहता बंगला त्यांनी 1984 मध्ये राज्य शासनाच्या स्वाधीन केला. त्यावेळी या चित्रांची किंमत 30 लाख रुपये होती आणि बंगल्याची किंमत वेगळीच. या त्यांच्या दातृत्वातूनच कोल्हापूर येथे "चंद्रकांत मांडरे कलासंग्रहालया'ची उभारणी झाली. या संग्रहालयातील चंद्रकांत यांनी काढलेलं केर्ली येथील चंद्रबिंबाचं चित्र अप्रतिम आहे. ते पाहताना हुबेहूब पौर्णिमेच्या चंद्रकिरणांचा भास होतो. चित्रकलेल्या वर्गांमध्ये ते विद्यार्थ्यांना निसर्गचित्रणे तसेच पावडरशेडिंग ही लुप्त होत असलेली कला विनामूल्य शिकवीत असत. चंद्रकांत यांनी रेखाटलेली चित्रं पाहिली की आदर्श निसर्गचित्र कसं असावं याची जाणीव होते. त्यांच्या कुंचल्यानं काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंतचा निसर्ग कॅनव्हासवर रेखाटला. कोल्हापुरातल्या मातीत ते रमले होते. याचे प्रत्यंतर त्यांनी रेखाटलेल्या गुलमोहोराचे झाड आणि गुऱ्हाळाच्या चित्रावरून येतं.<br /><br />आपले धाकटे बंधू सूर्यकांत यांच्यावर चंद्रकांत यांचा भारी जीव होता. चित्रपटसृष्टीत आणि बाहेरही या दोघांची जोडी "राम-लक्ष्मण' नावानं ओळखली जायची. सूर्यकांत यांचं आपल्या आधी निधन झाल्याचा चंद्रकांतना खूप मोठा धक्का बसला होता. "आयुष्यभर आम्ही राम-लक्ष्मणाप्रमाणे राहिलो. मला कमीपणा येईल, असे तो आयुष्यात कधी वागला नाही. पण रामाच्या आधी लक्ष्मणाने निघून जावे, हा कुठल्या नशिबाचा खेळ म्हणायचा?' अशी प्रतिक्रिया चंद्रकांत यांनी व्यक्त केली होती. आयुष्यभर पैशाचा विचार न करता चांगल्या भूमिका त्यांनी स्वीकारल्या. त्या वेळी न मिळालेले पैसे त्यांना पुढे विविध पुरस्कारांच्या रुपाने मिळाले. स्वच्छ मनानं, निष्ठेनं केलेल्या कामाचं फळ निश्चित मिळतं, यावर त्यांचा विश्वास होता. हाच विश्वास या कलावंताला सदैव रसिकांच्या हृदयात घर करून देण्यास कारणीभूत ठरला. <br /><br />-----------------<br />चंद्रकांत मांडरे जीवनपट...<br />जन्म ः 13 ऑगस्ट 1913<br />मृत्यू ः 17 फेब्रुवारी 2001 <br />कलाक्षेत्रातील पदार्पणाचं वर्ष ः 1936<br />उल्लेखनीय चित्रपट ः युगे युगे मी वाट पाहिली, पवनाकाठचा धोंडी, संथ वाहते कृष्णामाई, थोरातांची कमळा, छत्रपती शिवाजी, मीठभाकर, सांगत्ये ऐका, मोहित्यांची मंजुळा, धन्य ते संताजी धनाजी, खंडोबाची आण, बनगरवाडी<br />भाग्योदय ठरलेला चित्रपट ः सावकारी पाश<br />अभिनयाव्यतिरिक्त इतर छंद ः चित्रकला<br />आवडता खाद्यपदार्थ ः कोल्हापुरी मटण<br />आवडता चित्रपट ः सावकारी पाश<br />अभिनयाव्यतिरिक्त इतर कार्य ः चंद्रकांत मांडरे कलासंग्रहालयाची उभारणी.<br /><br /><br />- मंदार जोशीMandar Joshihttp://www.blogger.com/profile/17017614789313998938noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-6424345992684415946.post-68716533113780905722011-06-18T08:36:00.000-07:002011-06-18T08:37:49.209-07:00रुबाबदार अदाकारीचा अरुणोदय...<a onblur="try {parent.deselectBloggerImageGracefully();} catch(e) {}" href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjLdoYH-X5VafytaGS1haqsEulpW7KDxlamf4FfITXt_B_W5_gfWXMjqP8_zGDmpnedxMQSJq2YGcW1y8SLwRulft2eo2na3N3MO-mVMCJtdNtu5E6hyzkHZZzawW9PbRikaqUEG0yJ1Pc/s1600/arun+sarnaik+2.jpg"><img style="display:block; margin:0px auto 10px; text-align:center;cursor:pointer; cursor:hand;width: 223px; height: 320px;" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjLdoYH-X5VafytaGS1haqsEulpW7KDxlamf4FfITXt_B_W5_gfWXMjqP8_zGDmpnedxMQSJq2YGcW1y8SLwRulft2eo2na3N3MO-mVMCJtdNtu5E6hyzkHZZzawW9PbRikaqUEG0yJ1Pc/s320/arun+sarnaik+2.jpg" border="0" alt=""id="BLOGGER_PHOTO_ID_5619584407351969490" /></a><br />रुबाबदार अदाकारीचा अरुणोदय...<br />----------<br />चित्रपटसृष्टी ही अस्सल कलावंतांची खाण असल्याचं म्हटलं जातं. बहुतांशी ते खरंही आहे. परंतु, या खाणीतील हिऱ्यांचा देखणेपणा आणि रुबाबदारपणाबद्दल आपल्याकडे बऱ्याचदा चर्चा होते. हिंदी चित्रपटसृष्टीप्रमाणे आपल्याकडे रुबाबदार नायक अपवादानेच उदयास आले, असा टीकेचा सूरही आळविला जातो. या टीकेवर उत्तर म्हणजे अरुण शंकरराव सरनाईक हे नाव. एका परिपूर्ण अभिनेत्याकडे ज्या काही गोष्टी लागतात, त्या सर्वांचा अंतर्भाव सरनाईक यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये पाहायला मिळाला होता. <br />लहान अरुणच्या घरातच कला होती. अरुणचे वडील शंकरराव सरनाईक हे संगीतज्ज्ञ होते तर त्याचे काका निवृत्तीबुवा सरनाईक हे प्रख्यात शास्त्रीय गायक. गाण्याचं हे अंग अरुणला या जोडीकडूनच मिळालं. त्यामुळे अभिनयात नावारूपास येण्यापूर्वीच अरुणनं पेटी, तबल्यात मातब्बरी मिळवली होती. संगीताची हीच आवड अरुणला कलाक्षेत्रातील दारं उघडण्यास उपयोगी ठरली. तत्पूर्वी मुंबईच्या रुईया महाविद्यालयामधून त्यानं पदवीही मिळवली. तसेच थेट कलाक्षेत्रात उडी न मारता इचलकरंजीला एका कारखान्यात व्यवस्थापक म्हणूनही काही काळ काम पाहिलं. परंतु, तिथं त्याचा जीव काही रमला नाही. याच सुमारास मो. ग. रांगणेकर हे "भटाला दिली ओसरी' हे नाटक बसवीत होते. या नाटकात अरुणनं काम केलं. याच वेळी एक उत्कृष्ट संधी अरुणपुढे चालून आली. विख्यात दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या डोक्यात "शाहीर प्रभाकर' हा चित्रपट करण्याचं घोळत होतं. यातील शीर्षक व्यक्तिरेखा अरुणनं साकारावी, असं त्यांच्या मनात होतं. परंतु, हा चित्रपट काही कारणांमुळे बनला नाही आणि अरुणचं चित्रपटसृष्टीतील पदार्पण काही काळ लांबलं. परंतु, मातीत पडलेलं सोनं फार काळ दृष्टीभेद करू शकत नाही. या सोन्यावर प्रख्यात लेखक-दिग्दर्शक अनंत माने यांची नजर गेली आणि त्यांनी "शाहीर परशुराम' चित्रपटात अरुणला एक दुय्यम भूमिका मिळाली. या भूमिकेपाठोपाठ लेखक-दिग्दर्शक दिनकर द. पाटील यांचा "वरदक्षिणा' आणि दत्ता धर्माधिकारी यांचा "विठू माझा लेकुरवाळा' हा चित्रपटही अरुणला मिळाला. परंतु, हे तिन्ही चित्रपट फार काही मोठं यश मिळवू शकले नाहीत. एक देखणा, रुबाबदार नायक चांगल्या संधीविना उपेक्षित राहणार, अशी भीतीही निर्माण झाली. परंतु, त्यानंतर आलेल्या "रंगल्या रात्री अशा' या चित्रपटानं किमया केली आणि अरुणचा अरुणोदय झाला. या चित्रपटानं सरनाईकांना मोठा "फॅन फॉलो<br />अर' मिळाला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे त्यांचे या काळातले मोठे चाहते ठरले. या चित्रपटासाठी प्रख्यात तबलावादक उस्ताद अल्लारखॉं यांनी तबलावादन केलं होतं. प्रत्यक्ष चित्रपटात तबल्यावरील सरनाईकांची सफाई पाहून अल्लारखॉंनी त्यांचं कौतुक केलं होतं. त्यापुढं जात शिवसेनाप्रमुखांनी या कलावंताचा भविष्यकाळ उज्ज्वल असल्याचं भाकीत केलं आणि नंतर ते खरं ठरलं.<br />प्रतिभा असूनही नवीन कलाकाराला आपला जम बसविणं सहजासहजी शक्य नसतं. कारण, त्याच्यापुढे त्या काळातील मोठमोठी आव्हानं उभी असतात. सरनाईकांचा अरुणोदय झाला तेव्हा चंद्रकांत, सूर्यकांत, विवेक, रमेश देव यासारख्या अभिनेत्यांची कारकीर्द विशेष फॉर्मात होती. त्यामुळे सरनाईकांची डाळ शिजणं हे थोडं कठीण काम होतं. परंतु, बुलंद आवाज, अभिनय आणि संवादफेकीच्या जोरावर हा कलावंत बघताबघता इतरांच्या पुढं गेला. त्या काळातला चित्रपट हा ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही प्रकारच्या कथानकांच्या उंबरठ्यावर होता. सरनाईकांनी या दोन्ही प्रकारांमध्ये मातब्बरी मिळवली. सुरुवातीच्या काळातच त्यांनी भूमिकांची प्रयोगशीलता जपली. राजा ठाकूर दिग्दर्शित "पाहू रे किती वाट' या चित्रपटात ते डॉ. चारुदत्त या नायकाच्या व्यक्तिरेखेत झलकले तर "सुभद्राहरण' या चित्रपटात त्यांनी थेट दुर्योधनाचा खलनायक साकारला. सरनाईकांची कारकीर्द उंचावली जाण्यास कारणीभूत ठरलेले चित्रपट म्हणजे "एक गाव बारा भानगडी', "केला इशारा जाता जाता', "सवाल माझा ऐका', "सिंहासन' आदी चित्रपट. "सवाल माझा ऐका'मधील त्यांचा ढोलकीवाला जयवंत आजही रसिकांच्या लक्षात आहे. असाच ढोलकीवाला त्यांनी "केला इशारा जाता जाता' या चित्रपटातही साकारला होता. "पाच नाजूक बोटे' या चित्रपटात सरनाईकांनी सज्जन आणि दुर्जन भावांची दुहेरी भूमिका मोठ्या ताकदीनं सादर केली. "मुंबईचा जावई'मधील सरनाईकांचा नाट्यवेडा अविनाश लक्षणीय ठरला. डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित "सिंहासन'मधील जयाजीराव शिंदे ही मुख्यमंत्र्यांची व्यक्तिरेखा सरनाईकांच्या कारकीर्दीमध्ये सरताज ठरली. मुख्यमंत्र्याच्या व्यक्तिमत्त्वासाठी आवश्यक असलेले भावदर्शन सरनाईकांनी या व्यक्तिरेखेत एकवटले होते. सरनाईकांमधील संगीताचा आविष्कार पडद्यावर आणण्यास कारणीभूत ठरले ते संगीतकार राम कद<br />म. "डोंगरची मैना' आणि "गणगौळण' या दोन चित्रपटात कदम यांनी सरनाईकांना पार्श्वगायनाची संधी दिली. "घरकुल' या चित्रपटासाठी सी. रामचंद्र यांनी त्यांच्याकडून "पप्पा सांगा कुणाचे' हे अजरामर गीत गाऊन घेतलं. त्यानंतर काही वर्षांनी आलेल्या "चंदनाची चोळी अंग अंग जाळी' या चित्रपटामधील "एक लाजरा न साजरा मुखडा चंद्रावाणी फुलला गं...' हे गाणंही सरनाईकांमधील श्रेष्ठ गायकावर शिक्कामोर्तब करणारं ठरलं. सरनाईकांचं अभिनयातील कर्तृत्व पाहता ते हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांना ताकदीच्या भूमिका मिळायल्या हव्या होत्या. परंतु, मराठी चित्रपट आणि नाटकांमधील व्यस्ततेमुळे ही संधी काही त्यांना मिळाली नाही. अभिनयातील व्यस्तता एकीकडे कायम ठेवत सरनाईकांनी आपण समाजाचं देणं लागतो, या भावनेला छेद दिला नाही. चित्रीकरणातून वेळ मिळाला की कुष्ठरुग्णांसाठी काम करणाऱ्या "आनंदग्राम'मध्ये ते स्वतःला झोकून द्यायचे. तिथं खऱ्या अर्थानं ते रमले. तिथल्या आबालवृद्धांच्या हाती फळं, खाऊ देताना त्यांचा चेहरा आनंदानं ओसंडून वाहायचा.<br />सुमारे साडे तीन दशकांच्या कारकीर्दीत सर्व काही मिळवल्यानंतर सरनाईकांना वेध लागले होते ते निवृत्तीचे. शक्यतो कलाकार कधीच निवृत्त होत नसतो. मात्र, इतरांपासून वेगळा असणारा हा कलाकार गावी जाऊन शेती करण्याचे मनसुबे बांधत होता. आयुष्यभर धावपळ, दगदग झाल्यानंतर गावी घर बांधून तिथं थोडी विश्रांती घेण्याचाही त्यांचा विचार होता. परंतु, तो नियतीला काही मंजूर नव्हता. 21 जून 1984च्या पहाटे "पंढरीची वारी' या चित्रपटाचं चित्रीकरण आटोपून कोल्हापूर-पुणे असा आपल्या कुटुंबियांसमवेत प्रवास करीत असताना त्यांच्या मोटारीला अपघात झाला आणि हा कलावंत काळाच्या पडद्याआड गेला. त्यावेळी सरनाईकांचं वय पन्नाशीच्या आसपास होतं. वयानं आणखी काही वर्षं साथ दिली असती तर कदाचित या कलावंताकडून आणखी काही उत्कृष्ट कलाकृती आपल्याला पाहायल्या मिळाल्या असत्या.<br /><br />----------<br />अरुण सरनाईक जीवनपट...<br />जन्म ः 4 ऑक्टोबर 1935<br />ृत्यू ः 21 जून 1984<br />कलाक्षेत्रातील पदार्पणाचं वर्ष ः 1956<br />उल्लेखनीय चित्रपट ः रंगल्या रात्री अशा, एक गाव बारा भानगडी, सवाल माझा ऐका, सिंहासन, मुंबईचा जावई, घरकुल<br />उल्लेखनीय नाटके ः अपराध मीच केला, तरुण तुर्क म्हातारे अर्क, गोष्ट जन्मांतरीची, गुडबाय डॉक्टर, लवंगी मिरची कोल्हापूरची<br />भाग्योदय ठरलेला चित्रपट ः रंगल्या रात्री अशा<br />अभिनयाव्यतिरिक्त इतर छंद ः तबलावादन, पेटीवादन, गायन.<br />अभिनयाव्यतिरिक्त इतर कार्य ः "आनंदग्राम' या संस्थेत कुष्ठरुग्णांची सेवा.<br />-----------<br />- मंदार जोशीMandar Joshihttp://www.blogger.com/profile/17017614789313998938noreply@blogger.com3tag:blogger.com,1999:blog-6424345992684415946.post-85857020947590415712011-05-23T04:43:00.001-07:002011-05-23T04:46:22.793-07:00लालफितीत अडकला "शो मन'<a onblur="try {parent.deselectBloggerImageGracefully();} catch(e) {}" href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhgpuy11j1LxDIPj5AxGd9O5iiolAEdPajhWRi8JJDibm0tgu0mWPEFSqpYmie7YpgjlAh82GgMZQHIeri6rGEyX6cUwSzAqmwvCb9j6OwxntCgv6HTU0oA-4u8ecpiLnveLk1HamAtc5A/s1600/sughash+ghai+3.jpg"><img style="display:block; margin:0px auto 10px; text-align:center;cursor:pointer; cursor:hand;width: 297px; height: 320px;" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhgpuy11j1LxDIPj5AxGd9O5iiolAEdPajhWRi8JJDibm0tgu0mWPEFSqpYmie7YpgjlAh82GgMZQHIeri6rGEyX6cUwSzAqmwvCb9j6OwxntCgv6HTU0oA-4u8ecpiLnveLk1HamAtc5A/s320/sughash+ghai+3.jpg" border="0" alt=""id="BLOGGER_PHOTO_ID_5609876484090484258" /></a><br />लालफितीत अडकला "शो मन'<br />---------<br />तब्बल 35 वर्षांची निर्माता-दिग्दर्शक म्हणून यशस्वी कारकीर्द आणि "व्हिसलिंग वूडस्'नं जागतिक स्तरावर मिळवलेली ख्याती या दोन गोष्टी सुभाष घईंचं मनोरंजन क्षेत्रामधील मोठेपण सिद्ध करणारी आहेत. "क्लास'-"मास'च्या आवडीची नाडी जाणणारा आणि राज कपूर यांच्यानंतर "शो मन' ही पदवी मिळविणारा हा दिग्गज दिग्दर्शक सध्या मात्र काही कारणांमुळे अडचणीत सापडलाय. ही कारणं आणि आपल्या कारकिर्दीबद्दल घई यांनी प्रथमच परखडपणे केलेली ही चर्चा.<br />-------------<br />मुलाखतीचा पहिलाच प्रश्न ऐकून समोरच्याची कळी खुलावी, असं खूप कमी वेळा घडतं. पण ज्यावेळी असं घडतं तेव्हा मग मुलाखतकाराच्या वाट्याला जबरदस्त असं काहीसं येतं. सुभाष घईंशी संवाद साधताना असंच काहीसं घडलं आणि घईंच्या मनात ठसठसत असलेलं दुःख पहिल्यांदाच तीव्र स्वरूपात बाहेर पडलं. "व्हिसलिंग वूडस्'मध्ये शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना बॉलीवूडमध्ये मिळालेल्या चांगल्या संधी आणि या संस्थेत विदेशी विद्यार्थ्यांचा वाढत असलेला ओघ याबाबत घईंना बोलतं करायचं होतं. त्यानिमित्तानं सात वर्षांपूर्वी या संस्थेच्या पायाभरणीच्या वेळी मनात असलेल्या योजना आणि प्रत्यक्षात साकारलेलं या योजनांचं रूप आशादायी आहे का ? हा प्रश्न ऐकून सुभाषजी खुलले आणि त्यांच्या मनातील दुःख "नॉनस्टॉप' बाहेर पडायला सुरुवात झाली.<br />"" "व्हिसलिंग वूडस्'मध्ये राज्य सरकारची जमीन लाटून सुभाष घईंनी स्टुडिओद्वारे फक्त आपलं हित साधलं, अशाप्रकारचं जे काही जनमत तयार केलं गेलं, ते मला प्रचंड खुपणारं आहे. असे आरोप ऐकले की माझ्या डोळ्यातून पाणी येतं. कारण, कोणाची जमीन लाटून पैसे कमवावे, ही माझी वृत्ती नाही. मी आजवर अनेक नवोदितांना माझ्या चित्रपटातून संधी दिली. पण, मुंबईत कामासाठी येणाऱ्यांचा ओघ खूप मोठा आहे. इथं येणाऱ्या प्रत्येकाची अशी तक्रार असायची की आम्ही फिल्मवाल्यांची मुलं नसल्यामुळे आम्हांला इथं संधी मिळत नाही. ही गोष्ट मला बोचली. कलाक्षेत्रात काहीतरी करण्याच्या इच्छेनं अनेक जण मुंबईत येतात आणि त्यानंतर ते "गुमराह' होतात. त्यांना योग्य रस्ता दाखविण्यासाठी आंतरराष्ट्रीय तोडीची संस्था मला उभारायची होती. त्यामुळे 1993 मध्ये चित्रपट माध्यमाचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेचं मी स्वप्न पाहिलं. परंतु, सरकारच्या पातळीवर त्याची दखल घेण्यासाठी पुढं आणखी दहा एक वर्षं गेली आणि या संस्थेची पायाभरणी झाली ती 2004मध्ये. ही संस्था उभारण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि गोरेगावच्या फाळके चित्रनगरीचे तेव्हाचे संचालक गोविंद स्वरूप यांनी पुढाकार घेतला. सरकारशी मैत्री करणंही अनेकदा धोक्याचं असतं, हे मला ठाऊक होतं. परंतु, स्वरूप यांच्या आग्रहामुळे चित्रनगरीत चित्रपट प्रशिक्षण संस्था उभारण्याचा निर्णय आम्ही घेतला. यावेळी सरकारच्या जमिनीवर शैक्षणिक संस्था उभारणे आणि या संस्थेच्या विकासासाठी स्टुडिओ चालवण्याचा आम्ही करार केला. या मध्ये ही जमीन आमच्या संस्थेला विकण्यात आली, हा कुठेही उल्लेख नव्हता किंवा तसा विचारही कधी माझ्या मनात आला नव्हता. प्रारंभीच्या करारानुसार एकूण 20 कोटींची गुंतवणूक अपेक्षित होती. त्यापैकी 17 कोटी माझ्या संस्थेतर्फे भरले गेले आण<br />ि उरलेले तीन कोटी राज्य सरकारने भरावेत, असं ठरलं. अर्थात ती रक्कमही नंतर आमच्याच संस्थेनं भरली. सर्व काही ठरलं. भूमिपूजन झालं आणि इमारतीचं बांधकाम सुरू असतानाच त्याविरुद्ध न्यायालयात एक जनहित याचिका दाखल झाली. या याचिकेतील मुद्यांवर सरकारतर्फे व्यवस्थित उत्तरे द्यायला हवी होती. राज्य सरकारच्या जमिनीचा वापर एका चांगल्या शैक्षणिक संस्थेसाठी होणार आहे, हे न्यायालयासमोर आणायला हवं होतं. मात्र तसं घडलं नाही आणि तब्बल सात वर्षं या शैक्षणिक संस्थेची प्रगती रोखली गेली. ही संस्था प्रत्यक्षात आणण्यापूर्वी मी देश-विदेशातील तब्बल 42 संस्थांना भेटी देऊन तेथील कार्यभार पाहिला आणि प्रत्येकातील चांगल्या गोष्टी हेरून त्यांचा अंतर्भाव आमच्या संस्थेत केला.''<br />गेल्या काही वर्षांपासून घईंचा राज्य सरकारबरोबर सातत्यानं विविध माध्यमांद्वारे संवाद सुरू आहे. परंतु, त्यातून काहीच मार्ग निघालेला नाही. मंत्री, शासकीय अधिकारी फकत गोड गोड बोलतात आणि नवनवीन आश्वासनं देतात. परंतु, कृतीची वेळ आली की पाठ फिरवतात असा विदारक अनुभवही घई व्यक्त करतात. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या भेटीची वेळ मागून आता बरेच महिने झाले आहेत; परंतु त्यांनाही याबाबत मला भेटावंसं वाटत नाही, यासारखी दुर्दैवाची दुसरी गोष्ट नाही, हे स्पष्ट करून घई पुढं म्हणतात, ""या संस्थेच्या उभारणीसाठी आता जवळपास 50 कोटी रुपये खर्च झाला आहे. मुलांच्या "फी'मधून उत्पन्न मिळत असले तरी ते एवढ्या मोठ्या "स्केल'वरची संस्था चालविण्यास अपुरे आहे. सुरुवातीला 20 एकर जमिनीवर ही संस्था विकसित करायची असं ठरलं असतानाही अवघ्या चार एकर जागेवरच आम्हांला समाधान मानावं लागलं आहे. दरवर्षी आमच्या "बॅलन्स शीट'मध्ये सहा कोटींचा तोटा आढळत आहे. "मुक्ता आर्टस्'द्वारे चित्रपट निर्मिती करून तेथून मिळालेला पैसा या संस्थेच्या उभारण्यासाठी आम्ही वापरत आहोत. परंतु राज्य सरकारनं एकंदरीत आम्हांला पांढऱ्या हत्तीवर बसवून आता या प्रकरणात हात वर करण्याची भूमिका घेतली आहे. एवढी मोठी गुंतवणूक केल्यामुळे मला आता दुसरीकडे जाणंही शक्य नाही. परंतु, आणखी किती काळ वाट पाहायची यालाही काही मर्यादा आहेत. आता आमच्या अगदी नाकातोंडाशी पाणी आलंय. जीव गुदरमला जातोय. सरकारची कागदपत्रे व्यवस्थित नाहीत, त्याला आम्ही कसे काय जबाबदार असू शकतो ? या प्रकल्पामध्ये राज्य सरकार आमचे भागीदार असल्यामुळे मी इतकी वर्षं गप्प राहिलो होतो. परंतु, त्याचा गैरफायदा घेण्यात आला. त्यामुळेच पुढील काही महिन्यांमध्ये याचा निर्णय न लागल्यास नाईलाजास्तव मला राज्य सरकारविरुद्ध न्यायालयात दाद मागावी लागेल. एक<br />ीकडे मनोरंजन विश्वासाठी बरंच काही करण्याच्या वल्गना केल्या जातात आणि दुसरीकडे आशियातील सर्वात मोठ्या आणि अत्याधुनिक मनोरंजन शिक्षण संस्थेच्या कामात अडथळे आणले जातात, हे काही योग्य नाही.''<br />एवढ्या सगळ्या विपरीत गोष्टी घडत असतानाही संस्थेच्या प्रगतीवर प्रतिकूल परिणाम होणार नाही, याची काळजी घईंनी या काळात घेतली. या संस्थेत सध्या 400 मुलं प्रशिक्षण घेत असून त्यापैकी 70 मुलं ही युरोपीय देशांमधील आहेत. इथून बाहेर पडलेल्या 70 टक्के विद्यार्थ्यांना ग्लॅमर जगतामध्ये वेगवेगळ्या प्रकारची कामं मिळाली आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीतील मान्यवर मंडळी या संस्थेत अध्यापनाचं काम करीत आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये घईंनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांना फारसं यश मिळालेलं नाही. या अपयशाचं विश्लेषण करताना घई म्हणतात, ""आपलं मन स्थिर असेल तर आपल्या हातून चांगलं काम घडतं. एवढ्या विचित्र मनोवस्थेत चित्रपट दिग्दर्शित करणं खरोखरच शक्य नाही. "व्हिसलिंग वूडस्'च्या उभारणी प्रक्रियेत जे अडथळे आले त्याचा निश्चितच माझ्या "क्रिएटिव्हिटी'वर परिणाम झालाय. परंतु, एवढ्या सहजासहजी हार मानणाऱ्यांमधला मी नाही. काहींना वाटतंय की, दिग्दर्शनाचा माझा फॉर्मच हरवलाय. परंतु, मला त्यात काही तथ्य वाटत नाही. दिवसातले 16 तास मी कार्यरत आहे. गेल्या चार दशकांमध्ये मी निर्मिलेल्या 18पैकी 14 चित्रपटांना यश आलंय. हा "रेशो' नक्कीच चांगला आहे. अपयशाला मी घाबरत नाही. कारण, कोणत्याही दिग्दर्शकाला प्रयोग हे करावेच लागतात. काही लोकांना असं वाटतंय की, घईंच्या स्टाईलचा सिनेमा आता "आऊटडेटेड' झालाय. परंतु, त्याच्याशीही मी सहमत नाही. कारण हे जर खरं मानायचं ठरवलं तर "दबंग'सारखा सिनेमा सुपरडुपर हिट ठरला नसता. हा सिनेमा माझ्या "स्टाईल'शी अगदी मिळताजुळता आहे. खुद्द सलमाननं मला या चित्रपटाच्या "मेकिंग'दरम्यान ""हम "राम लखन' पॅटर्न की फिल्म बना रहे है ।' असं सांगितलं होतं. या चित्रपटाच्या यशामुळे माझा विश्वास वाढलाय. लवकरच माझं दिग्दर्शन असलेल्या नवीन चित्रपटाची मी घोषणा करीन. एकीकडे निव्वळ मनोरंज<br />न चित्रपटांची निर्मिती सुरू असताना काही वेगळ्या आशयघन चित्रपटांनाही आम्ही प्राधान्य दिलं आहे. रवींद्रनाथ टागोर यांच्या 150व्या जन्मतिथीचं निमित्त साधून आम्ही एक बंगाली चित्रपट "कश्मकश' या नावानं हिंदीत डब केलाय. मराठीतही खूप चांगलं साहित्य आहे, ज्याचा सिनेमा होऊ शकतो. त्यावरदेखील आमचं काम सुरू आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक उमेश कुलकर्णी आमच्यासोबत पुढील कलाकृती करणार आहेत. ज्या लेखक-दिग्दर्शकांकडे खूप चांगल्या कल्पना आहेत, तेदेखील आमच्याशी संपर्क साधू शकतात.<br />- मंदार जोशीMandar Joshihttp://www.blogger.com/profile/17017614789313998938noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-6424345992684415946.post-65287863154547445852011-05-16T05:05:00.000-07:002011-05-16T05:07:34.618-07:00अमोल गुप्तेंचा नवा डबा<a onblur="try {parent.deselectBloggerImageGracefully();} catch(e) {}" href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgn7T3RSNwiO_jjJVG6S5kpL3qOpv-ewXhP300Y2mQaqIC9TybgFS6JKW1VoGqqwTTcpxMorE2Y3CVGziv2diFOomDJ1_rKiq6dtN4SGiJkqEAaU5OmEvvshEa-0gzrYUFaavZdkyvHoKY/s1600/SKD_01.JPG"><img style="display:block; margin:0px auto 10px; text-align:center;cursor:pointer; cursor:hand;width: 320px; height: 214px;" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgn7T3RSNwiO_jjJVG6S5kpL3qOpv-ewXhP300Y2mQaqIC9TybgFS6JKW1VoGqqwTTcpxMorE2Y3CVGziv2diFOomDJ1_rKiq6dtN4SGiJkqEAaU5OmEvvshEa-0gzrYUFaavZdkyvHoKY/s320/SKD_01.JPG" border="0" alt=""id="BLOGGER_PHOTO_ID_5607284272277067826" /></a><br /><br />"तारे जमीं पर'चे क्रिएटिव्ह दिग्दर्शक अमोल गुप्ते तब्बल साडे तीन वर्षांनी "स्टॅन्ली का डब्बा' या चित्रपटाद्वारे आपला दुसरा डबा घेऊन प्रेक्षकांसमोर येत आहेत. मनोरंजन आणि सामाजिक संदेशाचं आपलं धोरण त्यांनी या चित्रपटातही कायम ठेवलंय. या डब्यातील खाऊ आणि तो बनविताना घेतलेल्या कष्टांबद्दल अमोल गुप्ते यांच्याशी केलेली ही चर्चा.<br />------------<br />एखादा नवीन चित्रपट प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर असला की मुलाखतींच्या निमित्तानं निर्माता-दिग्दर्शकांच्या भेटी होतच राहतात. मात्र, चित्रपटाचं भवितव्य एकदा स्पष्ट झालं की पुढच्या कलाकृतीपर्यंत तो दिग्दर्शक पुन्हा काही भेटत नाही. परंतु, काही दिग्दर्शक पहिल्याच भेटीत आपल्या मनावर ठसतात आणि मग त्यांच्या अनौपचारिक भेटी सुरू राहतात. अशा भेटींचा आनंद ज्या काही मोजक्या दिग्दर्शकांनी दिलाय त्यापैकी एक म्हणजे अमोल गुप्ते. "तारे जमीं पर' प्रदर्शित झाल्यापासून अमोल गुप्ते यांच्याशी नियमित संपर्कात राहण्याची संधी मला मिळालीय. गेल्या साडे तीन वर्षांमध्ये या कलावंताला भेटल्यानंतर प्रत्येक वेळी चित्रपट माध्यमाबाबत काहीतरी वेगळी माहिती, वेगळे संदर्भ ऐकायला मिळालेत. इतर व्यावसायिक दिग्दर्शकांप्रमाणे काही हातचं राखून बोलणाऱ्यांमधला हा दिग्दर्शक नाही. त्याचा प्रत्यय यावेळच्या भेटीतही आला. प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक सुभाष घई यांच्या वांद्रे इथल्या जुन्या ऑफिसमध्ये आमची भेट झाली. इथं कधी "शिफ्ट' झालात ? अशा सहज विचारलेल्या प्रश्नाचं त्यांनी सुभाष घई आणि करण जोहर यांची कृपा असं सहजपणे उत्तर दिलं. "करण जोहरनं काही कामानिमित्त घईंचं ऑफिस भाड्यानं घेतलं आणि आपलं काम संपल्यानंतर त्यानं मला इथं "स्टॅन्ली का डब्बा'चं काम करू दिलं. पहिल्या काही महिन्यांचं भाडं स्वतः करणनं भरलं आणि नंतरच्या महिन्यांचं भाडं घईंनी मागितलेलं नाही,' अमोल गुप्ते मनमोकळेपणे ही माहिती देतात आणि "स्टॅन्ली का डब्बा'च्या अंतरंगात डोकावण्यापूर्वी किती जणांची आपल्याला मदत मिळालीय, याचा नेमका उल्लेख करतात.<br /><br />"स्टॅन्ली का डब्बा' याचा विषय आणि शीर्षकाबद्दल वेगळी माहिती देताना गुप्ते म्हणतात, ""अंधेरीतील होली फॅमिली हायस्कूलमध्ये मी दुसरी ते सातवीदरम्यान शिकायला होतो. या शाळेत मला स्टॅन्ली नावाचा मित्र भेटला. त्याच्याबरोबर माझी मैत्री होण्यामागचं कारण म्हणजे त्याचा "फोर टायर'चा टिफीन डबा. त्यात फार काही वेगळे खाद्यपदार्थ नसायचे बरं. पण साधाच बटाट्याचा रस्सा आणि काही पुऱ्यांचा स्वाद असा असायचा की अख्खा वर्ग त्याच्या प्रेमात पडायचा. चार ठिकाणी दणके खाल्लेला तो साधा ऍल्युमिनीयमचा डबा होता. त्यानं कुठल्या माळ्यावरून तो काढला, हे मलादेखील माहित नाही. तो डबा माझ्या इतकी वर्षं लक्षात राहिला आणि त्याला केंद्रस्थानी ठेवून हा चित्रपट बनविण्यात आला. शाळेचा खाऊचा डबा हा प्रत्येक मुलगा आणि आईचा जिव्हाळ्याचा विषय असतो. आईचं प्रेम प्रत्येक डब्यातील खाद्यपदार्थात उतरलेलं असतं. आमचा "स्टॅन्ली का डब्बा'सुद्धा असाच प्रेमाचा डबा आहे. तो प्रेक्षकांनी खाल्ला तर तो त्यांना निश्चितच आवडेल. मुलं एकमेकांकरीता कशी उभी राहतात, हेदेखील या चित्रपटामधून पाहायला मिळेल.''<br /><br />"तारे जमीं पर'च्या यशानंतर प्रेक्षक अमोल गुप्तेंकडून लगेचच एखाद्या नवीन कलाकृतीची अपेक्षा करीत होते. परंतु, ती कलाकृती पडद्यावर येण्यामध्ये साडे तीन वर्षांचा काळ लोटला. याबद्दल गुप्ते सांगतात, ""साधारण दोन वर्षांपूर्वीच मी "सपनों को गिनते गिनते' हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांसमोर येणार होतो. या चित्रपटाची गाणीही तयार झाली होती. परंतु, मध्यंतरी अशा काही अडचणी आल्या की हा चित्रपट काही पुढेच सरकेना आणि मग स्वतःबद्दल, आपल्या आयुष्याबद्दल विचार करताना मला स्टॅन्लीचा विषय सुचला. परंतु, हा काही मी ठरवून केलेला चित्रपट नाही. सर्वप्रथम मुलांची कार्यशाळा घेण्याचं मी ठरवलं. त्यात जवळपास पाचशे मुलांनी भाग घेतला. या मुलांचा वेळ मिळवण्यासाठी मी होली फॅमिली शाळेच्या मुख्याध्यापिका आशा कपूर यांना भेटलो. दर शनिवारी सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत कार्यशाळा घेण्याचं ठरलं. खाऊचा एक डबा मुलांनी आणावा आणि एक डबा माझ्याकडून देण्याचं मी सुचवलं आणि आमची कार्यशाळा सुरू झाली. कार्यशाळेच्या चार तासांपैकी एक तास डबा वाटण्यात आणि खाण्यात जायचा. उरलेल्या वेळात जे काही चित्रीत करता येईल तेवढं आम्ही केलं. असं करता करता दीड वर्षं गेलं आणि हा डबा तयार झाला. शूटिंगच्या वेळी आम्ही कसल्याही प्रकारचा तामझाम केलेला नाही. स्पॉटबॉय, मोठमोठे लाईट्स आणि प्रॉडक्शन मॅनेजरशिवाय हा चित्रपट बनलाय. आमचा छायालेखक अमोल गोळेनं खूप चांगलं काम केलंय. सत्तरचा कॅमेरा वापरून त्यानं हा चित्रपट शूट केलाय. मालिका, जाहिराती आणि चित्रपटांमध्ये लहान मुलांना दहा-बारा तास राबविलं जातं. तसं आम्ही या चित्रपटाबाबत घडू दिलेलं नाही. चार तासांच्या वर आमची कार्यशाळा कधी चालली नाही. आमच्या या चित्रपटात 500 मुलं आहेत. परंतु, शूटिंगमुळे एकाही मुलाची कधी शाळा बुडली नाही.''<br /><br />"तारे जमीं पर'मध्ये आमिर खानसारखा मोठा स्टार होता. "स्टॅन्ली...'साठी एखाद्या नामांकीत स्टारचा विचार नाही केलात का, या प्रश्नावर गुप्ते म्हणाले, ""काय वाट्टेल ते झालं तरी चित्रपट करायचा, या इराद्यानं हा चित्रपट बनलेला नाही. एका छोट्या कार्यशाळेच्या माध्यमातून हा चित्रपट घडलाय. सलग दीड वर्ष शनिवारचे चार तास देणारे स्टार कलाकार आज आहेत का ? याचं निश्चित उत्तर नाही असंच आहे. कारण, हल्ली प्रत्येक स्टार आपल्या फायद्याचा विचार करतो. मात्र, तशा फायद्याची खात्री "स्टॅन्ली का डब्बा'द्वारे देण्याच्या स्थितीत तेव्हा तरी मी नव्हतो. त्यामुळे जे काही मित्र माझ्याबरोबर आले त्यांना सोबत घेऊन मी पुढं गेलो. दिव्या दत्ता, राजेशनाथ झुत्शी, अपूर्वा लाखिया... यांचा मी आवर्जून उल्लेख करीन. संगीताच्या आघाडीवरही मला सुखविंदर, शंकर महादेवन, विशाल दादलानी यांची मदत झाली. या सर्वांना मी फक्त एक फोन केला आणि कसल्याही मानधनाशिवाय ते माझ्याकडे गायले. शंकरनं मला मानधन म्हणून हंडीभर मटण शिजविण्यास सांगितलं. असं प्रेम पाहायला मिळालं की खरंच आपण करीत असलेल्या कामाचं चीज झाल्यासारखं वाटतं. या चित्रपटाला संगीत दिलंय ते हितेश सोनिकनं. तो पूर्वी विशाल भारद्वाजचा मदत करायचा. मी लिहिलेल्या शब्दांचं वजन अचूक ओळखून त्यानं काम केलंय.''<br /><br />या चित्रपटाच्या निर्मितीत गुप्तेंना सर्वाधिक मदत मिळाली ती त्यांची पत्नी दीपा भाटिया आणि मुलगा पार्थो यांच्याकडून. "स्टॅनली'ची मुख्य व्यक्तिरेखा पार्थोनंच साकारली आहे आणि त्याच्या अभिनयाचं कौतुक चित्रपटसृष्टीतील दिग्गज मंडळी करताहेत. हा विषय गुप्तेंकडे काढला असता ते शिताफीनं आपल्या मुलावरचा "फोकस' दुसरीकडे वळविण्याचा प्रयत्न करतात आणि हसत ते म्हणतात, ""माझ्या कोणत्या मुलाबद्दल तुम्ही विचारताय ? स्टॅन्लीसारखीच आणखी 170 मुलं या चित्रपटात आहेत. "तारे जमीं पर'मधला दर्शिल सफारीसुद्धा माझाच मुलगा आहे. सगळेच माझ्याकडे खूप छान काम करतात. दीपाबद्दल विचाराल तर मी सांगेन की, ज्या वेळी मी कार्यशाळा घेत होतो, त्यावेळी ती "माय नेम इज खान' आणि "वुई आर फॅमिली'च्या संकलनात व्यस्त होती. या चित्रपटाचं काम संपल्यानंतर तिनं आम्ही केलेलं फुटेज "एडिट लाईन'वर घेतलं. तब्बल महिनाभर तिनं हे आमचं फुटेज व्यवस्थित पाहिलं आणि त्यात एक धमाल चित्रपट दडल्याचं तिलाही कळलं आणि अशाप्रकारे हा चित्रपट बनला. तो आता "फॉक्स स्टार'द्वारे प्रदर्शित होतोय. या संस्थेच्या पाठिंब्यामुळे आमचा चित्रपट जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोचेल, याची मला खात्री आहे. तरीपण या काळात विशाल भारद्वाज, करण जोहर या माझ्या मित्रांनी केलेलं सहकार्य मी विसरू शकणार नाही. करणच्या "एडिटिंग मशीन'वर हा चित्रपट संकलित झालाय. हा चित्रपट "फॉक्स'नं प्रदर्शित करावा यासाठी करणनंच पुढाकार घेतला. "तुझा चित्रपट कोणी नाही घेतला तर मी तुझ्या पाठीशी उभं राहीन,' असं आश्वासन विशालनं दिलं होतं. "तू एक छान बाळाला जन्म दिला आहेस. त्याचा आदर ठेव. कोणाचाही तू ऋणी होऊ नकोस. कारण "फॉक्स'ला तू जे दिलं आहेस आणि त्यांच्याकडून तुला जे मिळणार आहे, त्याच्यापेक्षा तू दिलेलं खूप मोठं आणि महत्त्वाचं आहे.''<br />"स्टॅन्ली का डब्बा'मध्ये अमोल गुप्तेंनी "खडूस' असं नाव असलेल्या शिक्षकाची व्यक्तिरेखा साकारलीय. या चित्रपटापाठोपाठ "भेजा फ्राय 2' आणि संतोष सिवन दिग्दर्शित "उर्मी'मध्येही गुप्तेंच्या अभिनयातील कौशल्य पाहायला मिळणार आहे. "उर्मी' हा मल्याळम चित्रपट असून तो हिंदीत डब झाल्यानंतर प्रदर्शित होणार आहे.<br />- मंदार जोशीMandar Joshihttp://www.blogger.com/profile/17017614789313998938noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-6424345992684415946.post-20725921993250422052011-05-09T02:51:00.000-07:002011-05-09T02:56:46.540-07:00एका ध्यासाचा प्रवास...<a onblur="try {parent.deselectBloggerImageGracefully();} catch(e) {}" href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhMURkpYOeRYak6V_hDeGcR-CRjWg_no4taDH4Wt1BQK1prIkIg-2mdW9S04xfJW80OkDcrHwMYVLFD_5lu689eir2AIFs8cR-wq-6C9yKNKDfAGGUvgU6oia3yqZN7B5R-cBR3JJcCcyk/s1600/10-Production+Designer+and+Art+Director+Nitin+Desai+and+Subodh+Bhave+as+Bal+Gandharva.jpg"><img style="display:block; margin:0px auto 10px; text-align:center;cursor:pointer; cursor:hand;width: 320px; height: 214px;" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhMURkpYOeRYak6V_hDeGcR-CRjWg_no4taDH4Wt1BQK1prIkIg-2mdW9S04xfJW80OkDcrHwMYVLFD_5lu689eir2AIFs8cR-wq-6C9yKNKDfAGGUvgU6oia3yqZN7B5R-cBR3JJcCcyk/s320/10-Production+Designer+and+Art+Director+Nitin+Desai+and+Subodh+Bhave+as+Bal+Gandharva.jpg" border="0" alt=""id="BLOGGER_PHOTO_ID_5604652960071814402" /></a><br />एका ध्यासाचा प्रवास...<br />प्रसिद्ध कलादिग्दर्शक, प्रॉडक्शन डिझायनर आणि निर्माते नितीन चंद्रकांत देसाई यांनी "बालगंधर्व' या भव्यदिव्य चित्रपटाचं नऊ महिन्यांपूर्वी पाहिलेलं स्वप्न आता प्रत्यक्षात साकारलं जातंय. येत्या 6 मे रोजी हा चित्रपट भारतात आणि त्यानंतर विदेशातही प्रदर्शित होतोय. मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातला हा सर्वाधिक "बजेट' असलेला चित्रपट. तब्बल सहा कोटींचं बजेट असलेल्या या चित्रपटाशी नितीन देसाईंव्यतिरिक्त नीता लुल्ला, विक्रम गायकवाड, रवी दिवाण, महेश लिमये, रवी जाधव, सुबोध भावे, कौशल इनामदार, राहुल देशपांडे, आनंद भाटे अशी मोठी नावं जोडली आहेत. मराठी चित्रपट निर्मितीच्या साऱ्या चौकटी भेदून एक विलक्षण जिद्द, ध्यास, तळमळ आणि प्रचंड मेहनतीनं हा चित्रपट बनविला गेलाय. त्याचीच ही कहाणी.<br />-----------<br />विख्यात गायक-नायक बालगंधर्वांची महती सर्वांनाच ठाऊक आहे. परंतु, हे व्यक्तिमत्त्व ज्या "स्केल'द्वारे चित्रपटातून प्रेक्षकांपुढे येणार आहे, ते अपूर्व <br />म्हणावं लागेल. मराठी चित्रपट म्हटलं की काही निश्चित ठोकताळे आपल्या डोळ्यांसमोर येतात. परंतु, हा चित्रपट साकारताना देसाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्व "बाऊंड्रीज' पार केल्या आणि आपल्याला आंतरराष्ट्रीय दर्जाचा चित्रपट बनवायचाय, या हेतूनं झपाटून जात चित्रपट पूर्ण केला. सर्वसाधारणपणे निर्मात्याला कथा ऐकविली की एक तर निर्मितीचा निर्णय त्वरीत घेतला जात नाही किंवा निर्मितीचं "बजेट' अधिकाधिक कमी कसं करता येईल, यासाठी सूचना दिल्या जातात. परंतु, हा चित्रपट सुरूच झाला एका ध्यासानं. आजचा जमाना आहे एमटीव्ही, पॉप म्युझिकचा. या जमान्यातील तरुण पिढीच्या गळी शंभर वर्षांपूर्वीचं गाणं आणि घटनाक्रम उतरवणं, हे खरं तर सर्वात मोठं "चॅलेंज' होतं. परंतु, ते "चॅलेंज' अभिनेता सुबोध भावे आणि पटकथा लेखक अभिराम भडकमकर यांनी ठेवलं आणि ते काही मिनिटांमध्ये नितीन देसाईंनी स्वीकारलं आणि सुरू झालं एका विलक्षण चित्रपटनिर्मितीचं ध्यासपर्व !<br /><br />गेल्या काही वर्षांमध्ये मराठी चित्रपटांची संख्या वाढली; परंतु गुणवत्तेचा विचार करायचा झाल्यास अगदी मोजक्या चित्रपटांचीच नावं घेता येतील. त्यामागचं कारण म्हणजे नियोजन, कल्पकतेचा अभाव. "बालगंधर्व'ची निर्मिती सुरू होण्यापूर्वी नियोजनावर मोठा भर दिला गेला आणि त्याचं प्रत्यंतर वेळोवेळी येत गेलं. आपल्याकडे असे अजूनही अनेक चित्रपट प्रदर्शित होतात की, प्रेक्षकांना प्रदर्शनाच्या दिवशीच त्याचं नाव ठाऊक होतं. परंतु, "बालगंधर्व' मुहूर्ताच्या आधीपासून ते त्याच्या संगीताची ध्वनिमुद्रिका प्रकाशित होईपर्यंतच्या काळात विलक्षण चर्चेत राहिला. करायचं ते दणक्यात, हा नितीन देसाईंचा खाक्या. तो या चित्रपटाच्या मुहूर्तापासून पाहायला मिळाला. प्रभादेवीच्या रवींद्र नाट्य मंदिरात गेल्या ऑक्टोबर महिन्यात या चित्रपटाच्या "लॉंचिंग'चा जो भव्यदिव्य कार्यक्रम झाला, तो कायम लक्षात राहणारा ठरला. ऐतिहासिक चित्रपट साकारताना लेखक-निर्माता-दिग्दर्शकांनं केलेल्या अभ्यासाला, आपल्या कलाकृतीमध्ये वापरण्यात येणाऱ्या संदर्भांना, संशोधनाला खूप महत्त्व असतं. हे संदर्भ सहजासहजी मिळत नाहीत. त्यासाठी अनेकांच्या भेटी घ्याव्या लागतात. अशा वेळी थोडी पूर्वपुण्याईदेखील कामाला यावी लागते. ते सर्व या चित्रपटाबाबत जुळून आलं. <br /><br />या चित्रपटाच्या संशोधनासाठी अविरत प्रयत्न झाले. लेखक, निर्माता, दिग्दर्शक, संगीतकार, वेशभूषाकारापासून ते चित्रपटामधील सर्व कलावंतांनी आपापल्या परीनं बालगंधर्व आणि त्यांच्या काळाबद्दल जी काही माहिती मिळाली, तिचा चित्रपटासाठी काही उपयोग होईल का, याचा विचार केला. बालगंधर्वांना पाहिलेल्या आणि त्यांचा सहवास लाभलेली जी काही मोजकी व्यक्तिमत्त्वं आहेत, त्यांचा शोध घेतला गेला. त्यांच्या दीर्घमुलाखती ध्वनिमुद्रित झाल्या. त्यांच्याकडील बालगंधर्वांचा ठेवा चित्रपटासाठी विनम्रपणे मागण्यात आला आणि शूटिंग झाल्यानंतर तो आस्थेपूर्वक परतही करण्यात आला. ज्याच्याकडे जे जे चांगलं मिळेल, ते ते घेऊन पटकथेची एक सुंदर लड गुंफण्यात आली. शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे यांच्यापासून ते थेट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना लाभलेला बालगंधर्वांचा सहवास जाणून घेत त्यानुसार कथानकातील नाट्यनिर्मिती आणखी टोकदार करण्यात आली. रंगभूमीवर अदाकारी साकारीत असताना आपल्या रुपाकडे थोडंही दुर्लक्ष होऊ न देण्यासाठी बालगंधर्वांनी विंगेत आरशांची केलेली व्यवस्था, ही बाबासाहेबांनी सांगितलेली खास आठवण. या आठवणीला चित्रपटात नुसतंच स्थान मिळालेलं नाहीय तर कथानक त्यामुळे आणखी रंगतदार होईल, याची काळजी घेतली गेलीय. असे बरेच प्रसंग या चित्रपटात आहेत.<br /><br />अवघ्या 33 दिवसांमध्ये हा चित्रपट पूर्ण झाला. तो काळ मंतरलेला होता, अशी प्रतिक्रिया या चित्रपटाच्या "टीम'शी जोडलेला प्रत्येक कलावंत-तंत्रज्ञ सांगतो. पुणे, भोर, कोल्हापूर या भागात हा चित्रपट चित्रीत झालाय. सकाळी सात ते मध्यरात्री 1-2 वाजेपर्यंतही बऱ्याचदा शूटिंग चालायचं. पण कोणाकडूनही कधी या काळात आपण थकल्याची प्रतिक्रिया ऐकायला मिळाली नाही. नितीन देसाईंना या 33 दिवसांमध्ये ज्यांनी कोणी पाहिलं असेल, त्यांना निश्चितच या माणसाची "पॅशन' भावली असणार. एखाद्या युद्धात राजाची मैदानावरील थेट उपस्थिती सैनिकांसाठी उत्साहवर्धक असते. इथं तर नितीन देसाईंच्या रुपातला राजा अक्षरशः चौफेर चढाई करीत होता. या चित्रपटामध्ये लोकमान्य टिळक यांच्या व्यक्तिरेखेला खूप महत्त्व आहे. या व्यक्तिरेखेसाठी कलाकाराचा शोध सुरू झाल्यानंतर कोणीतरी नितीन देसाईंनाच ही भूमिका करण्याचा सल्ला दिला. वास्तविक तेच या चित्रपटाचे निर्माते असल्यानं ही भूमिका साकारण्याचा निर्णय त्यांना क्षणभरात घेता आला असता. परंतु, तसं न करता त्यांनी या मिनिटभराच्या भूमिकेसाठी आधी "स्क्रीन टेस्ट' दिली. त्यानंतर प्रत्यक्ष चित्रीकरणाच्या दिवशी भूमिकेची गरज म्हणून टक्कल केलं. एखाद्या कलाकृतीसाठी सर्वस्व देणं म्हणजे नेमकं काय असतं, हे नितीन देसाईंशी या चित्रपटाबद्दल चर्चा केल्यानंतर अगदी छान समजतं.<br /><br />बालगंधर्वांचं व्यक्तिमत्त्व एवढं जबरदस्त आहे की, त्यातलं काय पडद्यावर दाखवावं आणि काय नाही, असा प्रश्न "बालगंधर्व टीम'ला पडला होता. सर्वच गोष्टी दाखवायच्या म्हटलं तरी चित्रपटाची लांबी साडे तीन-चार तासांपर्यंत गेली असती. परंतु, आजच्या काळातील प्रेक्षकाची बदललेली मानसिकता लक्षात घेऊन चित्रपटाची लांबी कोणत्याही स्थितीत दोन तासांच्या वर जाऊ न देण्याचा क्रांतिकारी निर्णय घेण्यात आला. या निर्णयाची अंमलबजावणी करताना काही दृश्यांना कात्री लावावी लागली. बालगंधर्वांचे मायबाप म्हणजे रसिकप्रेक्षक. त्याच्या सेवेत खंड पडू न देण्याचा त्यांचा विडा शंभर वर्षांनी नितीन देसाई आणि त्यांच्या "टीम'नं उचलला आणि निर्मितीबाबत कसलीही तडजोड करण्यात आली नाही. तंत्रज्ञांनी ज्या काही गोष्टींची मागणी केली, त्याची पूर्तता झाली. या चित्रपटातील भव्यदिव्य सेट्स पाहताना एखादा "ऑपेरा' आपण पाहतोय की काय, असं वाटतं.<br /><br />मराठी चित्रपट निर्मात्यांची "कॉमन' समस्या म्हणजे चित्रपट ऐन प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर असला की त्यांच्याकडची पैशाची पुंजी संपते आणि प्रदर्शनापूर्वी आपला चित्रपट प्रसिद्धीबाबत "हाईप' करण्यात ते कमी पडतात. सुदैवानं या चित्रपटाबाबत तसं घडलेलं नाही. या चित्रपटाच्या ध्वनिफितीचा प्रकाशन सोहळाही अत्यंत देखणा आणि भव्यदिव्य प्रमाणातच करण्यात आला. इथं एक गोष्ट आवर्जून नमूद करावीशी वाटते. अलीकडच्या काळात "मिडीया'चं महत्त्व ओळखून त्याचा आपल्या नवीन चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी खूप चांगला उपयोग करण्यात अभिनेता आमिर खाननं यश मिळवलंय. त्याच्या यशावरून प्रेरणा घेत नितीन देसाईंनी या चित्रपटाचं "मिडीया कॅंपेन' थोडं वेगळ्या पद्धतीनं आखलं आणि त्याचा खूप चांगला "रिझल्ट' त्यांना आला. या चित्रपटाच्या मुहूर्तापासून ते प्रदर्शनापर्यंत त्यांनी एवढे काही "इव्हेंट्स' आयोजित केले की, त्याचं वाहिन्यांना मिळालेलं "सॉफ्टवेअर'च काही तासाचं होतं.<br /><br />नितीन देसाईंनी गेल्या 25 वर्षांमध्ये हिंदी चित्रपटसृष्टीमधील दिग्गज निर्माते-दिग्दर्शकांबरोबर खूप काम केल्यानं त्यांच्या "व्हिजन'ला आकार आला. परंतु, "बालगंधर्व' चित्रपटाच्या निमित्तानं त्यांनी दाखविलेल्या "पॅशन'शी जुळवून घेताना काही अडचणीदेखील आल्या. रुळ बदलताना जसा खडखडाट व्हावा, तसा खडखडाटही झाला. परंतु, त्याचा "रिझल्ट' चांगला आलाय. सर्व आघाड्यांवरचं "टॅलेण्ट' एकत्र येणं, हे जेवढं चांगलं, तेवढंच या "टॅलेण्ट'ला पुरेपूर न्याय मिळणंही महत्त्वाचं असतं. तो न्याय या चित्रपटाला मिळालाय. "बालगंधर्व'च्या "बजेट'चा आकडा समजताच मराठी चित्रपटसृष्टीतील अनेकांचे डोळे पांढरे झाले. "इतनी रिकव्हरी कहॉं से होगी?' असा प्रश्नही काहींनी विचारला. काहींनी एवढी "रिकव्हरी' होणं कठीण असल्याचं मत ताबडतोब व्यक्त करून "ये फिल्म नितीनने पैसे के लिए नहीं पॅशन के लिए बनाई है ।' असं "सेफ' ÷तरही दिल. त्यामुळे आता खरी परीक्षा नितीन देसाई आणि त्यांच्या "टीम'बरोबरच प्रेक्षकांचीही आहे. महाराष्ट्राचा अभिमान आणि मानबिंदू असलेल्या बालगंधर्वांवर प्रचंड कष्ट आणि सहा कोटी रुपये खर्चून बनलेला चित्रपट ते कसे स्वीकारतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. <br />- मंदार जोशीMandar Joshihttp://www.blogger.com/profile/17017614789313998938noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-6424345992684415946.post-8555517158416321612011-04-29T09:07:00.000-07:002011-04-29T09:09:00.005-07:00हार आणि प्रहारहार आणि प्रहार<br />------------<br />कलावंतांच्या कामगिरीचं कौतुक करण्यासाठी पाठीवर दिली जाणारी थाप म्हणजे पुरस्कार. परंतु, गेल्या काही वर्षांमध्ये वेगवेगळ्या पुरस्कार सोहळ्यांचं जे पीक आलंय, त्यामध्ये कलावंतांचं कौतुक होण्याऐवजी त्यांची बदनामीच अधिक होत असल्याचं चित्र प्रकर्षानं समोर आलं आहे. प्रसिद्ध अभिनेता प्रसाद ओक यानं "झी मराठी' वाहिनीविरूद्ध नुकतीच जी तोफ डागली आणि त्यानिमित्तानं मराठी चित्रपटसृष्टीत ज्या प्रतिक्रिया उमटल्या त्या पाहिल्यानंतर या विषयाचं महत्त्व लक्षात येतं. "झी'च्या पुरस्कार सोहळ्यात आपल्या चारित्र्याचं हनन केल्याचं प्रसादचं म्हणणं आहे. अर्थात, प्रसादसारखा अनुभव यापूर्वीही अनेक कलावंतांच्या वाट्याला वेगवेगळ्या सोहळ्यांमध्ये आलाय. फक्त मराठी चित्रपट पुरस्कारांपुरताच हा विषय मर्यादित नसून विविध संस्थांतर्फे दिल्या जाणाऱ्या हिंदी चित्रपट पुरस्कार सोहळ्यांमध्येही असे प्रकार यापूर्वी घडले आहेत. प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर-साजीद खान यांच्यातील शेरेबाजीही अशीच बराच काळ वादग्रस्त ठरली होती. परंतु, पूर्वीच्या कटू प्रकारांमधून काही धडा न घेता पुरस्कारांचं आयोजन करणारी मंडळी आणि पुरस्कार सोहळ्यांमध्ये सहभागी होणारी मंडळी त्याच त्याच चुकांची पुनरावृत्ती करीत आहेत.<br /><br />पुरस्कार सोहळ्यांची संख्या वाढल्यानं हल्ली प्रत्येक वाहिनी आपला सोहळा इतरांपेक्षा कसा वेगळा आणि "हट के' होईल, याकडे अधिक लक्ष देत आहे. परंतु, "हट के' करण्याच्या नादात आपल्याकडून होणाऱ्या चुका त्यांच्या लक्षात येत नाहीत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या वाहिन्यांवर कलाकारांची बदनामी केल्याचा आरोप आहे, त्या आणि संबंधित कलाकारांचे तत्पूर्वी अतिशय चांगले संबंध असल्याचं लक्षात येतं. त्यामुळे कलावंतांच्या बदनामीचे प्रकार नक्की कोणत्या कारणामुळे घडतात, हा खरोखरीच एक शोधाचा विषय बनलाय. असा एखादा प्रकार घडला की संबंधित वाहिनी सोहळ्याचे आयोजन आणि "स्क्रीप्ट' लेखकांना झालेल्या चुकीबद्दल जबाबदार धरतात. परंतु, अशी जबाबदारी निश्चित झाल्यानंतरही कोणावर कसलीही कारवाई झाल्याचं ऐकीवात नाही. तसेच ज्या वाहिन्या कलावंतांचा "अजिंक्यतारा' नावानं गौरव करतात, तसेच त्यांना आपले "ब्रॅंड ऍम्बेसेडर' बनवितात, त्या वाहिन्यांनी अपघातानं का होईना कलावंतांची बदनामी झाली तरी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करण्याचा मोठेपणा दाखवित नाहीत. <br /><br />या सगळ्या प्रकारामध्ये कलावंतांकडून होणाऱ्या चुकांना माफ करता येणार नाही. सूत्रसंचालकाकडून भलतंच वक्तव्य केलं गेलं की तो त्यासंबंधीची जबाबदारी स्वतःवर न घेता "स्क्रीप्टरायवर'वर टाकून मोकळा होतो. आपल्या तोंडी असलेलं वक्तव्य जर आपल्याच परिवारातील एखाद्या सहकाऱ्याशी संबंधित असेल तर ते न म्हणण्याचं धाडस सूत्रसंचालक का दाखवीत नाहीत ? तसेच एखाद्या कलाकाराची बदनामी झाल्याचं सर्वांना समजत असूनही संबंधित वाहिनीविरुद्ध कधी कोणी एकत्रितपणे आवाजही उठवीत नाहीत. त्यामागचं कारण म्हणजे प्रत्येकाला लोकप्रिय वाहिनीबरोबरचे आपले हितसंबंध जपायचे असतात. त्यामुळेच वाहिन्यांकडून चूक झाल्याचं समजत असूनही त्याविरुद्ध एकत्रितपणे लढा देण्याचं कोणाला उमजत नाही. तसेच ज्या कलाकाराची वाहिन्यांकडून कथित बदनामी झाली आहे, त्या कलाकारांची भूमिकादेखील तळ्यात-मळ्यात असते. संबंधित वाहिनीविरुद्ध भविष्यात आपण काम करणार नाही, अशी भूमिका घेण्याचं धाडस ते का दाखवीत नाहीत ? <br /><br />सर्वसामान्यांच्या दृष्टीकोणातून या घडामोडींचा विचार केल्यास त्यात त्यांना फारसं काही खटकत नाही. कारण, टीव्हीवरील कार्यक्रम असतात ते मनोरंजनासाठी. पुरस्कार सोहळे हे कधीच गांभीर्यानं घ्यायचे नसतात, असा समज रुढ झालाय. त्यामुळे अशाप्रकारची थट्टा-मस्करी त्यात चालतेच, असं प्रेक्षकांनीच आता गृहित धरलंय. त्यामुळे पुरस्कार सोहळ्यांचं आयोजन करणाऱ्यांनी आपली विश्वासार्हता तपासायला हवीय तसेच कलावंतांनीही निव्वळ प्रसिद्धी मिळतेय, यावर आनंद न मानता आपण कोणत्या सोहळ्यात सहभागी होतोय, याचीही काळजी घ्यायला हवी. तसं घडलं तरच अशा अपघातांची संख्या कमी होईल.<br /><br />प्रीमियर' मासिकMandar Joshihttp://www.blogger.com/profile/17017614789313998938noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-6424345992684415946.post-69106559810090158792009-03-31T08:24:00.000-07:002009-03-31T08:25:19.723-07:00review - बारह आनावेगळ्या वाटेचा भन्नाट सिनेमा<br />"बारह आना' हा खूप इंटेलिजिएण्ट सिनेमा आहे. तो एकाचवेळी आपल्याला हसवतो, कोड्यात टाकतो आणि काही प्रमाणात अंतर्मुखही करायला लावतो. सध्याच्या मल्टिप्लेक्स कल्चरमधला एक अत्यंत प्रभावी चित्रपट म्हणून त्याची नोंद करावी लागेल. शोफर, वॉचमन आणि वेटर... या समाजातल्या तशा तीन उपेक्षित व्यक्तिरेखा. त्यांच्यावर एखादा हिंदी चित्रपट बनू शकतो, असा विचारही कधी आपल्या मनात येऊ शकणार नाही. पण दिग्दर्शक राजा मेनन यांनी या तीन व्यक्तिरेखांचा खूप सुरेख मेळ घालून एक वेगळ्या पद्धतीचं मनोरंजन दिलंय.<br />नसिरुद्दीन शाह यांनी साकारलेली व्यक्तिरेखा म्हणजे शोफर. ते धनाढ्य व्यक्तीच्या गाडीवर शोफर म्हणून काम करीत असतात. मात्र, आपल्या मालकिणीकडून सतत त्यांना हिडीसफिडीस पद्धतीची वागणूक मिळत असते. विजय राज हा वॉचमन असतो. बिल्डिंगवर लक्ष ठेवण्याऐवजी त्याला तिच्यात राहणाऱ्यांचीच अधिक कामं करावी लागत असतात. उत्पन्न कमी आणि गावाकडे राहणाऱ्या आपल्या कुटुंबीयांचा खर्च या कात्रीत तो अडकलेला असतो. तिसरा असतो वेटर अर्जुन माथूर. एका चांगल्या हॉटेलमध्ये तो वेटरची नोकरी करीत असतो. तिथं येणाऱ्या एका विदेशी तरुणीलाच तो आपलं हृदय देऊन बसतो. या तिघांच्या कथानकांना एकत्र जोडणारा धागा म्हणजे त्यांचं निवासाचं स्थान. एका चाळीतल्या खोलीत हे तिघं एकत्र राहत असतात. आपापल्या परिस्थितीला दोष देत आयुष्य कंठण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नसतो. मात्र एकेदिवशी विपरीत घडतं. वॉचमनच्या हातून एका व्यक्तीला नकळत थप्पड बसते आणि सुरू होतं अपहरणाचं सत्र. त्यातून मानवी मनाचे वेगवेगळे कंगोरे प्रेक्षकांसमोर येतात.<br />दिग्दर्शक राजा मेनन यांनी हा सगळा घटनाक्रम अतिशय छानरीत्या चित्रित केलाय. समाजातल्या उपेक्षित घटकांचं दुःख त्यांनी चित्रपटाच्या सुरुवातीला टिपलंय आणि मध्यांतरानंतर त्याला त्यांनी वेगळीच फोडणी दिलीय. छोट्या-छोट्या प्रसंगांमधून त्यांनी संपूर्ण चित्रपट खुलवलाय. हा चित्रपट विलक्षण उंचीवर गेलाय तो कलाकारांच्या अभिनयामुळे. वॉचमनची भूमिका करणाऱ्या विजय राजनं या चित्रपटातील अभिनयाद्वारे आपली सर्वोत्तम कामगिरी नोंदवलीय. वॉचमनच्या व्यक्तिरेखेतील बारीकसारीक गोष्टी त्यानं आपल्यात इतक्या सफाईनं मुरवल्यात की आपल्याला खरा विजय राज आठवतच नाही. नसिरुद्दीन शाह हा कलावंत एवढ्या उंचीवर का पोचलाय, हे जाणून घेण्यासाठी तरी हा चित्रपट पाहायलाच हवा. संपूर्ण चित्रपटात हा कलाकार फक्त क्लायमॅक्समध्ये काही वाक्य बोललाय, पण त्यांचं न बोलणंही बरंच काही बोलून गेलंय. फक्त आपल्या "स्क्रीन प्रेझन्स'द्वारे त्यांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवलंय. अशाप्रकारची अदाकारी आपल्याला नवीन आहे. वेटरची भूमिका करणाऱ्या अर्जुन माथूर यानेही छान काम केलंय. चित्रपटात एकही गाणं नाही ही सर्वात चांगली गोष्ट. हिंदी सिनेमा सध्या खूप चांगल्या वळणावर आहे. "बारह आना' हा त्याच वळणावरचा एक चित्रपट आहे.Mandar Joshihttp://www.blogger.com/profile/17017614789313998938noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-6424345992684415946.post-27010014118272487772008-08-23T07:34:00.000-07:002008-08-23T07:35:49.690-07:00review-"मान गये मुघल-ए-आझम'"शोले' आणि "जाने भी दो यारो...' या दोन अशा कलाकृती आहेत की, ज्या वारंवार तरुण निर्माता-दिग्दर्शकांच्या स्वप्नात येतात आणि त्यांना नको ते करायला भाग पाडतात. लेखक-दिग्दर्शक संजय छेल यांचा "मान गये मुघल-ए-आझम' हा सिनेमासुद्धा अशाच एका भंगलेल्या स्वप्नाची कहाणी आहे. <br />"मान गये मुघल-ए-आझम' या "टायटल'वरून या सिनेमाचा के. आसिफ यांच्या "मुघल-ए-आझम'शी अगदी जवळचा संबंध असेल, असं वाटण्याची शक्यता आहे; मात्र हा सिनेमा "मुघल-ए-आझम'शी नव्हे, तर "जाने भी दो यारो'शी संबंधित आहे. गेल्या काही वर्षांमध्ये चटपटीत लिखाणात छेल यांनी चांगलं यश मिळवलं आहे, पण दहा-पंधरा चांगले संवाद आणि प्रसंगांमुळं सिनेमा बनत नाही, हे छेल यांना ठाऊक नसावं. एकाच कथानकातून त्यांनी देशभक्ती, प्रेम, रहस्य मांडण्याचा प्रयत्न केलाय आणि अपेक्षेप्रमाणे एक ना धड... असा "फील' या सिनेमाला आलाय. परेश रावल, के. के. मेनन, राहुल बोस, मल्लिका शेरावत अशी चांगली "कास्ट' असूनही वेगळेपणाच्या हव्यासामुळं ती "वेस्ट' गेलीय.<br />या चित्रपटालाही बॉम्बस्फोटाचीच पार्श्वभूमी आहे. 1993 मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटांची तयारी फेब्रुवारीत झाली. लेखकानं त्याचा संबंध आपल्या कथानकाशी जोडलाय. गोव्यातील एका नाटक कंपनीचा परेश रावल हा मुख्य अभिनेता. मल्लिका शेरावत ही त्याची पत्नी. "मान गये मुघल-ए-आझम' या नाटकात परेश अकबर बादशहाचा, तर मल्लिका अनारकलीची व्यक्तिरेखा साकारीत असते. राहुल बोस हा "रॉ'चा एक अधिकारी. तो गुन्हेगारांच्या शोधासाठी गोव्यात येतो आणि मल्लिकाच्या प्रेमात पडतो. तो आणि मल्लिका देशप्रेमाच्या नावाखाली परेश रावलचा वापर करून घेतात. चित्रपटाचा व्हिलन झालाय तो के. के. मेनननं साकारलेला एका गझल गायक. त्याचे गुन्हेगारी जगताशी संबंध असतात. मल्लिका आणि परेश रावळच्या मदतीनं राहुल बोस हे संबंध उघडकीस आणतो. <br />"जाने भी दो यारो'द्वारे दिग्दर्शक कुंदन शहा यांनी एक छान सामाजिक-राजकीय प्रहसन सादर केलं होतं. संजय छेल यांना या सिनेमातून असंच काहीतरी अपेक्षित होतं, पण कच्च्या लिखाणामुळं त्यांची ही अपेक्षा पूर्ण होऊ शकलेली नाही. छेल यांच्यातील लेखक एवढा कमी पडला आहे की, या चित्रपटाला सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत "ग्रीप' घेता आलेली नाही. दहा पाच-दहा मिनिटांनी एखाद-दुसरा चांगला संवाद, या गतीनं हा सिनेमा सुरू राहतो. परेश-मल्लिकाच्या व्यक्तिरेखा चांगल्या उभ्या राहिल्यात, पण राहुल बोस आणि के. के. मेनन यांच्याबद्दल तसं म्हणता येत नाही. या सिनेमात "मान गये...' हे नाटक बऱ्याचदा पाहायला मिळतं. या नाटकातली कलाकार मंडळी वारंवार आपले संवाद बदलतात, नको ती "ऍडिशन्स' घेतात, त्यांच्या अभिनयात कोणतंही गांभीर्य दिसत नाही... तरीसुद्धा हे नाटक पाहायला अनेकांनी गर्दी केल्याचं दिसतं. <br />मल्लिका आणि राहुल बोस यांचं खरोखरीच "अफेअर' असतं की राहुलच्या देशप्रेमाचा तो एक भाग असतो, याचा सिनेमा संपला तरी पत्ता लागत नाही. परेश रावल हे "सीझन्ड ऍक्टर' असल्यामुळे त्यांनी आपला भाग तयारीनं सादर केलाय. मल्लिकानंही आपल्या मर्यादा सांभाळून त्यांना चांगली साथ दिलीय. राहुल बोसची "इमेज' या सिनेमाद्वारे तोडण्यात आलीय. के. के. मेनन त्याच्या भूमिकेत अगदीच "मिसफिट' वाटलाय. अन्नू मलिक यांचं संगीत ऐकताना या चौघांचा गोंधळ बरा म्हणायची वेळ येते. त्यामुळे हा सिनेमा संपल्यानंतर छेल यांना एखादं नवीन स्वप्न पडो, एवढीच काय ती शुभेच्छा द्यावीशी वाटते.Mandar Joshihttp://www.blogger.com/profile/17017614789313998938noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-6424345992684415946.post-9159550910559987372008-08-23T07:32:00.000-07:002008-08-23T07:33:16.583-07:00review-मुंबई मेरी जानमुंबई... जी कधी थकत नाही आणि जी कधीही दमत नाही... असा मुंबईनगरीचा गौरव केला जातो. कधी नैसर्गिक आपत्ती असो किंवा कधी दहशतवादानं मांडलेला क्रूर खेळ असो... अनेक संकटं कोसळूनही हे शहर काहीच घडलं नसल्याप्रमाणे आजवर कार्यरत राहिलेलं आहे. हिंदी चित्रपटांमधून ही मुंबई अनेक वेळा प्रेक्षकांसमोर आली आहे, पण या मुंबईला जिवंत ठेवणारा सर्वसामान्य मुंबईकर सेल्युलॉईडद्वारे प्रभावीपणे अपवादानेच आपल्यासमोर आलाय. ही कसर निशिकांत कामत यांच्या "मुंबई मेरी जान' या सिनेमानं भरून काढलीय. मुंबईत 2006 च्या जुलैत लोकलमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांची पार्श्वभूमी निवडत कामत यांनी मुंबईच्या "स्पिरिट'ला एक आगळावेगळा सलाम ठोकलाय. तो आपण स्वीकारलाच पाहिजे. बॉम्बस्फोट का घडला, कोणी घडविला, त्याचे धागेदोरे कसे मिळाले... या "रिसर्च'मध्ये गुंतून न पडता दिग्दर्शकानं आपला केंद्रबिंदू सर्वसामान्य मुंबईकरांवर ठेवलाय. त्यामुळेच हा सिनेमा पाहणाऱ्याच्या हृदयाला भिडतो, त्याला अनेकदा अस्वस्थ करतो आणि मुंबईकरांच्या उपजत "ह्युमर'ला दाद देण्यास भाग पाडतो. "युटीव्ही'ची दर्जेदार निर्मिती, कसदार लेखन, संजय जाधव यांचं अप्रतिम कॅमेरावर्क आणि कामत यांच्या "पॉलिश्ड' दिग्दर्शनामुळं हा सिनेमा वेगळ्या वाटेचा असूनही अत्यंत परिणामकारक ठरलाय.<br />बॉम्बस्फोट होण्याआधी; तसेच तो झाल्यानंतर सहा व्यक्तींच्या आयुष्यावर दिग्दर्शकानं आपला "फोकस' ठेवलाय. परेश रावल हे पोलिस दलातील एक वरिष्ठ कॉन्स्टेबल दाखवलेत. अवघ्या दहा दिवसांनंतर ते पोलिस सेवेतून निवृत्त होणार असतात. विजय मौर्या हा त्यांचा तरुण सहकारी. या दोन व्यक्तिरेखांमधील संवादांद्वारे दिग्दर्शकानं अख्ख्या पोलिस दलाचं "आरपार' चित्र उभं केलंय. हिंदी चित्रपटांमधील पोलिस हा नेहमीच विनोदाचा विषय झालाय. हा सिनेमा त्याला छेद देऊन गेलाय. सोहा अली खान ही एका चॅनेलमधील तरुण, तडफदार पत्रकार. लोकलमध्ये बॉम्बस्फोट झाल्यानंतर तिच्यातली पत्रकार जागी होते, मात्र आपला पती बॉम्बस्फोटात मरण पावल्याचं तिला समजतं. या वेळी बातमी शोधायला गेलेली सोहा आपल्याच चॅनेलची एक "ब्रेकिंग न्यूज' ठरते आणि तिचा "बाईट' घेण्यापर्यंत मजल जाते. <br />या सिनेमातलं चौथं व्यक्तिमत्त्व आहे ते इरफान खान. दक्षिणेतल्या कोणत्यातरी खेडेगावातून आलेली ही व्यक्ती मुंबईत सायकलवरून चहा-कॉफी विकत असते. बॉम्बस्फोटानंतर काही तासांतच त्याची भेट परेश रावल आणि विजय मौर्याशी होते आणि त्याच्या आयुष्याला वळण मिळतं. आपला काही गुन्हा नसताना पोलिस त्रास देत असल्यामुळे इरफान त्यांच्यावर वेगळ्या पद्धतीनं सूड उगवतो. कधी मॉलमध्ये खोटा बॉम्ब ठेवल्याचा फोन कर; तर कधी रेल्वेस्थानकामध्ये, मात्र त्याच्या एका खोट्या फोनमुळं एका व्यक्तीला "हार्टऍटॅक' येतो. या वेळी इरफानचं झालेलं परिवर्तन आणि त्यानंतर त्याची कृती या सिनेमाला हळूहळू उंचीवर नेऊ लागते. माधवन हा कट्टर देशभक्त. प्रदूषणाचं प्रमाण रोखण्यासाठी तो स्वतः ऐपत असूनही चारचाकीमधून न फिरता लोकलमधूनच प्रवास करीत असतो, मात्र बॉम्बस्फोटाचा "आँखो देखा हाल' पाहिल्यानंतर त्याचं आयुष्यच बदलतं. के. के. मेनन हा सुशिक्षित बेरोजगार. कॉम्प्युटर इंजिनियर असूनही त्याला चांगली नोकरी मिळत नाही. मग काय, रिकाम्या मनात सैतानाचं भूत अवतरणारच. आपल्या आजूबाजूला असणाऱ्या सर्व मुस्लिमांकडे तो ते दहशतवादीच आहेत, या नजरेतून बघत असतो आणि आपल्या मित्रांचेही कान भरत असतो, मात्र बॉम्बस्फोटानंतर अशा काही घटना घडतात, की त्याचे डोळे उघडतात.<br />योगेश विनायक जोशी आणि उपेंद्र सिधये यांनी या सिनेमाची कथा-पटकथा लिहिलीय. या सहा व्यक्तींचे पाच "ट्रॅक' परस्परांमध्ये मिसळणं हे खूप अवघड काम होतं, पण लोकलचा एका "ट्रॅक'वरून दुसऱ्या ट्रॅकवर जाताना जो खडखडाट होतो, तसा खडखडाट लेखक-दिग्दर्शकानं होऊ दिलेला नाही. हे त्यांचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. परेश रावल आणि विजय मौर्याचा "ट्रॅक' सर्वाधिक परिणामकारक आहे. सोहा आणि माधवनचा "ट्रॅक' ठीकठाक असून, इरफानचा खूप वेगळा वाटतो. तुकाराम पाटील या व्यक्तिरेखेत परेश रावल यांनी कमाल केलीय. या कलाकाराला कोणताही "रोल' द्या, त्यात त्याचं भिडणं विलक्षण असतं. रावल यांच्या कारकिर्दीतील काही भन्नाट भूमिकांपैकी ही भूमिका एक ठरावी. विजय मौर्या यांनी रावल यांना खूप छान साथ दिलीय. चांगला दिग्दर्शक असेल; तर सोहा अली खानचा प्रभाव जाणवतो, हे यापूर्वीही दिसून आलं होतं. या सिनेमात नेमकं तेच पाहायला मिळतं. इरफान खान, माधवन आणि के. के. मेनन हे तिघेही आपापल्या व्यक्तिरेखा साकारताना अगदी "टॉप फॉर्म'मध्ये वाटतात. सिनेमाच्या शेवटी "ये दिल है मुश्किल...' हे गाणं "बॅकग्राऊंड'वर ऐकविण्याची कल्पनाही भन्नाट आहे. "डोंबिवली फास्ट'मुळे वाढलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यात कामत यांना यश आलंय. हिंदी चित्रपटसृष्टीवर राज्य करण्यासाठी आणखी एक मराठी दिग्दर्शक सज्ज होतोय. त्याच्या या प्रयत्नांचं कौतुक करायला हवं.Mandar Joshihttp://www.blogger.com/profile/17017614789313998938noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-6424345992684415946.post-54800559713729483982008-07-23T05:40:00.000-07:002008-07-23T05:41:07.106-07:00"कॉन्ट्रॅक्ट' reviewहुकमाचा एक्काही कामी !<br />"सरकार राज'ला बऱ्यापैकी आकार देण्यात रामगोपाल वर्मांना यश आल्यानं हा दिग्दर्शक पुन्हा माणसात येतोय, असं वाटत होतं. मात्र, "कॉन्ट्रॅक्ट' पाहिल्यानंतर तसं काही झालं नसल्याची खात्री पटते. गेल्या काही वर्षांमध्ये वर्मांनी आपल्या चित्रपटांमधून बरेच प्रयोग केले. "गॅंगवॉर'पट सोडले तर त्यांचे बहुतेक सर्व प्रयोग फसले. "सत्या', "कंपनी'नंतर वर्मांनी "कॉन्ट्रॅक्ट' बनवला तो गॅंगवॉरपटांची त्रिधारा पूर्ण करण्यासाठी. या विषयात त्यांची मातब्बरी असल्यानं "कॉन्ट्रॅक्ट'द्वारे ते निराश करणार नाहीत, असं वाटत होतं. पण, सूर हरवलेल्या वर्मांचा हुकमाचा एक्काही या सिनेमात चाललेला नाही. या सिनेमात त्यांनी "अंडरवर्ल्ड'चा दहशतवादाशी संबंध जोडण्याचा प्रयत्न केलाय. मात्र, एवढा स्फोटक विषय हाताळण्यासाठी आवश्यक तेवढी मेहनत वर्मांनी घेतलेली नाही. "रॉ स्टॉक'मधली काही दृश्यं जोडून एखादा सिनेमा तयार व्हावा, असा "फील' हा चित्रपट पाहताना येतो. दहशतवादाच्या मुळाशी जाण्याऐवजी वर्मांनी दोन गॅंगमधला बटबटीत हिंसाचार चित्रपटभर दाखवलाय. एका प्रतिभाशाली दिग्दर्शकाची ही उतरती भाजणी खऱ्या सिनेमा शौकिनासाठी धक्कादायक आहे.<br />अमन (अध्मिक महाजन) हा लष्करातून बाहेर पडलेला एक तरुण. त्याचं सळसळतं रक्त पाहून अहमद हुसेन (प्रसाद पुरंदरे) हा पोलिस अधिकारी प्रभावित होतो. दहशतवादाचा समूळ नायनाट करण्यासाठी त्याचा उपयोग करून घेण्याचं तो ठरवतो. "आरडी' नावाच्या दहशतवादाच्या टोळीत शिरून त्याचा बंदोबस्त करण्याची योजना तो त्याच्यापुढं ठेवतो. पण, अमनला शांततेत आयुष्य जगायचं असल्यानं तो हे काम करण्यास नकार देतो. काहीच दिवसांमध्ये दहशतवाद्यांनी घडवलेल्या बॉम्बस्फोटात अमनची पत्नी आणि मुलीचा मृत्यू होतो. आपल्या घरापर्यंत पोचलेलं हे दहशतवादाचं लोण पाहून अमन हादरतो. अहमद हुसेन यांचा "प्लॅन' तो मान्य करतो आणि गुन्हेगार बनून "आरडी'च्या टोळीत सहभागी होतो. "आरडी'चा "नंबर वन' शत्रू असलेल्या गुंगाच्या (उपेंद्र लिमये) टोळीवर तो तुटून पडतो. मात्र, सरतेशेवटी या चक्रव्यूहातून बाहेर पडणं त्याला कठीण होतं.<br />वर्मांचा सूर साफ हरविल्याची लक्षणं संपूर्ण "कॉन्ट्रॅक्ट'मध्ये पाहायला मिळतात. टोळीयुद्धाचा दहशतवादाशी संबंध जोडताना वर्मांकडून अभ्यासपूर्ण हाताळणीची गरज होती. पण, दोन गॅंगमधला रक्तरंजित हिंसाचार एवढ्यापुरताच हा सिनेमा मर्यादित राहतो. चित्रपटाचा हीरो अमन लष्करातून बाहेर का पडतो, याचे सबळ कारण सिनेमात पाहायला मिळत नाही. केवळ एका पोलिस अधिकाऱ्याच्या इच्छेसाठी तो "आरडी' या दहशतवाद्याच्या टोळीत शिरायला तयार होतो, असं या सिनेमात दाखविण्यात आलंय. तसेच त्याचा या टोळीतील प्रवेश अगदी लुटूपुटूचा वाटतो. आरडीचा शत्रू गुंगाला कायम समुद्रातल्या बोटीवर दाखवून दिग्दर्शकानं त्याच्या अस्तिस्तावरही मर्यादा आणल्यात. बोटीवरचे सगळेच प्रसंग अगदीच बटबटीत झाले आहेत. वर्मांमधल्या दिग्दर्शकानं आपल्या सहाय्यकांकडून तांत्रिक कामं छान करवून घेतली आहेत. पण, चांगल्या सिनेमासाठी आवश्यक असलेल्या पटकथेबाबत त्यांनी डोळेझाक केलीय. या चित्रपटातले संवाद अगदीच कामचलाऊ आहेत. अमनची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अध्मिक महाजनचा हा पहिला चित्रपट असून त्याचं नवखेपण जाणवत राहतं. पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत प्रसाद पुरंदरे यांनी आपली चांगलीच छाप उमटवली आहे. उपेंद्र लिमये यांची व्यक्तिरेखा सुरुवातीला चांगली वाटते. पण, नंतर या व्यक्तिरेखेला दिग्दर्शकानं जे जे चाळे करायला लावलेत, त्यामुळं तिचा प्रभाव कमी झालाय. दिग्दर्शकाला ही व्यक्तिरेखा "सत्या'मध्ये मनोज वाजपेयीनं साकारलेल्या भिकू म्हात्रेच्या जवळपास नेण्याची इच्छा असावी. पण, प्रत्यक्षात तसं घडलेलं नाही. अमृता सुभाष यांनी आपल्या वाट्याला आलेली "लाऊड' भूमिका आणखीनच "लाऊड' केलीय. अमृता खानविलकरची भूमिका खूपच छोटी आहे. अमर मोहिले यांचं संगीत त्यातल्या त्यात बरं आहे. एकंदरीत वर्मांमधल्या दिग्दर्शकाचा असा हरवलेल<br />ा सूर पाहणं, ही खरोखरीच खूप तापदायक गोष्ट आहे.Mandar Joshihttp://www.blogger.com/profile/17017614789313998938noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-6424345992684415946.post-79996611749788356272008-07-22T06:36:00.000-07:002008-07-22T06:37:17.447-07:00किस्मत कनेक्शन review"लूज' कनेक्शन !<br />दिग्दर्शक अजिज मिर्झांची ओळख म्हणजे "राजू बन गया जंटलमन', "येस बॉस', "चलते चलते' हे चित्रपट. हलकेफुलके विषय आणि त्याची तितकीच हलकीफुलकी हाताळणी, हे त्यांच्या सिनेमाचं ठळक वैशिष्ट्य. "चलते चलते'च्या यशानंतर तब्बल पाच वर्षांनी त्यांनी "किस्मत कनेक्शन' हा सिनेमा बनवलाय. दरम्यानच्या काळात हिंदी सिनेमा खूप बदललाय. त्यांची ही विश्रांती सिनेमातही जाणवते. यावेळी मिर्झांनी आपल्या सिनेमातून मनोरंजनाबरोबरच "सोशल मेसेज' देण्याचा प्रयत्न केलाय. पण या दोन्ही गोष्टींचं करण्यात आलेलं "कनेक्शन' चांगलंच "लूज' झालंय आणि इथंच हा सिनेमा गडबडलाय. काही "पॅचेस'मध्ये हा सिनेमा चांगला वाटतो. मात्र, तेवढ्यासाठी तो संपूर्ण पाहणं तापदायक ठरेल. "जब वुई मेट' आणि "लगे रहो मुन्नाभाई' असं भिन्न पद्धतीचं मनोरंजन दिग्दर्शकाच्या डोक्यात होतं. ते प्रत्यक्षात पडद्यावर भलत्याच रूपात उतरलंय.<br />हिंदी सिनेमातल्या हीरोचं चावून चोथा झालेलं नाव म्हणजे राज मल्होत्रा. मिर्झांनी आपल्या हीरोला नेमकं हेच नाव दिलंय. शिक्षणात त्यानं मोठी मजल मारलेली असते. मात्र, शिक्षण पूर्ण होऊन पाच वर्षें उलटली तरी त्याला नोकरी-व्यवसायात जम बसवता आलेला नसतो. त्याचं नशीब उघडतं ते प्रियाच्या (विद्या बालन) आगमनानंतर. दोन-चार प्रसंगात या दोघांची अपघातानं भेट होते आणि प्रत्येक वेळी ही भेट राजला फायदेशीर ठरते. प्रिया एक वृद्धाश्रम (मिर्झांनी त्याला "कम्युनिटी सेंटर' असं गोंडस नाव दिलंय) चालवीत असते. या वृद्धाश्रमाच्या जागेवर एक मॉल उभारण्यात येणार असतो. या मॉलचं काम मिळवण्यासाठी राजची धडपड सुरू असते. वृद्धाश्रम सुरू ठेवून तिथं आपण मॉल बांधण्याचा बिल्डरवर दबाव आणू, असं चित्र तो प्रियासमोर उभं करतो. प्रियाला ते खरंच वाटतं. या प्रवासादरम्यान दोघं एकमेकांच्या प्रेमात पडतात. पण मॉल उभारण्याचा निर्णय होऊन तिथं वृद्धाश्रम बांधलं जाणार नसल्याचं स्पष्ट होतं तेव्हा प्रियाचे डोळे उघडतात. अखेरीस राजसुद्धा प्रियाच्या प्रेमासाठी आपला "प्रॅक्टिकल ऍप्रोच' दूर ठेवतो आणि एक प्रेमकहाणी यशस्वी होते.<br />संजय छेल या यशस्वी पटकथा लेखकानं हा सिनेमा लिहिलाय. पण वर उल्लेख केल्याप्रमाणे मनोरंजन आणि "सोशल मेसेज' यांचा सांधा त्यांना जोडता आलेला नाही. छेल आणि मिर्झा बऱ्याच आघाड्यांवर अपयशी ठरलेत. एक तर त्यांना शाहिद कपूर आणि विद्या बालन यांच्यातली प्रेमकहाणीसुद्धा छानपणे रंगविता आलेली नाही. "जब वुई मेट'च्या "ट्रॅक'वर ही प्रेमकहाणी चालते खरी. मात्र, त्या चित्रपटातला फ्रेशनेस, त्याची ट्रीटमेंट इथं पाहायला मिळत नाही. चित्रपटाचा उत्तरार्ध "लगे रहो...'च्या वळणानं जातो. पण इथंही तीच चूक पुन्हा घडलीय. विद्या बालनचा ना वृद्धाश्रम खरा वाटतो, ना त्यातली वृद्ध मंडळी. सगळाच प्रकार अगदी बेगडी झालाय. संपूर्ण चित्रपट कॅनडामध्ये चित्रीत झालाय. <br />कलाकार कितीही चांगला असो, पटकथेत गडबड झाली की त्याची मात्रा चालत नाही. हा अनुभव शाहिद कपूरचा अभिनय पाहताना येतो. त्यानं अनेक दृश्यांमध्ये शाहरूख खान आणि दिलीपकुमार यांची नक्कल केलीय. मात्र, "जब वुई मेट'मध्ये दिसलेला खराखुरा शाहिद कपूर इथं अपवादानंच दिसतो. विद्या बालननं या सिनेमातून आपला "लूक' बदललाय. पण व्यक्तिरेखेनं तिला यावेळी हात दिलेला नाही. त्यामुळं या दोघांचं पडद्याबाहेरचं "कनेक्शन' सध्या गाजत असलं तरी प्रत्यक्ष चित्रपटात ते अपवादानंच पाहायला मिळतं. शाहिदच्या मित्राच्या भूमिकेत पाहायला मिळणाऱ्या विशाल मल्होत्रानं केलेली धमाल त्यातल्या त्यात प्रेक्षकांची करमणूक करते. ओम पुरी यांनी साकारलेली बिल्डरची भूमिकाही चांगली आहे. प्रितम यांनी संगीतबद्ध केलेली एक-दोन गाणीच जमली आहेत.Mandar Joshihttp://www.blogger.com/profile/17017614789313998938noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-6424345992684415946.post-78418648454179417172008-07-14T03:03:00.000-07:002008-07-14T03:08:35.230-07:00किरण देवहन्स interviewकॅमेरामन से डायरेक्शन तक! <br />"कयामत से कयामत तक', "अक्स', "कभी खुशी कभी गम' आणि "जोधा अकबर' या परस्परभिन्न चित्रपटांचे छायादिग्दर्शक ही किरण देवहन्स यांची एक ठळक ओळख. जाहिरात क्षेत्रामध्ये गेल्या 20 वर्षांमध्ये केलेली कामगिरी ही त्यांची दुसरी ठळक ओळख. त्यांच्या नावावर सध्या हजारहून अधिक जाहिराती जमा आहेत. चित्रपट तसेच जाहिरात क्षेत्रामधील करियरबद्दल त्यांच्याशी केलेली चर्चा.<br />---------------<br />किरण देवहन्स मूळचे पुण्याचे. कॅमेरामन, ऍडफिल्ममेकर म्हणून नाव कमावणारे देवहन्स चांगले चित्रकार आहेत. शालांत अभ्यासक्रमातील "एलिमेंटरी' परीक्षेत ते तीन दशकांपूर्वी राज्यातून पहिले आले होते. मात्र, त्या काळात कला क्षेत्राकडं चांगल्या नजरेनं पाहिलं जात नसल्यामुळं ते फर्ग्युसन कॉलेजमध्ये दाखल झाले. तिथं पदवी घेतल्यानंतर "फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट'मध्ये (एफटीआयआय) त्यांनी प्रवेश घेतला. चित्रपट माध्यमातल्या सर्व शाखांचं तिथं शिक्षण दिलं जात असलं तरी देवहन्स यांना कॅमेरा या प्रकारातच अधिक गती होती. विशेष म्हणजे शेवटच्या वर्षी ते आपल्या गटात सर्वोत्कृष्ट कॅमेरामन ठरले. मुंबईतील आपल्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल ते सांगतात, ""नदीम खान यांच्याकडे मी सुरुवातीला सहाय्यक म्हणून काम केलं. "कसम पैदा करनेवालो की', "इल्जाम', "अलग अलग' यांसारखे अनेक चित्रपट मी त्या वेळी केले. त्या काळात छायादिग्दर्शकांना फारसे चांगले मानधन मिळत नसे. त्यामुळे त्यांना एका वेळी पाच-सहा चित्रपट करावे लागायचे. माझ्या नशिबानं खान यांच्याकडचे दोन सहाय्यक एकाच वेळी नोकरी सोडून गेले. त्यांचं जाणं माझ्या पथ्यावर पडून काही चित्रपटांचं मला स्वतंत्रपणे काम करण्याची संधी मिळाली. "तारे जमीं पर'मुळे प्रकाशात आलेले अमोल गुप्ते माझे चांगले मित्र. त्यांच्यामुळं माझी मन्सूर खान यांच्याबरोबर ओळख झाली आणि मला "कयामत से कयामत तक' हा पहिला सिनेमा मिळाला. तत्पूर्वी मी त्याच्यासोबत दोन वर्षं जाहिरात क्षेत्रासाठी काम केलं होतं. या काळात मी त्याच्याबरोबर तब्बल 500 जाहिराती केल्या.''<br />सर्वसाधारणपणे कोणत्याही कलाकाराचा कारकिर्दीतला पहिला सिनेमा हिट गेला की त्याच्यावर नवीन चित्रपटांचा वर्षाव होतो. देवहन्स यांच्याबाबत नेमकं तसंच घडलं. शेखर कपूर, राहुल रवैल या मान्यवरांबरोबरच अनेकांनी देवहन्स यांना आपल्या चित्रपटासाठी छायादिग्दर्शक म्हणून काम करण्याची ऑफर दिली. पण यापैकी एकही ऑफर न स्वीकारण्यामागची भूमिका स्पष्ट करताना देवहन्स म्हणतात, ""काही चित्रपटांची फोटोग्राफी करूनही मला चांगले मानधन मिळाले नव्हते. चार जणांच्या खोलीतील एक अशीच माझी मुंबईतील ओळख होती. बाहेरगावहून कोणी नातेवाईक मला भेटायला आला तर त्याची व्यवस्था कुठं करायची, असा मला प्रश्न पडला. तेव्हा जाहिरात क्षेत्र की सिनेमा या दोन्हीपैकी एकाची निवड करणं गरजेचं होतं. कारण, जाहिरात क्षेत्रात चांगलं नाव कमाविण्यासाठी प्रथम तिथं चार-पाच वर्षं घालवावी लागतात. बऱ्याच विचारविनिमयानंतर मी जाहिरात क्षेत्राची निवड करून पुढची दहा वर्ष तरी सिनेमासाठी काम करायचं नाही, असा निर्णय घेतला. आज जेव्हा मी तटस्थपणे विचार करतो तेव्हा माझा हा निर्णय योग्य होता, असं लक्षात येतं. कारण, जाहिरात क्षेत्रात त्या काळात फारसे चांगले कॅमेरामन नव्हते. त्यामुळं मी चित्रीत केलेल्या बहुतेक सर्व जाहिराती गाजल्या. कालांतरानं मी माझं स्वतःचं "कॅंडिड क्रिएशन्स' नावाचं "प्रॉडक्शन हाऊस' सुरू केलं. या कंपनीतर्फे शाहरूख खान, सचिन तेंडुलकर, जुही चावला यांच्यावर चित्रीत केलेल्या सर्व जाहिराती खूप गाजल्या.''<br />1988 ते 1998 या दहा वर्षांमध्ये देवहन्स यांनी जवळपास एक हजारहून अधिक जाहिराती केल्या. राकेश मेहरांच्या "अक्स'मुळं पुन्हा ते छायादिग्दर्शनाकडं वळले. या चित्रपटांचे "रशेस' पाहिल्यानंतर करण जोहरनं आपल्या "कभी खुशी कभी गम' चित्रपटासाठी त्यांना आमंत्रित केलं. "फाईव्ह स्टार' सोयीसुविधा पुरविणारा दिग्दर्शक असा ते करणचा उल्लेख करतात. आशुतोष गोवारीकर यांचा "स्वदेस' चित्रपट त्यांना इतर "कमिटमेंटस्'मुळं करता आला नाही, पण गोवारीकर "जोधा अकबर'ची तयारी करीत आहेत, हे समजल्यानंतर त्यांनी स्वतःहून आपण या चित्रपटासाठी काम करण्यास तयार असल्याचं सांगितलं. विशेष म्हणजे या चित्रपटातील देवहन्स यांचं कॅमेरावर्क वाखाणलं गेलं. जाहिरात क्षेत्रामधील अत्युच्च दर्जाचं काम आणि बिगबजेट चित्रपटांमुळं देवहन्स कमी बजेटमध्ये काम करायलाच तयार नाहीत, असा एक समज या काळात त्यांच्याबद्दल झाला. तो खोटा ठरविण्यासाठी ते आता अभिनेत्री दीप्ती नवल यांच्या नवीन चित्रपटासाठी काम करणार आहेत. या चित्रपटापाठोपाठ एखाद्या बिगबजेट चित्रपटाचं छायादिग्दर्शन करण्याचा त्यांचा विचार आहे आणि त्यानंतर त्यांना स्वतःचा सिनेमा दिग्दर्शित करायचाय. हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या प्रत्येकाचं एक ना एक दिवस दिग्दर्शक बनण्याचं स्वप्न असतं. देवहन्स यांचा हा स्वप्नपूर्तीचा प्रवास अगदी अंतिम टप्प्यात आहे.Mandar Joshihttp://www.blogger.com/profile/17017614789313998938noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-6424345992684415946.post-87539008077513300302008-07-04T09:00:00.001-07:002008-07-04T09:00:52.946-07:00हरमन बावेजा - interviewदिग्गजांच्या अपेक्षांना न्याय दिला पाहिजे...<br /><br />इंट्रो...<br />"दिलवाले', "दिलजले', "कयामत' यांसारख्या यशस्वी चित्रपटांचे दिग्दर्शक हॅरी बावेजा यांचा मुलगा, ही हरमन बावेजाची खरी ओळख. हृतिक रोशनसारखं दिसणं, ही त्याची दुसरी ओळख. मात्र, "लव्हस्टोरी 2050' हा सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच संजय लीला भन्साळी, आशुतोष गोवारीकर यांच्यासारखे दिग्गज दिग्दर्शक त्याच्यावर फिदा झालेत. आपल्या वाटचालीचा त्यानं घेतलेला हा मागोवा.<br />---------------<br />ः "लव्हस्टोरी 2050' हा त्याच्या नावाप्रमाणे खरोखरीच काळाच्या पुढचा सिनेमा आहे. प्रेमकहाणीच्या पार्श्वभूमीवर 2050 मध्ये मुंबई कशी बदलली आहे, त्याचं चित्र या सिनेमात पाहायला मिळेल. मुंबईकरांची रोजची पायाखालची ठिकाणं, गेट वे ऑफ इंडिया, छत्रपती शिवाजी रेल्वे टर्मिनस, फ्लोरा फाऊंटन यात आम्ही दाखवली आहेत. फक्त ही ठिकाणंच आधुनिक झालेली नाहीत, तर माणूसही आधुनिक झाला आहे. त्याची कामंही तो आधुनिक पद्धतीने करायला लागला आहे. मुंबई महापालिकेचे सफाई कर्मचारी आपल्या पायांना एक अत्याधुनिक व्हॅक्युम क्लीनर लावून शहराची सफाई करीत असताना या चित्रपटात पाहायला मिळतील. 2050 मधला मुंबईतला गाडीवरचा चहावाला कसा दिसेल, याचाही आम्ही अंदाज केला आहे. या सिनेमात तब्बल 1200 स्पेशल इफेक्टस् आहेत. निर्मिती खर्चाच्या दृष्टीनं हा आतापर्यंतचा सर्वात महागडा हिंदी चित्रपट आहे.<br />ः लहानपणापासूनच मला अभिनयाची आवड होती; मात्र 15-16 वर्षांचा झाल्यानंतर मला हॉटेल मॅनेजमेंटचं आकर्षण वाटू लागलं. स्वतःचं हॉटेल सुरू करण्याचं स्वप्न मी पाहिलं होतं. स्वप्नपूर्तीसाठी मी स्वित्झर्लंडला या शाखेचं शिक्षण घेण्यासाठी गेलो. ग्लास कसे सर्व्ह करायचे, हातात ट्रे कसा पकडायचा असतो, बाथरूममध्ये टॉवेल्स कसे लावले जातात, आदींचं मी शिक्षण घेतलं. वास्तविक, हॉटेल व्यवसायाच्या दृष्टीनं या सर्व गोष्टी शिकणं, हे खूप आवश्यक आहे. तिथं पहिल्या वर्षी मला रौप्यपदकही मिळालं. पण त्या शिक्षणात मी फार काळ रमू शकलो नाही. एकदा भारतात आल्यानंतर मी माझ्या पापांना खरं काय ते सांगून टाकलं. माझ्या आई-वडिलांनी आपले निर्णय कधीही माझ्यावर लादले नाहीत. माझा हा निर्णयसुद्धा त्यांनी अत्यंत शांतपणे स्वीकारला. "तुम नहीं चाहते हो तो ठीक है।' असं म्हणत दुसऱ्या दिवसापासून पापांनी मला त्यांच्यासोबत काम करण्यास सांगितलं.<br />ः त्यानंतरची सात-आठ वर्षं मी खूप मेहनत केली. मला या क्षेत्रातच "करियर' करायचं असल्यानं पापांनी माझ्याकडून थोडी जास्तच मेहनत करून घेतली. सिनेमा बनविण्याच्या प्रत्येक घटकाचं मी शिक्षण घेतलं. "दिन रात एक किया।' हा संवाद खरोखरीच माझ्या त्या काळातल्या आयुष्याला लागू होईल. या वेळी पापांना एकच गोष्ट सांगितली होती की केवळ तुमचा मुलगा म्हणून मला पदार्पणाची संधी देऊ नका. ज्या दिवशी खरोखरच तुम्हाला मी अभिनय करू शकतो हे जाणवेल, त्याच दिवशी संधी द्या. त्यामुळं, पापासुद्धा माझ्या पदार्पणासाठी कसलीही घाई करण्याच्या मनस्थितीत नव्हते. "प्यार तो होना ही था', "नो एन्ट्री', "वेलकम'फेम दिग्दर्शक अनीस बज्मी एके दिवशी आमच्या घरी आले होते. "हरमनला तुम्ही ब्रेक दिला नाहीत तर मी देतो!' असं त्यांनी थेट सांगून टाकलं. बज्मींसारखा यशस्वी दिग्दर्शक आपल्या मुलाला "ब्रेक' देण्याची भाषा करतो, हे ऐकून पापांनी तातडीनं "लव्ह स्टोरी 2050' हा सिनेमा करण्याचा निर्णय घेतला.<br />ः हा माझा पदार्पणातला सिनेमा असला तरी मला अनावश्यक "फुटेज' मिळालेलं नाही. उलट, माझ्यापेक्षा प्रियांका चोप्राला यात अधिक वाव आहे. एक वडील या नात्यानं पापा मला संधी देणारी अनेक दृश्यं या सिनेमात दाखवू शकले असते. या सिनेमात काम करणाऱ्या बमन इराणी यांनाही ही गोष्ट प्रकर्षानं जाणवली होती. "इतना अनसेल्फिश डिरेक्टर मैं पहली बार देख रहा हूँ ।' असे त्यांचे उद्गार आहेत. फिल्म चांगली झाली तर साहजिकच हरमनही त्यात उठून दिसेल, एवढंच पापांचं "लॉजिक' आहे आणि मला ते अगदी योग्य वाटतं.<br />ः प्रियांका चोप्राबरोबर माझी पाच वर्षांची मैत्री आहे. तिनं या सिनेमासाठी आपलं सर्वस्व पणाला लावलंय. आमच्या दोघांमधल्या चांगल्या मैत्रीमुळं सध्या बऱ्याच अफवा पसरल्यात, याची आम्हाला कल्पना आहे. या अफवांचेच आम्ही सध्या शिकार झालोत. मात्र त्याचं आम्ही काहीच करू शकत नाहीत. सध्या तरी मी माझ्या करिअरवरच लक्ष केंद्रित केलंय. संजय लीला भन्साळी, आशुतोष गोवारीकर यांच्यासारख्या मातब्बर दिग्दर्शकांनी मला संधी दिलीय. अशी संधी एखाद्याच्याच वाट्याला येते; मात्र या दिग्गजांच्या अपेक्षांना आपण न्याय दिला पाहिजे, याचं दडपण माझ्यावर आहे.Mandar Joshihttp://www.blogger.com/profile/17017614789313998938noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-6424345992684415946.post-77097320892631457082008-07-03T06:14:00.000-07:002008-07-03T06:19:09.265-07:00इम्रान खान interviewअभिनेता आमीर खानचा भाचा या एका ओळखीमुळं इम्रानबद्दल अनेकांना मोठ्या आशा आहेत. आमीरची चुलत बहीण नुझत खान यांचा तो मुलगा आहे. "जाने तू या जाने ना' प्रदर्शित होण्यापूर्वीच इम्रानला आणखी दोन सिनेमे मिळाले आहेत. चित्रपट माध्यमाबद्दलची आपली मतं, आमीर आणि आपल्या करियरबद्दलची त्याची ही निरीक्षणं.<br />-------------<br />ः "जाने तू...'मध्ये जयसिंग राठोड असं नाव असलेल्या तरुणाचा "रोल' मी साकारतोय. गांधीजींच्या अहिंसेच्या तत्त्वज्ञानावर त्याचा विश्वास आहे. "टिपिकल' हिंदी चित्रपटांमधला तो "हीरो' नाही. तो एखाद्या उद्योजकाचा मुलगा नाही. मध्यमवर्गात तो वाढलेला असतो. फॅन्सी कपडे घालण्याची त्याला आवड नाही की त्याच्याजवळ बाईकही नाही. त्याचं हे सीधंसाधं असणं मला फार आवडलं. चित्रपटसृष्टीत मी आलो ते दिग्दर्शक बनायला. कारण "हीरो'साठी आवश्यक असलेली "मसल पॉवर' माझ्याकडं नाही. पण अब्बास टायरवालानं या सिनेमातली जयसिंगची व्यक्तिरेखा ऐकवल्यानंतर मी अभिनय करण्याचा मोह आवरू शकलो नाही. तारुण्य हा या सिनेमाचा "यूएसपी' आहे. विशी-पंचविशीच्या घरातल्या आम्ही मंडळींनी एकत्र येऊन हा सिनेमा केलाय. "फॉर यंग पीपल, बाय यंग पीपल' असंच मी म्हणेन. "कयामत से कयामत तक' हा सिनेमासुद्धा दोन दशकांपूर्वी तरुण टीमनंच केला होता आणि तो प्रचंड यशस्वी ठरला होता. त्यामुळं तशा प्रकारच्या यशाची पुनरावृत्ती व्हावी, अशी आशा मी बाळगून आहे.<br />ः "जाने तू...'च्या सुरुवातीला आमीरमामू (आमीर खान) त्याची निर्मिती करीत नव्हते. काही कारणांमुळं हा सिनेमा रखडला. त्या वेळी मी आणि या सिनेमाचा दिग्दर्शक अब्बास टायरवाला मोठ्या टेन्शनमध्ये होतो. अर्थात, सिनेमा रखडणे हा प्रकार काही आम्हाला नवीन नव्हता. इथे कोणतीच गोष्ट वेळेत होत नाही. कागदावर सर्व काही ठरवलेलं असतं; पण अचानक पाऊस येणं, सेटवर अपघात होणं, कलाकारांच्या एकत्रित "डेटस्' न मिळणं... अशा काही गोष्टी असतात की, त्याला कोणी काहीच करू शकत नाही.<br />ः अशी विपरीत स्थिती असतानाही माझा अब्बासवर आणि त्याचा माझ्यावर पूर्ण विश्वास होता. आम्हा दोघांनाही कसल्याही परिस्थितीत हा सिनेमा पूर्ण करायचा होता. आमीरमामूंनी मला चित्रपटसृष्टीत "ब्रेक' देण्यासाठी या सिनेमाची निर्मिती केली, अशी सध्या सगळीकडे चर्चा आहे. मात्र ती साफ खोटी आहे. कारण आमीरमामू कधीच "इमोशनली' निर्णय घेत नाहीत. त्यांच्याकडं जेव्हा आम्ही या सिनेमाचा प्रस्ताव घेऊन गेलो, तेव्हा त्यांनी प्रथम "स्क्रीप्ट' ऐकव असं सांगितलं. आमच्या सुदैवानं त्यांना ही "स्क्रीप्ट' खूप आवडली. या वेळी त्यांनी मला दोन प्रश्न विचारले. एक होता, इम्रान, तुला ही "स्क्रीप्ट' आवडली आहे का? आणि दुसरा होता, या पटकथेवर अब्बास एक चांगला सिनेमा बनवू शकेल, याची तुला स्वतःला खात्री आहे? या दोन प्रश्नांची माझ्याकडून होकारार्थी उत्तरं ऐकल्यानंतर त्यांनी "आमीर खान प्रॉडक्शन'तर्फे हा सिनेमा बनविण्यास होकार दिला. एवढ्यावरच न थांबता त्यांनी पुन्हा माझी "ऑडिशन' घेतली. त्यात मी चांगला वाटल्यानंतरच त्यांनी हा सिनेमा सुरू केला.<br />ः आमीरमामूंना जेव्हा मी क्षेत्रात येत आहे, असं सांगितलं तेव्हा माझ्या सांगण्यावर प्रथम त्यांचा मुळीच विश्वास बसला नाही. एक अभिनेता बनण्यासाठी जे गुण लागतात, ते माझ्यात नाहीत, असं त्यांचं मत होतं; पण काही दिवसांनी त्यांना जाणवलं की, त्यांचं चित्रपटसृष्टीत पदार्पण झालं तेव्हासुद्धा लोक त्यांच्याबद्दल असंच निगेटिव्ह बोलायचे. आमीरमामूंनी मला कधीही अंधारात ठेवलेलं नाही. मला त्यांनी आजपर्यंत कसल्याही "टिप्स' दिलेल्या नाहीत. "तुझा रस्ता तुलाच ठरवायचाय,' हे त्यांचं सांगणं आहे. "यशस्वी झालास तर त्याचं क्रेडिट तू स्वतःच घे आणि अपयशी ठरलास तरी तूच त्याला सामोरं जा, असं त्यांचं सांगणं असतं. त्यांच्या दृष्टीनं हा सिनेमा यशस्वी ठरणं अधिक महत्त्वाचं आहे. सिनेमा यशस्वी ठरला तर मी आपोआपच लोकांना आवडेन, हे त्यामागचं "लॉजिक' असावं.<br />ः "जाने तू...' प्रदर्शित होण्यापूर्वीच मला "किडनॅप' आणि "लक' हे दोन सिनेमे मिळाले आहेत. कमल हसन यांची मुलगी श्रुती हसन ही "लक'मध्ये माझी हिरोईन आहे. "लव्ह स्टोरी 2050' या सिनेमातून हरमन पदार्पण करीत असल्यामुळं त्याच्याबरोबर माझी स्पर्धा असल्याचं चित्र सध्या "मीडिया'तून रंगवलं जातंय. पण तसं करणं योग्य ठरणार नाही. कारण आम्ही दोघं काही शंभर मीटर रनिंग स्पर्धेत भाग घेतलेला नाही. अशा प्रकारच्या स्पर्धेत फक्त एकच विजेता असतो. आमच्याकडे मात्र सगळ्यांना संधी आहे. भविष्यात मला दिग्दर्शक बनायचं असलं तरी सध्या अभिनयावरच मी लक्ष केंद्रित केलंय.Mandar Joshihttp://www.blogger.com/profile/17017614789313998938noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-6424345992684415946.post-76427555743702127502008-06-30T04:06:00.000-07:002008-06-30T04:07:10.251-07:00थोडा प्यार थोडा मॅजिक-reviewसगळ्याच आघाड्यांवर थोडा...<br />चांगला सिनेमा बनायला केवळ "हट के' विषय असून चालत नाही. तो विषय दीड-दोन तासांमध्ये पुरावा आणि मुरावाही लागतो. तसं न झालं तर ते बूमरॅंग ठरण्याची भीती असते. कुणाल कोहली दिग्दर्शित "थोडा प्यार थोडा मॅजिक'बद्दल नेमका हाच घोळ झालाय. "हम तुम', "फना' या दोन सिनेमांचं दणदणीत यश पाठीशी असताना कुणालनं प्रेक्षकांना "इमोशनल डोस' देण्याचं धाडस दाखवलंय. मात्र दुर्दैवानं या डोसची मात्रा थोडी अधिक झाल्यानं हे धाडस अंगलट येण्याचीच दाट शक्यता आहे. सध्या समाजात सगळीकडं नकारात्मक घटना घडताहेत. त्याचा उबग येऊन कोहलींनी हा सिनेमा बनविणं समजण्यासारखं आहे. या सिनेमाची निर्मिती "यशराज फिल्म्स'नं केली असून त्यांच्यावर अलीकडच्या काळात सतत "मिनिंगलेस' सिनेमे दिल्याचा आरोप होतोय. या पार्श्वभूमीवर कोहलींनी आपला "ट्रॅक' बदललाय. पण सकारात्मकता दाखविण्याच्या भरात आपला सिनेमा कंटाळवाणा होतोय, याकडे त्यांचं दुर्लक्ष झालंय. सैफ अली खान, राणी मुखर्जी यांच्यासारखे दोन मुरब्बी कलाकार असूनही हा अवघा सव्वादोन तासांचा सिनेमा तीन-साडेतीन तासांचा सिनेमा पाहिल्याचा "फील' देतो. हा त्रास आणखी वाढलाय तो शंकर-एहसान-लॉय यांच्या हरवलेल्या जादूमुळं. त्यामुळेच या सिनेमातलं प्रेम ना आपलं हृदय जिंकतं ना जादू. <br />सैफ अली खान या सिनेमात एका उद्योजकाच्या रूपात पाहायला मिळतो. त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळते ते एका अपघातामुळं. तो स्वतः चालवीत असलेल्या गाडीला अपघात होऊन त्यात एका जोडप्याचा मृत्यू होतो. त्यामुळं त्यांची मुलं उघड्यावर येतात. हे अपघात प्रकरण पुढं न्यायालयात जातं. यावेळी न्यायमूर्ती एक ऐतिहासिक निकाल देताना ही मुलं सज्ञान होईपर्यंत सैफनं त्यांचा सांभाळ करावा, असा आदेश देतात. न्यायालयाचा मान राखण्यासाठी सैफ या मुलांना आपल्या घरी आणतो. पण त्यांच्याशी जुळवून घेणं त्याला कठीण जातं. यावेळी सैफ आणि मुलं यांच्यातला दुवा बनण्याचं काम करण्यासाठी स्वर्गातली गीता (राणी मुखर्जी) पृथ्वीवर येते. तिला पृथ्वीवर येऊन या मुलांची मदत करण्याचा आदेश ऋषी कपूरनं साकारलेला एक देव देतो. कथानकातला हा भाग अगदीच सुमार पद्धतीनं चित्रीत करण्यात आलाय. राणीला जादूचं वरदान असल्यानं मग ती त्याद्वारे मुलं आणि सैफमधली दरी कमी करते.<br />"थोडा प्यार...'वर "मेरी पॉपीन्स' या हॉलीवुडपटाचा मोठा प्रभाव आहे. आपल्याकडं अपघात प्रकरणांचा निकाल लवकर न लागण्याची परंपरा आहे. त्या पार्श्वभूमीवर "थोडा प्यार...'मधल्या न्यायाधीशांनी सैफला मुलांचा सांभाळ करण्याचा दिलेला आदेश या सिनेमाला वेगळा बनवितो. या आदेशाचं सुरुवातीला पालन करताना सैफचा नकारार्थी सूर, मुलांचा त्याच्यावरील खुन्नस आणि कालांतरानं राणी मुखर्जीनं या दोघांना एकत्र आणण्यासाठी केलेले प्रयत्न... हा भाग कागदावर चांगला वाटतो. पण त्याचं पडद्यावरचं रूपांतर फारसं जमलेलं नाही. या मुलांनी सैफला त्रास देण्यासाठी सुरुवातीला केलेल्या क्लृप्त्या अगदीच सुमार वाटतात. सैफची "गर्लफ्रेंड' म्हणून अमीषा पटेल जे काही करते, ते काहीच समजणारे नाही. तिची व्यक्तिरेखा कापली गेली असती तरी कथानकाला काहीच धक्का बसला नसता. राणीची व्यक्तिरेखा एखाद्या उपटसुंभासारखी सिनेमात अवतरलीय आणि तिचा सिनेमात वावरही तसाच आहे. दिग्दर्शकानं या व्यक्तिरेखेच्या पडद्यावरील "एन्ट्री'साठी थोडं डोकं लढवायला हवं होतं. सैफचं मुलांबद्दलचं मनःपरिवर्तनही असेच अचानक दाखविण्यात आलंय. <br />पटकथाच गडबडली असल्यानं सर्वच कलाकारांचा अभिनय गोंधळल्यासारखा वाटतो. सैफ अली खान सध्या ज्या पद्धतीनं वेगळ्या व्यक्तिरेखा साकारतोय, त्या पद्धतीची ही व्यक्तिरेखा नाही. राणी मुखर्जी चांगली दिसली असली तरी आपण या चित्रपटात आहोत, अशी "बॉडी लॅंग्वेज' तिच्या अभिनयातून जाणवत नाही. अमीषा पटेलच्या व्यक्तिरेखेचंच भजं झाल्यानं तिच्या अभिनयाबद्दल न सांगितलेलंच बरं. लहान मुलं चांगली असली तरी त्यातल्या कोणालाही आपली छान छाप उमटवता आलेली नाही. शंकर-एहसान-लॉय यांच्या बिघडलेल्या सुराचा मोठा फटका सिनेमाला बसलाय. कोहलींनी चित्रपटाचा "लूक' चोप्रांच्या बॅनरला साजेसा ठेवून प्रेक्षकांना हॉलीवुडची सैर घडवून आणलीय. पण विषयातला सैरभैरपणा टाळता न आल्यानं या सहलीला काहीच अर्थ उरत नाही.Mandar Joshihttp://www.blogger.com/profile/17017614789313998938noreply@blogger.com0